शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तथागत बुद्धांचा धम्म हा जगाला तारणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:00 IST

प्रज्ञा म्हणजे ज्ञान, असे ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो. दु:खाचे कारण दुर केले की दु:ख दुर होते. माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दुर करावे लागेल. याचा बोध त्याला होतो. बुध्दांनी पंचशिल दिलेले आहे, त्याचे पालन करावे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : आलेबेदर येथे बुद्ध-भीमगीतांचा जलसा कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतसाकोली : प्रज्ञा म्हणजे ज्ञान, असे ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो. दु:खाचे कारण दुर केले की दु:ख दुर होते. माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दुर करावे लागेल. याचा बोध त्याला होतो. बुध्दांनी पंचशिल दिलेले आहे, त्याचे पालन करावे. तथागत बुद्धांचा धम्म हा जगाला तारणारा आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. आलेबेदर येथे आयोजित बुध्द भिमगीतांचा जलसा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत या होत्या. अतिथी म्हणून महाराष्टÑ शासन पुरस्कार प्राप्त डी.जी. रंगारी, राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुध्द शेवाळे, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, सुभाष कोइारे, मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, संचालक रोशन बडोले, प्राचार्य डी. जी. मळामे, डॉ. अजय अंबादे, दिपक मेश्राम, गायक सुर्यकांता पाटील आदी मंचावर उपस्थित होते.ना. बडोले म्हणाले, शील म्हणजे नियम, समाजात कसे वागावे याचे नियम समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण व्हावी जिचा मुळाधार हा न्याय, समता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि समान संधी हा असेल. शिलपालनाचा आणि मनाचा खुप जवळचा संबंध आहे. कारण मनावर ताबा असला तरच शिल पाळता येते. एखाद्या व्यसनातुन बाहेर पडावे, असे त्याला वाटत असते पण मनावर ताबा नसल्यामुळे तो परत परत त्या चक्रात अडकला जातो. मनावर संयम मिळविण्याकरिता गौतम बुध्दाने समाधीचा पुरस्कार केला अशी समाधी शिकविली. जीचा मुळाधार निसर्गनियम आहे. श्वास आणि संवेदनावर आधारित साधना शिकविली. जी साधना कोणताही माणुस सहन करु शकतो. त्यातुन मन एकाग्र होते आणि मनावर ताबा येतो.डी. जी. रंगारी यांनी प्रास्ताविकातून, आलेबेदर येथील त्रिरत्न बौध्दविहार येथे वर्षभर कसे विविध उपक्रम राबविले जातात व माणुस बनविण्याचा ठिकाण आलेबेदर आहे. येथुनच धम्मज्ञान उपासक घेऊन जातात असे सांगितले. त्यानंतर सर्वच गायकांनी भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतातून प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शीलकुमार वैद्य यानी तर आभार कव्वाल मनोज कोटागले यांनी केले.ना. राजकुमार बडोले यांनी पण आपल्या धम्मभूमीत एक तास बसुन गीत ऐकले. या भिमजलस संगिताच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी झालेली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिक्खु संघज्योती, भिक्खु जीवन ज्योती, भिक्खु नागसेन, भिक्खु आनंद, भिक्खु विनय ज्योती, भिक्खु बोधीपालो, भिक्खु विपस्सी, भिक्खु मेत्तासेन, श्रामणेर विद्यानंद, पिदक मेश्राम, डी. जी. रंगारी, कल्पना सांगोडे, अर्चना रामटेके, प्रज्ञा दिरबुडे, सुमित संबोधी, मनोज कोटांगले व सर्व समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला हे विशेष.