शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उपसा सिंचन योजनेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:55 IST

देशामध्ये सर्वत्र भाजप सरकारची कामे बेधडक सुरु आसहेत तरी पण विरोधक टीका करीत आहेत. सरकार लोकांची कामे करीत नाही असा आरोप सर्रासपणे विरोधक करतात.

ठळक मुद्देतारिक कुरैशी : मुख्य कालव्याचा भूमिपूजन समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : देशामध्ये सर्वत्र भाजप सरकारची कामे बेधडक सुरु आसहेत तरी पण विरोधक टीका करीत आहेत. सरकार लोकांची कामे करीत नाही असा आरोप सर्रासपणे विरोधक करतात. वास्तविक पाहता अनेक शासनाच्या योजना सुरु असून त्याचा लाभ जनतेनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केले. ते गोसे (बु.) उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले, या कालव्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून शेतकºयांना आता १२ महिने पिक घेता येईल. लिफ्ट एरिकेशन ही एक शासनाची चांगली योजना असून त्याचा फायदा शेतकºयांनी घ्यावा. भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्य अतिथी आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, डॉ.उल्हास फडके, पवनी भाजपा शहर अध्यक्ष हरिश तलमले, जिल्हा भाजपा सचिव धनराज जिभकाटे, जिल्हा भाजपा डॉक्टर सेलचे अध्यक्ष संदीप खंगार, डावा कालव्याचे कार्याकरी अभियंता झोड, मुख्य अधीक्षक नार्वेकर, माजी जि.प. सदस्य डॉ.हरडे, पाटील, प्रकाश बिलवणे आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते भूमिपूजन फलकाचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक डावा कालव्याचे शाखा अभियंता कमाने यांनी केले. कार्यकारी अभियंता झोड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डाव्या कालव्यावर ११ उपसा सिंचन योजना त्वरीत कार्यान्वित करण्यात येत आहेत. पाईप लाईन टाकून त्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पिके घेता येणार आहेत. याचा लाभ कित्येक शेतकºयांना होईल अशा प्रकारचा नवीन उपक्रम डाव्या कालव्यावर प्रथमच करण्यात येत आहे. या डाव्या कालव्यातून ११ कि.मी. पर्यंतची गावे सिंचनखाली येणार असून यात गोसे, पात्री, वासेळा, कुर्झा, इटगाव, रुयाळ, सिंदपुरी या गावांचा समावेश आहे. जवळ जवळ ७००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून ११ लिफ्ट ऐरिकेशन बसविण्यात येणार असून याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. डॉ.उल्हास फडके म्हणाले की, गोसे धरणाची कामे मागे पडलीत. ३७२ कोटींचा प्रकल्प आज हजारो कोटी मध्ये गेलेला आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था निर्माण करून पिकाचे नियोजन करावे. सर्वांनी समान पिके घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पाण्याचे नियोजन करता येईल. याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, पाणी पुरवठा व्यवस्थापन समितीचे कार्य महत्वाचे आहे. कित्येक पाणी पुरवठा संस्था विजेचे बिल भरत नाही. त्या तोट्यात जातात. त्यामुळे चांगले सदस्य या समितीवर नियुक्त करावेत. जेणेकरून उपसा सिंचन योजना तोट्यात जाणार नाही. कार्यक्रमाचे संचालन शाखा अभियंता यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर कावळे, किशोर ब्राम्हणकर, सुरेश आयतुलवार, दिगांबर दावळे, शैलेश मरगडे, शेखर भगत, खेमराज देशमुख, द्रोपद धारगावे, प्रकाश बिलवणे, डॉ.विनायक फुंडे, डॉ.उल्हास हरडे, अनुराधा बुराडे, राजेश चोपकर, दिलीप भेंडारकर, अतुल मुलकलवार, तिलक वैद्य, मच्छींद्र हटवार आदी उपस्थित होते.