शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

तथागत बुद्धांचा धम्म हा जगाला तारणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:00 IST

प्रज्ञा म्हणजे ज्ञान, असे ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो. दु:खाचे कारण दुर केले की दु:ख दुर होते. माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दुर करावे लागेल. याचा बोध त्याला होतो. बुध्दांनी पंचशिल दिलेले आहे, त्याचे पालन करावे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : आलेबेदर येथे बुद्ध-भीमगीतांचा जलसा कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतसाकोली : प्रज्ञा म्हणजे ज्ञान, असे ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो. दु:खाचे कारण दुर केले की दु:ख दुर होते. माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दुर करावे लागेल. याचा बोध त्याला होतो. बुध्दांनी पंचशिल दिलेले आहे, त्याचे पालन करावे. तथागत बुद्धांचा धम्म हा जगाला तारणारा आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. आलेबेदर येथे आयोजित बुध्द भिमगीतांचा जलसा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत या होत्या. अतिथी म्हणून महाराष्टÑ शासन पुरस्कार प्राप्त डी.जी. रंगारी, राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुध्द शेवाळे, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, सुभाष कोइारे, मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, संचालक रोशन बडोले, प्राचार्य डी. जी. मळामे, डॉ. अजय अंबादे, दिपक मेश्राम, गायक सुर्यकांता पाटील आदी मंचावर उपस्थित होते.ना. बडोले म्हणाले, शील म्हणजे नियम, समाजात कसे वागावे याचे नियम समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण व्हावी जिचा मुळाधार हा न्याय, समता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि समान संधी हा असेल. शिलपालनाचा आणि मनाचा खुप जवळचा संबंध आहे. कारण मनावर ताबा असला तरच शिल पाळता येते. एखाद्या व्यसनातुन बाहेर पडावे, असे त्याला वाटत असते पण मनावर ताबा नसल्यामुळे तो परत परत त्या चक्रात अडकला जातो. मनावर संयम मिळविण्याकरिता गौतम बुध्दाने समाधीचा पुरस्कार केला अशी समाधी शिकविली. जीचा मुळाधार निसर्गनियम आहे. श्वास आणि संवेदनावर आधारित साधना शिकविली. जी साधना कोणताही माणुस सहन करु शकतो. त्यातुन मन एकाग्र होते आणि मनावर ताबा येतो.डी. जी. रंगारी यांनी प्रास्ताविकातून, आलेबेदर येथील त्रिरत्न बौध्दविहार येथे वर्षभर कसे विविध उपक्रम राबविले जातात व माणुस बनविण्याचा ठिकाण आलेबेदर आहे. येथुनच धम्मज्ञान उपासक घेऊन जातात असे सांगितले. त्यानंतर सर्वच गायकांनी भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतातून प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शीलकुमार वैद्य यानी तर आभार कव्वाल मनोज कोटागले यांनी केले.ना. राजकुमार बडोले यांनी पण आपल्या धम्मभूमीत एक तास बसुन गीत ऐकले. या भिमजलस संगिताच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी झालेली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिक्खु संघज्योती, भिक्खु जीवन ज्योती, भिक्खु नागसेन, भिक्खु आनंद, भिक्खु विनय ज्योती, भिक्खु बोधीपालो, भिक्खु विपस्सी, भिक्खु मेत्तासेन, श्रामणेर विद्यानंद, पिदक मेश्राम, डी. जी. रंगारी, कल्पना सांगोडे, अर्चना रामटेके, प्रज्ञा दिरबुडे, सुमित संबोधी, मनोज कोटांगले व सर्व समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला हे विशेष.