शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आठ वर्षांत आढळले दहा हजार क्षयरुग्ण

By admin | Updated: March 30, 2017 00:34 IST

२१ ते ३० मार्च या कालावधीत जागतिक क्षयदिन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतो.

६५८ रुग्णांचा मृत्यू : ७ हजार १७३ रुग्ण औषधोपचारानंतर झाले बरेभंडारा : २१ ते ३० मार्च या कालावधीत जागतिक क्षयदिन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतो. आरोग्य विभाग क्षयरोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा नेहमी करते. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला असून मागील आठ वर्षात जिल्ह्यात ९ हजार ९४७ क्षयरुग्ण आढळले असून यातील तब्बल ६५८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल उघडकीस आला आहे. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अ‍ॅडव्होकेसी कॅम्युनिकेशन अ‍ॅण्ड सोशल मोबिलायझेशन प्रभाविपणे राबविण्यात येत असून क्षयरोगावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविल्याचा दावा जिल्हा क्षयरोग व आरोग्य विभागाने केला आहे. मात्र त्यांचा हा दावा कितपत सत्य आहे, हे त्यांनीच सादर केलेल्या अहवालावरुन सिध्द होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात सन २००९ ते डिसेंबर २०१६ या आठ वर्षात जिल्ह्यातील तब्बल ६५८ क्षयरुग्णांना मृत्यूने कवटाळले आहे. तर ९ हजार ९४७ क्षयरुग्ण आढळल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दिवसागणीक क्षयरुग्णांची संख्या कमी होत असली तरी परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात आणण्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी व आरोग्य विभाग अपयशी ठरले आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या वचनाप्रमाणे आरोग्य हीच आपली संपत्ती असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र त्यांनी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात ते अपयशी ठरल्याने नागरिकांचे जीव अजूनही धोक्यातच आहेत. भंडारा जिल्ह्यात एमडीआर व एक्सडीआर या क्षयरोग आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत. सन २००७ पासून माहे डिसेंबर २०१६ अखेर एमडीआरच्या १३५ रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. त्यापैकी २६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३७ रुग्ण बरे झाले असून १८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा क्षयरोग कार्यालयाने स्पष्ट केले आहे. एक्सडीआरच्या आठ क्षयरुग्णांचे निदान झाले असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. खासगी दवाखान्यातून औषधोपचार घेत असताना व त्याची नोंद सन २०१६ पासून शासकीय यंत्रणेत करण्यात येत आहे. वरील टक्केवारुन क्षयरुग्ण संख्येत अल्पशा घट झाली आहे. परंतु यापेक्षाही जास्त क्षयरोग रुग्ण समाजात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची कबुली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एन. एस. वानखेडे यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)