शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची तांत्रिकदृष्ट्या अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:36 IST

भंडारा : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामस्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. ...

भंडारा : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामस्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून गावात वैयक्तिक आणि सामुदायिक स्वरूपाच्या स्वच्छता सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य देऊन

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची तांत्रिकदृष्ट्या योग्य अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन यांनी केले.

विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांचा त्यांचा दौरा पार पडला. भंडारा जिल्ह्यातील गोंड उमरी येथे त्यांनी नुकत्याच दिलेल्या भेटी दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी सरपंच अल्का उपरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संघमित्रा कोल्हे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय देशमुख, साकोलीचे गटविकास अधिकारी नंदागवळी, नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) किटे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राठोड, उपविभागीय अभियंता हितेश खोब्रागडे, सचिव हेडावू, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अजय गजापुरे, लेखाधिकारी प्रशांत फाये, स्वच्छता तज्ज्ञ गजानन भेदे, समूह समन्वयक जनार्दन डोरले, निरंजन गणवीर उपस्थित होते.

महाजन म्हणाले, यापूर्वी स्वच्छ भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात मिशन मोडवर नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या सुविधांचा फायदा आता ग्रामस्तरावर दिसतो आहे. त्या प्रमाणेच आता ग्रामस्तरावर शाश्वत स्वरूपाच्या स्वच्छता सुविधा उपलब्ध करून ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावयाचे आहे. याकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असून त्यामुळे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अंमलबजावणी योग्य तऱ्हेने करावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला कार्यात्मक नळ जोडणी द्यावी आणि सार्वजनिक शौचालयांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश याप्रसंगी दिले.

अभय महाजन यांनी, साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत गोंड उमरी येथे भेट देऊन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची पाहणी व आढावा घेतला. गोंड उमरी गावात उपलब्ध होऊ घातलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प , सार्वजनिक शौचालय तसेच वैयक्तिक शौचालय बांधकामाबाबत पहाणी केली. त्यांनी, ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर ग्रामस्थ यांचेशी चर्चा करुन वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावर स्वच्छता सुविधा शाश्वत स्वरूपाच्या उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले.