शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘तंमुस’ अध्यक्षाला द्यावा लागेल चारित्र्याचा दाखला

By admin | Updated: March 21, 2016 00:26 IST

तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होणे आता कठीण झाले आहे.

भंडारा : तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होणे आता कठीण झाले आहे. अध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्यांना आता पोलिसांकडून चारित्र्याचा दाखला घ्यावा लागणार आहे. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत अनेक तंटे निर्माण होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.'शांततेतून समृद्धीकडे' असे ब्रीदवाक्य घेऊन २००७ मध्ये शासनाने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियानाची सुरुवात केली आहे. गावातील तंटे गावातच मिटावेत तसेच गावाची आर्थिक परिस्थिती सुधारून गावाच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या तंटामुक्ती मोहिमेच्या अध्यक्षपदासाठीच गावात तंटे निर्माण होत आहेत. या समितीच्या अध्यक्षपदाची सुत्रे गुंडप्रवृत्ती, अवैध धंदे करणारे यासह समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींच्या लोकांच्या हाती जाऊ नये, यासाठी शासनाने यापुढे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व्हायचे असेल तर अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांना आता प्रथम संबंधित पोलिस ठाण्यातून वर्तणूक दाखला घ्यावा लागणार आहे. समितीच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या अध्यक्षाने किंवा समितीमधील सदस्यांनी जर गैरवर्तन केले तर त्यांचे पद तात्काळ रद्द करण्याचा आदेश काढला आहे. तंटामुक्ती मोहिमेची सक्षमपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, पोलिस ठाण्यांच्या पातळीवर व गावपातळीवर तंटामुक्ती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या स्थापन करताना यामध्ये गुंडप्रवृत्ती नसलेले, अवैध धंदे करत नसलेले, प्रतिष्ठीत, समजुतदार, सामाजिक प्रश्नांची जाण असलेले, नि:स्वार्थी, चांगले चारित्र्य व निर्व्यसनी असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. गुंडप्रवृत्ती, कडव्या जातीय विचारसणीचे, अवैध धंदे करणारे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ग्रामस्थांना या समितीच्या पदांपासून लांबच ठेवण्यासाठी शासनाने नव्याने ही तरतूद केली आहे. गावात शांतता टिकून राहावी व गावाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला जिल्ह्यासह राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असताना अनेक गावांमध्ये अध्यक्षपदासाठी गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीची निवड होत होती. हा प्रकार आता बंद होणार आहे. (नगर प्रतिनिधी)