शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या प्रवाहाचा दहा गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:11 IST

जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह गत काही वर्षांपासून गावाच्या दिशेने सरकत आहे. तिरावरील ४२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळकृंत झाली आहे. संरक्षक भिंत बांधली नाही तर नदी तिरावरील सुमारे दहा गावांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने संरक्षक भिंतीसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला.

ठळक मुद्देसंरक्षण भिंत हवी : ४२ हेक्टर शेती झाली नदीपात्रात गिळंकृत

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह गत काही वर्षांपासून गावाच्या दिशेने सरकत आहे. तिरावरील ४२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळकृंत झाली आहे. संरक्षक भिंत बांधली नाही तर नदी तिरावरील सुमारे दहा गावांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने संरक्षक भिंतीसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला. परंतु हा निधी तोकडा असून १० ते १५ कोटींच्या निधींसाठी आमदार चरण वाघमारे प्रयत्नशील आहे.तुमसर तालुक्यातील विशालपात्र असलेली वैनगंगा वाहते. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेती आहे. लाखो ब्रासचा उपसा अहोरात्र सुरु आहे. तुमसर व तिरोडा तालुक्याच्या सीमा येथे लागून आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा प्रशासन दरवर्षी रेतीघाटांचा येथे लिलाव करते. बेसुमार रेतीचा उपसा होते. त्यामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह बदलत चालला आहे. तो गावाच्या दिशेने सरकत आहे.तुमसर तालुक्यातील रेंगेपार, मांडवी, उमरवाडा, बोरी, कोष्टी, ब्राम्हणी येथील वैनगंगा नदीचा प्रवाह झपाट्याने गावाच्या दिशेने सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ४२ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. सर्वाधिक शेती बोरी, उमरवाडा, रेंगेपार येथे नदीपात्रात गेली आहे. गाळाची सुपीक जमीन नदीपात्रात गेली. परंतु त्याचा मोबदला मिळाला नाही. नैसर्गिकरित्या शेती नदीपात्रात गेल्याचे सांगण्यात येते. नदीतिरावरील शेतकरी या प्रकाराने हवालदिल झाले आहे. बोरी येथील लाखो रुपयांची पाणीपुरवठा योजना नदीपात्रात सामावले आहे अशी स्थिती नदी काठावरील इतरही गावांची आहे. याठिकाणी संरक्षक भिंत उभारली नाही तर गावांनाही धोका निर्माण होवू शकतो.वैनगंगा नदीचे पात्र विशाल आहे. या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जाते. रेतीची नैसर्गिक संरक्षक भिंत असलेली थडी वाहतुकीसाठी फोडली जाते. त्यामुळेही अनेकदा नदीचा प्रवाह बदलतो. उन्हाळ्याच्या दिवसात त्याचा धोका दिसत नसला तरी पावसाळ्यात मात्र अनेक गावात पाणी शिरण्याची भीती निर्माण होते. आता याठिकाणी संरक्षक भिंत उभारल्यास नदीचा प्रवाह योग्यरित्या प्रवाहित होईल. तसेच तस्करांनाही अटकाव करण्यात मदत होणार आहे. गरज आहे ती निधीची. या निधीसाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.जिल्हा नियोजन समितीत चर्चापालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ही बाब आमदार चरण वाघमारे यांनी निदर्शनास आणून दिली. बोरीसह इतर गावांना वैनगंगा नदीचा प्रवाहाचा धोका असल्याने संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली. ना. बावनकुळे यांनी ५० लाख रुपये संरक्षक भिंतीसाठी मंजूर केले. जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता अरविंद डाकरे व राज्यशासनाचे नागपूर येथील कार्यकारी अभियंता ताले यांनी बोरी येथील नदीपात्राचे पाहणी केली आहे.संरक्षक भिंत कुचकामी ठरणारनदी तीरावरील माती भुसभुसीत असून नदीचे पात्र मोठे आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहला मोठी गती असते. त्यामुळे संरक्षक भिंत ठासळण्याची भीती असते. त्यामुळे सदर परिसराचे संर्वेक्षण राज्य शासनाच्या संबंधीत खात्याचे वरिष्ठ अधिकारी करणार आहे. सर्वेक्षणाचा अंतीम अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल. राज्य शासनाने मोठा निधी उपलब्ध करुन दिला तरच उपाययोजनेला गती मिळणार आहे. सदर कामासाठी आमदार चरण वाघमारे प्रयत्नशील आहेत. शासनाकडून भरीव निधीची अपेक्षा आहे.नदी प्रवाह वळविणे गरजेचेस्थापत्य अभियंता तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाने येथे वैनगंगा नदी प्रवाह नदीचा मध्यभागातून वळविण्याच्या सुचना केल्या आहे. त्यादिशेने येथे कारवाई केल्यास नदी तिरावरील गावांमध्ये पाण्याचा प्रवाह शिरणार नाही. प्रायोगीक तत्वावर हे काम करणे गरजेचे आहे. बोरी येथे पाहणी करताना सरपंच अविनाश उपरीकर, डोंगरलाचे सरपंच उमेश बघेले उपस्थित होते.

टॅग्स :riverनदी