शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दादा, ताई सायकल घे. पण शाळेत ये!

By admin | Updated: May 22, 2014 00:52 IST

सध्या सर्वत्र शाळांमध्ये विद्यार्थी भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबद रोजच चर्चा होतात.

सध्या सर्वत्र शाळांमध्ये विद्यार्थी भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबद रोजच चर्चा होतात. गुरुजींची विद्यार्थ्यांसाठी पायपीट, भटकंतीे असे शब्द रोजच कानी पडतात. मात्र यात विशेष म्हणजे आपल्या शाळेची विद्यार्थ्यांअभावी तुकडी तुटू नये आणि शाळेचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी गुरुजी तन-मन-धनाने कामाला लागले आहेत. जिल्हय़ातील बहुतेक भागात विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शाळेत येण्यासाठी विविध अटी घातल्या आणि या अटी गुरुजी मागचा पुढचा विचार न करता पूर्ण करीत आहेत. यासाठी गुरुजींनी अर्थात शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी सायकल देण्याचे ठरविले आणि गुरुजी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन म्हणताहेत, दादा, ताई सायकल घे, पण आमच्याच शाळेत ये.

विविध शाळांमध्ये विद्यार्थी भरतीसाठी स्पर्धा सुरू आहे. एका शाळेनी सायकल दिली तर दुसर्‍याही शाळेला सायकल देण्याचा उपक्रम करावा लागत आहे. यासाठी शाळेतील शिक्षक आपल्या पगाराचा काही भाग खर्च करत असल्याची माहिती आहे. खाजगी किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असोत हा प्रकार आता काही नवीन नाही. एका सायकल व्यावसायीकाची भेट घेऊन विचारणा केली असता मे-जून च्या महिन्यात सायकलची विक्रमी मागणी होते आणि ती विविध शाळांच्या माध्यमातून करण्यात येते असे त्यांनी सांगितले. एका सायकलचा विचार करता अडीच ते तीन हजार चा खर्च शिक्षक एका विद्यार्थ्यांमागे करीत आहेत. यासाठी महिन्याच्या पगाराचा काही हिस्सा विद्यार्थी भरतीप्रक्रियेसाठी खर्च करण्यात येत आहे.

शाळा प्रशासन गावागावात विद्यार्थ्यांच्या भेटी घेताना विद्यार्थ्यांंना आम्ही तुला कपडे देऊ, पुस्तक देऊ, जाण्यायेण्यासाठी सायकल देऊ आणि एवढंच नाही तर १0 वी, १२ व्या वर्गात पास करण्याची हमी देतानाचे चित्र आहे. यावरुन शैक्षणिक विकास ग्रामीण व शहरी भागात कितपत साधता येईल हा प्रश्न आहे.

स्पर्धेच्या युगात आकर्षक शाळा, उपक्रमशील शैक्षणिक वातावरण इत्यादी बाबी शोधून पालक आपल्या पाल्याना शाळेत पाठवताना दिसतात आणि या स्पर्धेत बोटावर मोजण्याइतपत शाळा आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती फार गंभीर आहे. सायकल, पैसा, कपडे यापेक्षा शिक्षण महत्वाचे आहे हे अजून कित्येक विद्यार्थी आणि पालकांना कळलेच नाही.

ज्या शाळेनी विविध स्कीम दिल्या तुमच्याकडे विद्यार्थी पाठवतो तुम्ही कोणती स्कीम देता असा स्कीमचा खेळ शिक्षणाचा खेळखंडोबा करीतअ आहे. अनेक शाळांचे शिक्षक वैतागले असून नोकरी वाचविण्यासाठी आता सर्वकाही असा नारा देताना दिसत आहेत. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ताई-दादा म्हणत मनधरणी तर सुरूच आहे. पण वेळ आली तर विद्यार्थ्यांंचे पाय धरण्याची वेळ आली तर तेही करावच लागेल अशी परिस्थिती आहे.