शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

उन्हाच्या तडाख्याने कोंबड्यांचा मृत्यू; कुक्कुटपालन व्यवसाय संकटात

By युवराज गोमास | Updated: April 5, 2024 16:43 IST

व्यवस्थापनावरील खर्च वाढला, कोंबड्यांच्या वजनात कमालीची घट.

युवराज गोमासे, भंडारा : कोंबडी हा पक्षी उष्ण रक्तवर्गीय गटात मोडताे. कोंबड्यांमध्ये घामग्रंथींचा अभाव असतो. उष्णता वाढताच पक्षी धापा टाकतात. अन्न व पाणी कमी उचलतात. परिणामी वजन कमी होते व मृत्यू पावतात, सध्या हे चित्र जिल्ह्यातील सर्वच कुक्कटपालन केंद्रात दिसून येत आहे. उन्हाच्या तडाख्याने कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत. यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. परंतु, सध्या तापमान ४३ अंशावर पोहचले असून पुढील दिवसात तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. वाढते तापमान कुक्कुटपालन व्यवसायीकांचे टेन्शन वाढवित आहे. त्यातच पाणीटंचाई, वाढती महागाई संकटाच्या गर्ता आणखी रूंदावत आहेत. उन्हाळ्यात बॉयलर कोंबड्यांना सर्वाधिक उष्णतेचा त्रास जास्त जाणवतो. जिल्ह्यात १५ दिवसांपासून रात्री हलका गारवा आणि दिवसा कडक ऊन, असे वातावरण आहे. विषम हवामानामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.

उन्हाळ्यात कोंबड्यांचे संगोपन अवघड-

उन्हाळा कोंबड्यांना मानवत नाही. रोगराईचे सावट पसरते. ताप व सर्दीसह विविध रोगांचा प्रादूर्भाव जाणवतो. परिणामी संगोपनाचे कार्य अवघड होते. कडक उष्णतेने कोंबड्या मोठ्या प्रमाणात थापा टाकतात. अन्न व पाणी कमी पितात. झपाट्याने वजन कमी होते. कोंबड्यांच्या मृत्यूची संख्या वाढते

वारंवार पाणी बदलणे धोक्याचे-

कोंबड्यांसाठी वारंवार पाणी बदलावे लागत नाही. त्यामुळे सर्दीचा धोका वाढतो. कोंबड्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी एकाच ठिकाणी द्यावे लागते. मात्र, सध्या पाणी टंचाई निर्माण झाल्याने पोल्ट्री व्यवसाय करणे अवघड झाल्याचे चित्र आहे.

खाद्य २५ ते ३० टक्के महागले- 

खाद्य                    पूर्वीचे दर             आताचे दर

बायलर स्टार्टर         १४००                    २०००

लेअर चिक्रम           १२००                     १७००

फिनिशर                 १५००                    १९००

तांदूळ कनी             १२                          २६

मका                        १२                         २४

सोयाबीन ढेप           ६०                         ४५

कुकुस ढेप               ७                           १६

सोयाबीन तेल           ७०                        १००

खर्च वाढीस, उत्पन्न घटले-

हिवाळ्यात एक किलोचा पक्षी (कोंबडी) तयार करण्यासाठी साधारणत: ८० रूपयांचा खर्च यायचा. आता खाद्य व औषधांचा खर्च वाढल्याने तसेच मजुरी, कुलर, पंख्यांच्या व्यवस्थेसह व्यवस्थापन खर्च वाढल्याने एक किलोसाठी ११० रूपयांचा खर्च येतो आहे. त्यातच कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने आर्थिक नुकसान अधिक होत आहे.

सध्या आमच्याकडे १० हजार कोंबड्या आहेत. परंतु, कडक उन्हाने काेंबड्याचे वजन कमालीने घटते. व्यवस्थापन खर्चात दुप्पटीने वाढ झाली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागत आहे. त्यातच औषधी व खाद्य वाढल्याने पोल्टी व्यवसाय तोट्यात चालविला जात आहे. अनुदान देण्याची गरज आहे.- हेमलता मुंगूसमारे, पोल्ट्री व्यावसायिक महिला, जांभोरा.

टॅग्स :bhandara-acभंडाराTemperatureतापमान