शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

सदोष कृषी केंद्रावर कडक कारवाई करा

By admin | Updated: June 10, 2016 00:56 IST

बोगस व निकृष्ठ बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या भरारी

जिल्हाधिकारी यांचे निर्देश : तपासणी पथकात दोन शेतकऱ्यांचा समावेश भंडारा : बोगस व निकृष्ठ बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाने नियमानुसार व काटेकोरपणे तपासणी करावी. तसेच या तपासणीमध्ये दोन शेतकऱ्यांना साक्षीदार म्हणून समाविष्ट करण्यात यावे. दोषी आढळणाऱ्या कृषी केंद्रावर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत.कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा कृषि विस्तार अधिकारी एस.एस. किरवे तसेच सर्व पंचायत समिती कृषि विस्तार अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात एकूण ४८२ कृषि केंद्र, ६८६ खत केंद्र आणि ४३२ दुकानांमध्ये किटकनाशके विक्रीसाठी ठेवण्यात येतात. यापैकी १९० कृषि केंद्र, २०९ खते आणि १२७ किटकनाशकांच्या दुकानांची भरारी पथकाने तपासणी केली. यामध्ये ६ दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली असून १२ दुकानांना दोषी आढळलेले बियाणे व खते विक्री बंद करण्यास नोटीस दिली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात धान लागवडीसाठी ३३ हजार २०० क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून त्यापैकी १८ हजार ६७७ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तसेच तुर ६५० क्विंटल मागणी आणि सोयाबिन ३८०० क्विंटलची मागणी आहे.त्याचबरोबर ८९ हजार ८३५ मेट्रीक टन खताची मागणी असून त्यापैकी ७४ हजार ४०० मेट्रीक टन मंजूर असून १६ हजार ८०६ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात ५० टक्के मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप झाले आहे. मृद आरोग्य पत्रिकेनुसारच शेतकऱ्यांनी खतांचा वापर करावा आणि दुकानदारांनी तीच खते शेतकऱ्यांना विकावित. त्यांच्या फायद्यासाठी कोणतीही खते शेतकऱ्यांना विकू नयेत. तसेच खतांचे लिंकींग करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना दिलेत. खत व बियाण्यांचे घोषित केलेले कंपनीनिहाय दर शेतकऱ्यांना कळवावेत. त्यासाठी कृषी केंद्रावर त्याची माहिती उपलब्ध असावी. स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण केंद्राची माहिती सर्व लोकप्रतिनिधींना द्यावी. तसेच तक्रार निवारण केंद्राचा टोल फ्री क्रमांक सर्व शेतकऱ्यांना एस.एम.एस.द्वारे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कळवावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. (नगर प्रतिनिधी)