शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

टेकेपार उपसा सिंचनचे पाणी सोडा

By admin | Updated: July 1, 2014 23:21 IST

निसर्गाने जनतेकडे पाठ फिरविल्यामुळे वरुणराजा शेतकऱ्यांवर अवकृपा करीत आहे. शेतकऱ्यांनी १०० टक्के धानाची पेरणी केली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पऱ्हे करपली

मानेगाव बाजार : निसर्गाने जनतेकडे पाठ फिरविल्यामुळे वरुणराजा शेतकऱ्यांवर अवकृपा करीत आहे. शेतकऱ्यांनी १०० टक्के धानाची पेरणी केली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पऱ्हे करपली असून शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यातून काही प्रमाणात पऱ्हे जगविण्यासाठी शेतीला तत्काळ पाण्याची नितांत गरज आहे.भंडारा तालुक्यातील टेकेपार उपसा सिंचन अंतर्गत जवळपास सात हजार हेक्टर ओलिताची शेती असून परिसरातील शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली आहे. १५ दिवस लोटूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे पाणी न आल्यामुळे शेतकऱ्यांचे पऱ्हे वाळू लागले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन टेकेपार उपसा सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी त्वरित पाणी सोडून शेतकऱ्यांचे पऱ्हे वाचवावे यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भंडारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते धावून आले. त्यांनी टेकेपार उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यांना शेतकऱ्यांची १०० टक्के धानाची करपलेली पऱ्हे जिवंत ठेवण्यासाठी उपसा सिंचन कालव्याचे पाणी तात्काळ सोडण्याविषयी निवेदन दिले. कालव्याचे पाणी तत्काळ न सोडल्यास मानेगाव, बोरगाव, सिल्ली, टेकेपार, तिड्डी, मकरधोकडा, गराडा, मेंढा, झबाडा, जाख, बासोरा, गराडा, दवडीपार, येथील शेतकऱ्यांच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. टेकेपार उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी तालुका राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष ईश्वर कळंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव नरेश डहारे, माजी जि.प. उपाध्यक्ष दीपक गजभिये, पं.स. सदस्य रामेश्वर चांदेकर, महेश ढोमणे, विनोद साठवणे, सुनील माकडे, केशव रंगारी, दयानंद नखाते, संतोष हटवार व दिवाकर क्षीरसागर हे कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)