शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अधिकाऱ्यांकडून रोहयो कामात हयगय

By admin | Updated: May 21, 2015 00:36 IST

शासन जनहितार्थ अनेक कल्याणकारी योजनांची निर्मिती करते पण क्रियान्वयन यंत्रणेतील अधिकारीच स्वार्थासाठी ...

लाखनी : शासन जनहितार्थ अनेक कल्याणकारी योजनांची निर्मिती करते पण क्रियान्वयन यंत्रणेतील अधिकारीच स्वार्थासाठी ग्रामपंचायत समितीवर दबाव आणून शासनाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशाला तिलांजली देत असल्याचे प्रकार तालुक्यात घडून येत आहेत.ग्रामपंचायतीच्या नावाने पंचायत समितिच्या मग्रारोहयो विभागातील काही तांत्रिक अधिकाऱ्यांनीच कंत्राटदारीचा गोरखधंदा सुरू केल्याचे निर्देशनास येत आहे. यामुळे अंदाजपत्रकात साहित्याच्या किमती वाढविल्या जात असून त्याचा भार शासकीय तिजोरीवर पडत आहे.ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील गरीब कुटूंबातील एका व्यक्तीस वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, मजुरांची आर्थिक सबलीकरणासोबत ग्रामीण भागाचा विकास व्हावा, काही अंशी बेरोजगारीवर मात करता यावी, याकरिता केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाद्वारे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेस सुरूवात केली. राज्यात ही योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सुरू आहे. यात ६० टक्के मजुरप्रधान कामे व ४० टक्क्यापेक्षा सिमेंट कांक्रीट रस्ता, नाली, पानवठा, खडीकरण व मुरूम पसरविणे अशा कुशल कामाचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामविकासाचे उद्दिष्ट असल्याने गावाच्या आवश्यकतेनुसार ग्रामसेवकांच्या माध्यमाने मजूर प्रधान कामे सुचविण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस दिलेले आहेत.ग्रामपंचायतीनी सुचविलेल्या अकुशल व कुशल कामाचे तालुकास्तरीय नियोजन करणे कामाचे अंदाजपत्रक तयार करणे व मंजुर कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज खंडविकास अधिकाऱ्यांना उपलब्ध दस्तऐवज खंडविकास अधिकाऱ्यांना उपलब्ध करणे, मजुरांचे हजेरीपत्रक व झालेल्या कामाचे मोजमाप करून मजुर पगार काढण्यासाठी पंचायत समितीचे अधिनस्त स्वतंत्र महाराष्ट्र रोजगार हमी योजना विभागाची स्थापना करण्यासाठी कंत्राटी तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य मानधनावर ते सेवा देत असतात. खरीप व रब्बी हंगाम संपल्यानंतर मग्रारोहयोची अकुशल कामांना सुरूवात केली जाते. तालुक्याचा संपूर्ण कामांचा रेकॉर्ड या कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्याकडे असल्याने कोणत्या ग्रामपंचायतीत अकुशल कामे पूर्ण झाली आहेत. याची माहिती असते.मजुरप्रधान कामे पूर्ण झालेल्या गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच व सदस्यांशी स्वत: किंवा आपल्या हस्तकामार्फत संपर्क साधून तांत्रिक अधिकारी ठरावाची मागणी करतात. अंदाजपत्रक तयार करताना तांत्रिक अधिकारी शासनाचे नियम पायदळी तुडवून स्वत:चे स्वार्थ जोपासण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्यावर वचक निर्माण होणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने एमआरईजीएसचे कामे नियमानुसार पूर्ण केली जातात.- हेमंत मेहर, संवर्ग विकास अधिकारी लाखनी.