शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

उन्हाच्या तडाख्याने कोंबड्यांचा मृत्यू; कुक्कुटपालन व्यवसाय संकटात

By युवराज गोमास | Updated: April 5, 2024 16:43 IST

व्यवस्थापनावरील खर्च वाढला, कोंबड्यांच्या वजनात कमालीची घट.

युवराज गोमासे, भंडारा : कोंबडी हा पक्षी उष्ण रक्तवर्गीय गटात मोडताे. कोंबड्यांमध्ये घामग्रंथींचा अभाव असतो. उष्णता वाढताच पक्षी धापा टाकतात. अन्न व पाणी कमी उचलतात. परिणामी वजन कमी होते व मृत्यू पावतात, सध्या हे चित्र जिल्ह्यातील सर्वच कुक्कटपालन केंद्रात दिसून येत आहे. उन्हाच्या तडाख्याने कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत. यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. परंतु, सध्या तापमान ४३ अंशावर पोहचले असून पुढील दिवसात तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. वाढते तापमान कुक्कुटपालन व्यवसायीकांचे टेन्शन वाढवित आहे. त्यातच पाणीटंचाई, वाढती महागाई संकटाच्या गर्ता आणखी रूंदावत आहेत. उन्हाळ्यात बॉयलर कोंबड्यांना सर्वाधिक उष्णतेचा त्रास जास्त जाणवतो. जिल्ह्यात १५ दिवसांपासून रात्री हलका गारवा आणि दिवसा कडक ऊन, असे वातावरण आहे. विषम हवामानामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.

उन्हाळ्यात कोंबड्यांचे संगोपन अवघड-

उन्हाळा कोंबड्यांना मानवत नाही. रोगराईचे सावट पसरते. ताप व सर्दीसह विविध रोगांचा प्रादूर्भाव जाणवतो. परिणामी संगोपनाचे कार्य अवघड होते. कडक उष्णतेने कोंबड्या मोठ्या प्रमाणात थापा टाकतात. अन्न व पाणी कमी पितात. झपाट्याने वजन कमी होते. कोंबड्यांच्या मृत्यूची संख्या वाढते

वारंवार पाणी बदलणे धोक्याचे-

कोंबड्यांसाठी वारंवार पाणी बदलावे लागत नाही. त्यामुळे सर्दीचा धोका वाढतो. कोंबड्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी एकाच ठिकाणी द्यावे लागते. मात्र, सध्या पाणी टंचाई निर्माण झाल्याने पोल्ट्री व्यवसाय करणे अवघड झाल्याचे चित्र आहे.

खाद्य २५ ते ३० टक्के महागले- 

खाद्य                    पूर्वीचे दर             आताचे दर

बायलर स्टार्टर         १४००                    २०००

लेअर चिक्रम           १२००                     १७००

फिनिशर                 १५००                    १९००

तांदूळ कनी             १२                          २६

मका                        १२                         २४

सोयाबीन ढेप           ६०                         ४५

कुकुस ढेप               ७                           १६

सोयाबीन तेल           ७०                        १००

खर्च वाढीस, उत्पन्न घटले-

हिवाळ्यात एक किलोचा पक्षी (कोंबडी) तयार करण्यासाठी साधारणत: ८० रूपयांचा खर्च यायचा. आता खाद्य व औषधांचा खर्च वाढल्याने तसेच मजुरी, कुलर, पंख्यांच्या व्यवस्थेसह व्यवस्थापन खर्च वाढल्याने एक किलोसाठी ११० रूपयांचा खर्च येतो आहे. त्यातच कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने आर्थिक नुकसान अधिक होत आहे.

सध्या आमच्याकडे १० हजार कोंबड्या आहेत. परंतु, कडक उन्हाने काेंबड्याचे वजन कमालीने घटते. व्यवस्थापन खर्चात दुप्पटीने वाढ झाली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागत आहे. त्यातच औषधी व खाद्य वाढल्याने पोल्टी व्यवसाय तोट्यात चालविला जात आहे. अनुदान देण्याची गरज आहे.- हेमलता मुंगूसमारे, पोल्ट्री व्यावसायिक महिला, जांभोरा.

टॅग्स :bhandara-acभंडाराTemperatureतापमान