शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

नळाला पुरेसे पाणी येईना; वाढीव योजना असूनही नागरिक मात्र तहानलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:19 IST

Bhandara : भंडारा शहरातील हनुमान नगर आणि आनंदनगरातील व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्थानिक नगरपालिका प्रशासनाने वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मात्र नवीन नळजोडणी देऊनही आजही अनेकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड निर्माण झाली आहे. भंडाऱ्यातील तकीया वॉर्डाला लागून असलेल्या हनुमाननगर, आनंदनगर तथा समुद्धीनगरातील भागात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

नळधारक वाढल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यकालीन वाढीव पाणीपुरठा योजना, असे या योजनेचे नाव असताना वाढणारी लोकसंख्या ही गृहीत धरण्यात आली नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वाढीव पाणीपुरवठ्यावर कोट्यवधींचा खर्च झाल्यानंतर आता पाणी मुबलक पाणी कसे मिळणार, हा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. नियोजनशून्यतेमुळे शहराच्या अन्य भागांतही नळाला पाणी येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नदीत पाण्याची कमतरता नाही; पण मुबलक पाणी देण्यात प्रशासन कमी पडत आहे.

अन्य भागांतही समस्याशहराच्या आनंदनगरासह अन्य भागांतही पाण्याची समस्या आहे. सदोष पाइपलाइनमुळे असो की अन्य कारणांमुळे येथील अनेक घरांना पुरेसे पाणी मिळत नाही.

मोफत पाणीपुरवठाशहरातील मोजकेच माजी नगरसेवक पाणीटंचाई असलेल्या भागात स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. हा उपक्रम ते कित्येक महिन्यांपासून राबवित आहेत.

नागरिकांना आर्थीक भूर्दंडप्रशासनाच्या वतीने उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना केली जात नसल्याने शहरवासीयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो.

अनेक गावांतील हातपंप आणि विहिरी तळ गाठतात.शहरासह तालुक्याच्या अनेक गावांतील हातपंप आणि विहिरी तळ गाठतात. परिणामी, ग्रामीण महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याकडे जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे समजते. शहराच्या स्लम परिसरात नळाची पाइपलाइन नाही. वाढीव वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या आहे. नगरपालिका प्रशासनाची खूप जुनी नळ पाइपलाइन असल्याने पाण्याचे वितरण असमान होते. याचा फटका बऱ्याच कुटुंबांना बसत असतो.

उपाययोजना आवश्यकफेब्रुवारीअखेर मार्च तसेच एप्रिल महिन्यांत या भागात नळाला पुरेसे पाणी येत नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी प्रशासनाने आधीच उपाययोजना करणे आवश्यक बाब आहे. मात्र याकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.

३५ रुपये मोजून प्रतिकॅन दररोज पाणी घ्यावे लागत आहेउन्हाळ्यात भंडारा शहरात नळाला पुरेसे पाणी येत नाही. नळाचे पाणी पिण्यायोग्यही नाही. बारमाही कॅन खरेदी करावी लागते. याचा नाहक भूर्दंड नागरिक सहन करतात.

उंच भागात पाणी मिळेना..

  • शहरातील म्हाडा कॉलनी परिसर, खात रोड भाग, शुक्रवारी परिसर तसेच उंच भागात नळाला पुरेसे पाणी मिळत नसल्याची माहिती आहे.
  • उन्हाळ्यातील दोन-तीन महिने पाण्याची समस्या भेडसावते. या भागांमध्ये टँकरने पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
  • उल्लेखनीय म्हणजे शासकीय दप्तरी टँकरमुक्त जिल्हा म्हणून नोंद आहे, हे येथे उल्लेखनीय
टॅग्स :water transportजलवाहतूकbhandara-acभंडारा