शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

तहसील कार्यालय रामभरोसे

By admin | Updated: February 24, 2016 00:41 IST

१ लाख ५४ हजार लोकसंख्या असलेली पवनी तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रामभरोसे आहे.

रिक्त पदांचा फटका : नागरिकांची पायपीट, आल्यापावली परतण्याची वेळपवनी : १ लाख ५४ हजार लोकसंख्या असलेली पवनी तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रामभरोसे आहे.यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अनेक प्रकरणे निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. येथील तहसीलदाराचा कारभार नायब तहसीलदार तर नायब तहसीलदाराचा कारभार अव्वल कारकून सांभाळीत आहेत. येथे कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पवनी तालुका हा गौण खनीज संपत्तीने भरलेला आहे. या तालुक्यात आठ रेतीघाट, मुरुम, दगड अशा अनेक गौण खनिजाच्या खाणी आहेत. मात्र गौण खनिजाचे रक्षण करणारे महसूल विभागाचे कर्मचारी अल्प प्रमाणात आहेत. रात्रभर जीव मुठीत घेऊन गौण खनिजांचे रक्षण करणे व दिवसभर जनतेचे कामे करणे हे नित्यक्रम ठरले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या अतितानामुळे आरोग्यावर विपरित परिणाम जाणवत आहे. या तालुक्यात ७८ ग्रामपंचायतींचा समावेश असून १५७ गावे व १ लाख ५४ हजार लोकसंख्या आहे. सहा महिण्यापूर्वी तहसीलदार नरेंद्र राचलवार सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून येथील कारभार नायब तहसीलदार महेंद्र वाकलेकर हे प्रभारी म्हणून काम सांभाळीत आहेत. तर येथील अव्वल कारकून चरणदास शेंडे हे प्रभारी नायब तहसीलदारांचा कारभार सांभाळीत आहेत. प्रभारी तहसीलदार कोणत्या ना कोणत्या कामामुळे बाहेर राहत असल्यामुळे कार्यालयात उपस्थित राहत नाही. कर्मचाऱ्यांना रिक्त जागामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे. परिणामी अनेक कर्मचारी मेडीकलच्या सुट्या काढीत आहेत. तर अनेक बदलीच्या मागे लागले आहेत. येथील तहसीलदार कर्मचाऱ्यांना कामावर कमी व गौण संपत्तीचे रक्षण करायला पाठवितात. त्यामुळे जनतेचे कामे खोळंबली आहेत. अजूनपर्यंत रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गौण खनिजाचे रक्षण करताना दमछाक करावी लागते आहे. (शहर प्रतिनिधी)