शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

तापमान ४५ अंशावर; १० टक्के साखर उत्पादनात घट

By युवराज गोमास | Updated: May 4, 2024 16:00 IST

मानस ॲग्रो साखर कारखाना : शेतकरी व कारखानदाराचे नुकसान

भंडारा : सध्या भंडारा जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहचले आहे. प्रखर उन्हाचा ऊस पिकाच्या वजनावर व साखर उत्पादनावर चांगला परिणाम जाणवत आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात एक मेट्रीक टन ऊसापासून १०० किलोपर्यंत मिळणारी साखर मे महिन्यात ८० ते ९० किलोपर्यत घटली आहे. सरासरी १० टक्केे उत्पादनात घट झाली आहे. कडक उन्हाच्या तडाख्याने शेतकरी व साखर कारखानदार संकटात सापडले आहे.

जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे वैनगंगा नदी काठावर पूर्ती उद्योग समूहाद्वारे संचालीत मानस ॲग्रो साखर कारखाना मे महिन्यातही सुरू आहे. या कारखान्याचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आला होता. कारखान्याने यंदा २ लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उदिष्ट निर्धारत केले होते. परंतु, ३ मेपर्यंत १ लाख ८० हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. साखरेचा उतारा १०.५० इतका राहीला आहे. गाळप झालेल्या ऊसापासून १ लाख ६० हजार क्विंटल साखर उत्पादन झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने 'लोकमत'ला दिली आहे.जानेवारी ते मार्च महिना फायदेशिरउस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांसाठी जानेवारी ते मार्च पर्यंतचे वातावरण लाभदायक असते. या काळात ऊसाचे वजन व साखर उताराही चांगला असतो. या काळात उन्हाचा परिणाम जाणवत नाही. ऊसाचा वजनही चांगला असतो. ऊसाची एक काडी ८ ते १० किलोपर्यंत भरते. परंतु, तापमान वाढीमुळे ऊसाच्या काडीचे वजन १ ते २ किलोने कमी झाले आहे.

ऊस तोडणीसाठी मजूर मिळेनातप्रखर उन्हामुळे ऊस तोडणी मजुरांची उणीव भासत आहे. अनेक स्थानिक ऊसतोड मजुरांच्या टोळ्या बंद झाल्या आहेत. ॲडव्हॉन्स बुडविणे आदी प्रकारामुळे कंत्राटदारांचे नुकसान होत आहे. त्यातच मुदत संपूनही अनेक दिवस तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांना पीक जगविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.

जाळून केली जाते हे ऊसाची तोडणीउन्हाळ्यात ऊसाचे शेतात शिरून तोडणी करण्यास मजूर धजावताना दिसत नाही. त्यामुळे सायंकाळी ऊसाच्या उभ्या पिकाला आग लावली जात आहे. पालापाचोळा जळाल्यानंतर ऊसाची कापणी सुरू केली जात आहे. परिणामी ऊसाचे वजन झपाट्याने कमी होवून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ऊसाचे पीक १४ ते १५ महिन्यांचे आहे. परिपक्व ऊसाचे वजन व साखर उतारा चांगला असतो. त्यामुळे शेतकरी व कारखाना दोन्हींचा फायदा होतो. परंतु, प्रखर उन्हामुळे ऊस व साखरेच्या उत्पादनावर १० टक्क्यांनी घट येत असते.- विजय राऊत, महाव्यवस्थापक, मानस ॲग्रो साखर कारखाना, देव्हाडा.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी