शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नळाला पुरेसे पाणी येईना; वाढीव योजना असूनही नागरिक मात्र तहानलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:19 IST

Bhandara : भंडारा शहरातील हनुमान नगर आणि आनंदनगरातील व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्थानिक नगरपालिका प्रशासनाने वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मात्र नवीन नळजोडणी देऊनही आजही अनेकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड निर्माण झाली आहे. भंडाऱ्यातील तकीया वॉर्डाला लागून असलेल्या हनुमाननगर, आनंदनगर तथा समुद्धीनगरातील भागात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

नळधारक वाढल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यकालीन वाढीव पाणीपुरठा योजना, असे या योजनेचे नाव असताना वाढणारी लोकसंख्या ही गृहीत धरण्यात आली नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वाढीव पाणीपुरवठ्यावर कोट्यवधींचा खर्च झाल्यानंतर आता पाणी मुबलक पाणी कसे मिळणार, हा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. नियोजनशून्यतेमुळे शहराच्या अन्य भागांतही नळाला पाणी येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नदीत पाण्याची कमतरता नाही; पण मुबलक पाणी देण्यात प्रशासन कमी पडत आहे.

अन्य भागांतही समस्याशहराच्या आनंदनगरासह अन्य भागांतही पाण्याची समस्या आहे. सदोष पाइपलाइनमुळे असो की अन्य कारणांमुळे येथील अनेक घरांना पुरेसे पाणी मिळत नाही.

मोफत पाणीपुरवठाशहरातील मोजकेच माजी नगरसेवक पाणीटंचाई असलेल्या भागात स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. हा उपक्रम ते कित्येक महिन्यांपासून राबवित आहेत.

नागरिकांना आर्थीक भूर्दंडप्रशासनाच्या वतीने उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना केली जात नसल्याने शहरवासीयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो.

अनेक गावांतील हातपंप आणि विहिरी तळ गाठतात.शहरासह तालुक्याच्या अनेक गावांतील हातपंप आणि विहिरी तळ गाठतात. परिणामी, ग्रामीण महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याकडे जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे समजते. शहराच्या स्लम परिसरात नळाची पाइपलाइन नाही. वाढीव वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या आहे. नगरपालिका प्रशासनाची खूप जुनी नळ पाइपलाइन असल्याने पाण्याचे वितरण असमान होते. याचा फटका बऱ्याच कुटुंबांना बसत असतो.

उपाययोजना आवश्यकफेब्रुवारीअखेर मार्च तसेच एप्रिल महिन्यांत या भागात नळाला पुरेसे पाणी येत नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी प्रशासनाने आधीच उपाययोजना करणे आवश्यक बाब आहे. मात्र याकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.

३५ रुपये मोजून प्रतिकॅन दररोज पाणी घ्यावे लागत आहेउन्हाळ्यात भंडारा शहरात नळाला पुरेसे पाणी येत नाही. नळाचे पाणी पिण्यायोग्यही नाही. बारमाही कॅन खरेदी करावी लागते. याचा नाहक भूर्दंड नागरिक सहन करतात.

उंच भागात पाणी मिळेना..

  • शहरातील म्हाडा कॉलनी परिसर, खात रोड भाग, शुक्रवारी परिसर तसेच उंच भागात नळाला पुरेसे पाणी मिळत नसल्याची माहिती आहे.
  • उन्हाळ्यातील दोन-तीन महिने पाण्याची समस्या भेडसावते. या भागांमध्ये टँकरने पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
  • उल्लेखनीय म्हणजे शासकीय दप्तरी टँकरमुक्त जिल्हा म्हणून नोंद आहे, हे येथे उल्लेखनीय
टॅग्स :water transportजलवाहतूकbhandara-acभंडारा