शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्या निद्रिस्त

By admin | Updated: November 21, 2015 00:26 IST

राज्य शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने १५ आॅगस्ट २०१५ रोजी नवव्या वर्षात पदार्पण केले; ...

ग्रामीण भागात वाढले तंटे : ग्रामसहभागांअभावी उद्देश अपूर्णचभंडारा : राज्य शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने १५ आॅगस्ट २०१५ रोजी नवव्या वर्षात पदार्पण केले; मात्र या समित्या निद्रिस्त असून, ग्रामीण भागात तंटे वाढले आहेत. या मोहिमेबाबत असलेला गावांचा उत्साह दिवसेंदिवस ओसरत असल्याचे दिसून येत आहे. गावोगावी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली जात आहे; मात्र समितीचे पदाधिकारी व सदस्यांना कार्यशाळेद्वारे मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.राज्य शासनाच्या गृह विभागाने सन २००७ ते २००८ या वषार्पासून तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. शांततेतून समृद्धीकडे हा मंत्र देणाऱ्या मोहिमेला वर्षा-दोन वर्षातच लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नये, झालेच तर ते तंटे गावपातळीवर मिटवून गावात शांतता निर्माण व्हावी.अवैध धंद्यांना आळा बसावा, गावात व्यसनमुक्ती व्हावी, गावातील सण- उत्सव गावकऱ्यांनी एकोप्याने साजरे करावे, गावात अनिष्ट रूढी व चालीरितींना थारा मिळू नये, गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, विधवा यांना सुरक्षितता मिळून त्यांना गावात सन्मानाचे स्थान मिळावे, एकूणच गावाने विकासाची कास धरावी, हा या मोहिमेचा मूळ उद्देश आहे. या मोहिमेला प्रोत्साहन म्हणून गावांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एक ते १० लाखांपर्यंतचे बक्षीसही ठेवण्यात आले. त्यामुळे अनेक गावांनी पहिल्या वर्षातच आपले गाव तंटामुक्त करून बक्षीस पदरी पाडून घेतले. मोहिमेच्या सुरुवातीच्या सहा वर्षांच्या काळात राज्यातील हजारो गावे तंटामुक्त झाली. लाखो तंटे गावाच्या समित्यांनी गावातच मिटवून एक आदर्श निर्माण केला. परिणामी, पोलीस ठाणे व न्यायालयावरील बराचसा भार कमी झाला. ग्रामीण तंटामुक्त समित्या ग्राम न्यायालयाच्या भूमिका पार पाडू लागल्या आहेत.राज्यासाठी गर्वाची बाब म्हणजे, या मोहिमेची देश पातळीवरच नव्हे तर इतर काही देशांनीही दखल घेतली. मोहिमेत सहभागी गावांचा आलेख दरवर्षी वाढतच राहिला. आता संपूर्ण राज्य तंटामुक्त होण्याची संधी जवळ आली आहे; मात्र अनेक गावांच्या तंटामुक्त समित्यांना अजूनही या मोहिमेचे स्वरूपच समजले नाही. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. १५ आॅगस्ट ते ३० आॅगस्टपर्यंत गावागावात ग्रामसभा घेऊन तंटामुक्त गाव समितीचे गठण करण्यात आले आहे. उरलेल्या गावांनी आता आपले गाव मोहिमेत सहभागी करण्याचे ठराव केले आहेत. आता त्यांना वर्षभर काम करायचे, नोंदवहीमध्ये नोंदी कशा घ्यायच्या, याचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. आता पोलीस व महसूल विभागाने पुढाकार घेऊन समित्यांना धडे देण्याची गरज आहे. अनेक समित्यांना जुने-नवे तंटे यांचे वर्गीकरण तसेच फौजदारी, महसुली, दिवाणी व इतर खटले यामध्ये तंट्यांचे वर्गीकरण करता येत नाही. नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्यांनाच प्रलंबित तंट्यांमध्ये टाकले जाते. गावात तंटे प्रलंबित नसल्यास तसे प्रमाणपत्र पोलीस व महसूल विभागाकडून घ्यावे लागते. अन्यथा गुण मिळत नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर ८० गुण आहेत; मात्र समित्यांचा जोर केवळ सण-उत्सवाच्या १० गुणांवरच असतो. उरलेल्या ७० गुणांच्या प्राप्तीकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक गावाला राज्य शासनाकडून दोन हजार रुपयांचे अर्थ सहाय्य दिले जाते. (नगर प्रतिनिधी)