शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

दादा, ताई सायकल घे. पण शाळेत ये!

By admin | Updated: May 22, 2014 00:52 IST

सध्या सर्वत्र शाळांमध्ये विद्यार्थी भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबद रोजच चर्चा होतात.

सध्या सर्वत्र शाळांमध्ये विद्यार्थी भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबद रोजच चर्चा होतात. गुरुजींची विद्यार्थ्यांसाठी पायपीट, भटकंतीे असे शब्द रोजच कानी पडतात. मात्र यात विशेष म्हणजे आपल्या शाळेची विद्यार्थ्यांअभावी तुकडी तुटू नये आणि शाळेचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी गुरुजी तन-मन-धनाने कामाला लागले आहेत. जिल्हय़ातील बहुतेक भागात विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शाळेत येण्यासाठी विविध अटी घातल्या आणि या अटी गुरुजी मागचा पुढचा विचार न करता पूर्ण करीत आहेत. यासाठी गुरुजींनी अर्थात शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी सायकल देण्याचे ठरविले आणि गुरुजी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन म्हणताहेत, दादा, ताई सायकल घे, पण आमच्याच शाळेत ये.

विविध शाळांमध्ये विद्यार्थी भरतीसाठी स्पर्धा सुरू आहे. एका शाळेनी सायकल दिली तर दुसर्‍याही शाळेला सायकल देण्याचा उपक्रम करावा लागत आहे. यासाठी शाळेतील शिक्षक आपल्या पगाराचा काही भाग खर्च करत असल्याची माहिती आहे. खाजगी किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असोत हा प्रकार आता काही नवीन नाही. एका सायकल व्यावसायीकाची भेट घेऊन विचारणा केली असता मे-जून च्या महिन्यात सायकलची विक्रमी मागणी होते आणि ती विविध शाळांच्या माध्यमातून करण्यात येते असे त्यांनी सांगितले. एका सायकलचा विचार करता अडीच ते तीन हजार चा खर्च शिक्षक एका विद्यार्थ्यांमागे करीत आहेत. यासाठी महिन्याच्या पगाराचा काही हिस्सा विद्यार्थी भरतीप्रक्रियेसाठी खर्च करण्यात येत आहे.

शाळा प्रशासन गावागावात विद्यार्थ्यांच्या भेटी घेताना विद्यार्थ्यांंना आम्ही तुला कपडे देऊ, पुस्तक देऊ, जाण्यायेण्यासाठी सायकल देऊ आणि एवढंच नाही तर १0 वी, १२ व्या वर्गात पास करण्याची हमी देतानाचे चित्र आहे. यावरुन शैक्षणिक विकास ग्रामीण व शहरी भागात कितपत साधता येईल हा प्रश्न आहे.

स्पर्धेच्या युगात आकर्षक शाळा, उपक्रमशील शैक्षणिक वातावरण इत्यादी बाबी शोधून पालक आपल्या पाल्याना शाळेत पाठवताना दिसतात आणि या स्पर्धेत बोटावर मोजण्याइतपत शाळा आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती फार गंभीर आहे. सायकल, पैसा, कपडे यापेक्षा शिक्षण महत्वाचे आहे हे अजून कित्येक विद्यार्थी आणि पालकांना कळलेच नाही.

ज्या शाळेनी विविध स्कीम दिल्या तुमच्याकडे विद्यार्थी पाठवतो तुम्ही कोणती स्कीम देता असा स्कीमचा खेळ शिक्षणाचा खेळखंडोबा करीतअ आहे. अनेक शाळांचे शिक्षक वैतागले असून नोकरी वाचविण्यासाठी आता सर्वकाही असा नारा देताना दिसत आहेत. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ताई-दादा म्हणत मनधरणी तर सुरूच आहे. पण वेळ आली तर विद्यार्थ्यांंचे पाय धरण्याची वेळ आली तर तेही करावच लागेल अशी परिस्थिती आहे.