शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा

By admin | Updated: June 29, 2015 00:48 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे धनदाडग्यांचे सरकार आहे.

विखे पाटील : दिघोरी, सिल्ली, अड्याळ, खापा येथे सभादिघोरी / सिल्ली : केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे धनदाडग्यांचे सरकार आहे. शेतकरी शेतमजुरांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ भंडारा जिल्ह्यात आले असता ते बोलत होते. यावेळी त्यांच्या दिघोरी (मोठी), किन्ही (पिंडकेपार), अड्याळ, सिल्ली, खमारी (मोठी), खापा येथे त्यांच्या जाहीरसभा झाल्या. यावेळी मंचावर बाला बच्चन, माजी आमदार सेवक वाघाये, प्रसन्न चकोले, लता हत्तीमारे, गुलाब कापसे उपस्थित होते. राज्य व केंद्र सरकारवर टीका करुन ते म्हणाले, राज्य सरकार मनेरगा, योजना बंद करणार असुन सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना पैसे दिले नाही. धानाला भाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अच्छे दिन कुठे गेले असा प्रश्न करुन शेतकरी, शेतमजुरांना रसातळाला नेणाऱ्या सरकारला धडा शिकवा. ‘कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा’ असा टोलाही राज्य सरकारला लगावला.भाजपचे मंत्री बोगस पदवी मिळवून करुन फसवणूक करीत असून देशात जातीय तेढ निर्माण करीत आहे, त्यांना धडा शिकवा, असा आरोपही पाटील यांनी केला. आभारप्रदर्शन रमेश फुंडे यांनी केले. (वार्ताहर)