शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

गाव विकासासाठी ठाणा गावाची निवड

By admin | Updated: October 11, 2016 00:34 IST

भंडारा तालुका अंतर्गत पाच हजार लोकसंख्यापेक्षा जास्त असलेल्या गावांमधुन नागरी सुविधा योजनाद्वारे ...

जवाहरनगर : भंडारा तालुका अंतर्गत पाच हजार लोकसंख्यापेक्षा जास्त असलेल्या गावांमधुन नागरी सुविधा योजनाद्वारे विकसीत गाव करण्यासाठी दोन ग्रामपंचायतची निवड जिल्हा परिषद भंडारा यांनी केली. यात ठाणा पेट्रोलपंप व गणेशपूर यांचा समावेश आहे.गावातील नागरिकांच्या दिर्घ काळातील ज्वलंत समस्यांचे निराकरण करणाच्या हेतुने, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने स्मार्ट सिटी या धर्तीवर विकसीत ग्रामपंचायत करण्यासाठी भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या दोन ग्रामपंचायतीची नागरी सुविधासाठी निवड करण्यात आली. यात ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप व ग्रामपंचायत गणेशपूर यांचा समावेश आहे. यामध्ये गावामध्ये पुढील पंधरा वर्षामध्ये समसयांचे निराकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी चंद्रपूर येथील हर्षल ग्रामीण विकास संस्थाची गावाचे नियोजन करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. यासाठी संस्थेचे बघेल व बिसेन यांनी ग्रामसभेच्या व वॉर्ड सभाच्या माध्यमातुन समस्या जाणुन घेतले. त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम, आंगणवाडी सदस्य, आशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी यांच्याशी हितगुज करुन दिर्घकालीन विकास योजनेविषयी माहिती जाणून घेतली. ग्रामसभेच्या माध्यमातून पुढील १५ वर्षाचा गाव कृती आराखड्याच मान्यता देण्यात आले. यात शुध्द पेजल करिता स्वतंत्र जलशुध्दीकरण सयंत्र उभारणे, बंद गटर नाली तयार करणे, रस्ता मजबुतीकरण करणे, गरजु बेघराना आवास सुविधा पुरविणे, खेळाचे मैदान, दुग्ध उद्योग उभारणे, अल्पसंख्याक व दलीत वस्तीमध्ये कौशल्य विकास घडविण्यासाठी उच्च दर्जाचे औद्योगिक संस्थाची उभारणी करणे इत्यादी मुलभुत सुविधा विषय ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले. याविषयी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, सर्वेक्षणाला आलेली चमुमधील बघेले व बिसने यांनी मार्गदर्शन केले.सर्वेक्षणाचे कामे हे निरंतर चालु राहणार असून यात पाण्याची शुध्दता तपासणे, गावातील हवेची घनता तपासणे, घराचे सर्वेक्षण करणे, जी. आय.एस. खसरा नकाशा तयार करणे, उपग्रहाद्वारे संपूर्ण गावाची नकाशा तयार करणे, काम युध्द पातळीवर करण्यात येणार आहे. (वार्ताहर)