शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नळाला पुरेसे पाणी येईना; वाढीव योजना असूनही नागरिक मात्र तहानलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:19 IST

Bhandara : भंडारा शहरातील हनुमान नगर आणि आनंदनगरातील व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्थानिक नगरपालिका प्रशासनाने वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मात्र नवीन नळजोडणी देऊनही आजही अनेकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड निर्माण झाली आहे. भंडाऱ्यातील तकीया वॉर्डाला लागून असलेल्या हनुमाननगर, आनंदनगर तथा समुद्धीनगरातील भागात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

नळधारक वाढल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यकालीन वाढीव पाणीपुरठा योजना, असे या योजनेचे नाव असताना वाढणारी लोकसंख्या ही गृहीत धरण्यात आली नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वाढीव पाणीपुरवठ्यावर कोट्यवधींचा खर्च झाल्यानंतर आता पाणी मुबलक पाणी कसे मिळणार, हा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. नियोजनशून्यतेमुळे शहराच्या अन्य भागांतही नळाला पाणी येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नदीत पाण्याची कमतरता नाही; पण मुबलक पाणी देण्यात प्रशासन कमी पडत आहे.

अन्य भागांतही समस्याशहराच्या आनंदनगरासह अन्य भागांतही पाण्याची समस्या आहे. सदोष पाइपलाइनमुळे असो की अन्य कारणांमुळे येथील अनेक घरांना पुरेसे पाणी मिळत नाही.

मोफत पाणीपुरवठाशहरातील मोजकेच माजी नगरसेवक पाणीटंचाई असलेल्या भागात स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. हा उपक्रम ते कित्येक महिन्यांपासून राबवित आहेत.

नागरिकांना आर्थीक भूर्दंडप्रशासनाच्या वतीने उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना केली जात नसल्याने शहरवासीयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो.

अनेक गावांतील हातपंप आणि विहिरी तळ गाठतात.शहरासह तालुक्याच्या अनेक गावांतील हातपंप आणि विहिरी तळ गाठतात. परिणामी, ग्रामीण महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याकडे जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे समजते. शहराच्या स्लम परिसरात नळाची पाइपलाइन नाही. वाढीव वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या आहे. नगरपालिका प्रशासनाची खूप जुनी नळ पाइपलाइन असल्याने पाण्याचे वितरण असमान होते. याचा फटका बऱ्याच कुटुंबांना बसत असतो.

उपाययोजना आवश्यकफेब्रुवारीअखेर मार्च तसेच एप्रिल महिन्यांत या भागात नळाला पुरेसे पाणी येत नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी प्रशासनाने आधीच उपाययोजना करणे आवश्यक बाब आहे. मात्र याकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.

३५ रुपये मोजून प्रतिकॅन दररोज पाणी घ्यावे लागत आहेउन्हाळ्यात भंडारा शहरात नळाला पुरेसे पाणी येत नाही. नळाचे पाणी पिण्यायोग्यही नाही. बारमाही कॅन खरेदी करावी लागते. याचा नाहक भूर्दंड नागरिक सहन करतात.

उंच भागात पाणी मिळेना..

  • शहरातील म्हाडा कॉलनी परिसर, खात रोड भाग, शुक्रवारी परिसर तसेच उंच भागात नळाला पुरेसे पाणी मिळत नसल्याची माहिती आहे.
  • उन्हाळ्यातील दोन-तीन महिने पाण्याची समस्या भेडसावते. या भागांमध्ये टँकरने पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
  • उल्लेखनीय म्हणजे शासकीय दप्तरी टँकरमुक्त जिल्हा म्हणून नोंद आहे, हे येथे उल्लेखनीय
टॅग्स :water transportजलवाहतूकbhandara-acभंडारा