शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वैनगंगेच्या प्रवाहाचा दहा गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:11 IST

जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह गत काही वर्षांपासून गावाच्या दिशेने सरकत आहे. तिरावरील ४२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळकृंत झाली आहे. संरक्षक भिंत बांधली नाही तर नदी तिरावरील सुमारे दहा गावांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने संरक्षक भिंतीसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला.

ठळक मुद्देसंरक्षण भिंत हवी : ४२ हेक्टर शेती झाली नदीपात्रात गिळंकृत

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह गत काही वर्षांपासून गावाच्या दिशेने सरकत आहे. तिरावरील ४२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळकृंत झाली आहे. संरक्षक भिंत बांधली नाही तर नदी तिरावरील सुमारे दहा गावांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने संरक्षक भिंतीसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला. परंतु हा निधी तोकडा असून १० ते १५ कोटींच्या निधींसाठी आमदार चरण वाघमारे प्रयत्नशील आहे.तुमसर तालुक्यातील विशालपात्र असलेली वैनगंगा वाहते. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेती आहे. लाखो ब्रासचा उपसा अहोरात्र सुरु आहे. तुमसर व तिरोडा तालुक्याच्या सीमा येथे लागून आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा प्रशासन दरवर्षी रेतीघाटांचा येथे लिलाव करते. बेसुमार रेतीचा उपसा होते. त्यामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह बदलत चालला आहे. तो गावाच्या दिशेने सरकत आहे.तुमसर तालुक्यातील रेंगेपार, मांडवी, उमरवाडा, बोरी, कोष्टी, ब्राम्हणी येथील वैनगंगा नदीचा प्रवाह झपाट्याने गावाच्या दिशेने सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ४२ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. सर्वाधिक शेती बोरी, उमरवाडा, रेंगेपार येथे नदीपात्रात गेली आहे. गाळाची सुपीक जमीन नदीपात्रात गेली. परंतु त्याचा मोबदला मिळाला नाही. नैसर्गिकरित्या शेती नदीपात्रात गेल्याचे सांगण्यात येते. नदीतिरावरील शेतकरी या प्रकाराने हवालदिल झाले आहे. बोरी येथील लाखो रुपयांची पाणीपुरवठा योजना नदीपात्रात सामावले आहे अशी स्थिती नदी काठावरील इतरही गावांची आहे. याठिकाणी संरक्षक भिंत उभारली नाही तर गावांनाही धोका निर्माण होवू शकतो.वैनगंगा नदीचे पात्र विशाल आहे. या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जाते. रेतीची नैसर्गिक संरक्षक भिंत असलेली थडी वाहतुकीसाठी फोडली जाते. त्यामुळेही अनेकदा नदीचा प्रवाह बदलतो. उन्हाळ्याच्या दिवसात त्याचा धोका दिसत नसला तरी पावसाळ्यात मात्र अनेक गावात पाणी शिरण्याची भीती निर्माण होते. आता याठिकाणी संरक्षक भिंत उभारल्यास नदीचा प्रवाह योग्यरित्या प्रवाहित होईल. तसेच तस्करांनाही अटकाव करण्यात मदत होणार आहे. गरज आहे ती निधीची. या निधीसाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.जिल्हा नियोजन समितीत चर्चापालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ही बाब आमदार चरण वाघमारे यांनी निदर्शनास आणून दिली. बोरीसह इतर गावांना वैनगंगा नदीचा प्रवाहाचा धोका असल्याने संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली. ना. बावनकुळे यांनी ५० लाख रुपये संरक्षक भिंतीसाठी मंजूर केले. जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता अरविंद डाकरे व राज्यशासनाचे नागपूर येथील कार्यकारी अभियंता ताले यांनी बोरी येथील नदीपात्राचे पाहणी केली आहे.संरक्षक भिंत कुचकामी ठरणारनदी तीरावरील माती भुसभुसीत असून नदीचे पात्र मोठे आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहला मोठी गती असते. त्यामुळे संरक्षक भिंत ठासळण्याची भीती असते. त्यामुळे सदर परिसराचे संर्वेक्षण राज्य शासनाच्या संबंधीत खात्याचे वरिष्ठ अधिकारी करणार आहे. सर्वेक्षणाचा अंतीम अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल. राज्य शासनाने मोठा निधी उपलब्ध करुन दिला तरच उपाययोजनेला गती मिळणार आहे. सदर कामासाठी आमदार चरण वाघमारे प्रयत्नशील आहेत. शासनाकडून भरीव निधीची अपेक्षा आहे.नदी प्रवाह वळविणे गरजेचेस्थापत्य अभियंता तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाने येथे वैनगंगा नदी प्रवाह नदीचा मध्यभागातून वळविण्याच्या सुचना केल्या आहे. त्यादिशेने येथे कारवाई केल्यास नदी तिरावरील गावांमध्ये पाण्याचा प्रवाह शिरणार नाही. प्रायोगीक तत्वावर हे काम करणे गरजेचे आहे. बोरी येथे पाहणी करताना सरपंच अविनाश उपरीकर, डोंगरलाचे सरपंच उमेश बघेले उपस्थित होते.

टॅग्स :riverनदी