शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची तांत्रिकदृष्ट्या अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:36 IST

भंडारा : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामस्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. ...

भंडारा : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामस्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून गावात वैयक्तिक आणि सामुदायिक स्वरूपाच्या स्वच्छता सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य देऊन

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची तांत्रिकदृष्ट्या योग्य अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन यांनी केले.

विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांचा त्यांचा दौरा पार पडला. भंडारा जिल्ह्यातील गोंड उमरी येथे त्यांनी नुकत्याच दिलेल्या भेटी दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी सरपंच अल्का उपरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संघमित्रा कोल्हे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय देशमुख, साकोलीचे गटविकास अधिकारी नंदागवळी, नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) किटे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राठोड, उपविभागीय अभियंता हितेश खोब्रागडे, सचिव हेडावू, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अजय गजापुरे, लेखाधिकारी प्रशांत फाये, स्वच्छता तज्ज्ञ गजानन भेदे, समूह समन्वयक जनार्दन डोरले, निरंजन गणवीर उपस्थित होते.

महाजन म्हणाले, यापूर्वी स्वच्छ भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात मिशन मोडवर नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या सुविधांचा फायदा आता ग्रामस्तरावर दिसतो आहे. त्या प्रमाणेच आता ग्रामस्तरावर शाश्वत स्वरूपाच्या स्वच्छता सुविधा उपलब्ध करून ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावयाचे आहे. याकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असून त्यामुळे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अंमलबजावणी योग्य तऱ्हेने करावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला कार्यात्मक नळ जोडणी द्यावी आणि सार्वजनिक शौचालयांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश याप्रसंगी दिले.

अभय महाजन यांनी, साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत गोंड उमरी येथे भेट देऊन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची पाहणी व आढावा घेतला. गोंड उमरी गावात उपलब्ध होऊ घातलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प , सार्वजनिक शौचालय तसेच वैयक्तिक शौचालय बांधकामाबाबत पहाणी केली. त्यांनी, ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर ग्रामस्थ यांचेशी चर्चा करुन वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावर स्वच्छता सुविधा शाश्वत स्वरूपाच्या उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले.