शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

तापमान ४५ अंशावर; १० टक्के साखर उत्पादनात घट

By युवराज गोमास | Updated: May 4, 2024 16:00 IST

मानस ॲग्रो साखर कारखाना : शेतकरी व कारखानदाराचे नुकसान

भंडारा : सध्या भंडारा जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहचले आहे. प्रखर उन्हाचा ऊस पिकाच्या वजनावर व साखर उत्पादनावर चांगला परिणाम जाणवत आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात एक मेट्रीक टन ऊसापासून १०० किलोपर्यंत मिळणारी साखर मे महिन्यात ८० ते ९० किलोपर्यत घटली आहे. सरासरी १० टक्केे उत्पादनात घट झाली आहे. कडक उन्हाच्या तडाख्याने शेतकरी व साखर कारखानदार संकटात सापडले आहे.

जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे वैनगंगा नदी काठावर पूर्ती उद्योग समूहाद्वारे संचालीत मानस ॲग्रो साखर कारखाना मे महिन्यातही सुरू आहे. या कारखान्याचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आला होता. कारखान्याने यंदा २ लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उदिष्ट निर्धारत केले होते. परंतु, ३ मेपर्यंत १ लाख ८० हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. साखरेचा उतारा १०.५० इतका राहीला आहे. गाळप झालेल्या ऊसापासून १ लाख ६० हजार क्विंटल साखर उत्पादन झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने 'लोकमत'ला दिली आहे.जानेवारी ते मार्च महिना फायदेशिरउस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांसाठी जानेवारी ते मार्च पर्यंतचे वातावरण लाभदायक असते. या काळात ऊसाचे वजन व साखर उताराही चांगला असतो. या काळात उन्हाचा परिणाम जाणवत नाही. ऊसाचा वजनही चांगला असतो. ऊसाची एक काडी ८ ते १० किलोपर्यंत भरते. परंतु, तापमान वाढीमुळे ऊसाच्या काडीचे वजन १ ते २ किलोने कमी झाले आहे.

ऊस तोडणीसाठी मजूर मिळेनातप्रखर उन्हामुळे ऊस तोडणी मजुरांची उणीव भासत आहे. अनेक स्थानिक ऊसतोड मजुरांच्या टोळ्या बंद झाल्या आहेत. ॲडव्हॉन्स बुडविणे आदी प्रकारामुळे कंत्राटदारांचे नुकसान होत आहे. त्यातच मुदत संपूनही अनेक दिवस तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांना पीक जगविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.

जाळून केली जाते हे ऊसाची तोडणीउन्हाळ्यात ऊसाचे शेतात शिरून तोडणी करण्यास मजूर धजावताना दिसत नाही. त्यामुळे सायंकाळी ऊसाच्या उभ्या पिकाला आग लावली जात आहे. पालापाचोळा जळाल्यानंतर ऊसाची कापणी सुरू केली जात आहे. परिणामी ऊसाचे वजन झपाट्याने कमी होवून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ऊसाचे पीक १४ ते १५ महिन्यांचे आहे. परिपक्व ऊसाचे वजन व साखर उतारा चांगला असतो. त्यामुळे शेतकरी व कारखाना दोन्हींचा फायदा होतो. परंतु, प्रखर उन्हामुळे ऊस व साखरेच्या उत्पादनावर १० टक्क्यांनी घट येत असते.- विजय राऊत, महाव्यवस्थापक, मानस ॲग्रो साखर कारखाना, देव्हाडा.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी