शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचन योजनेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:55 IST

देशामध्ये सर्वत्र भाजप सरकारची कामे बेधडक सुरु आसहेत तरी पण विरोधक टीका करीत आहेत. सरकार लोकांची कामे करीत नाही असा आरोप सर्रासपणे विरोधक करतात.

ठळक मुद्देतारिक कुरैशी : मुख्य कालव्याचा भूमिपूजन समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : देशामध्ये सर्वत्र भाजप सरकारची कामे बेधडक सुरु आसहेत तरी पण विरोधक टीका करीत आहेत. सरकार लोकांची कामे करीत नाही असा आरोप सर्रासपणे विरोधक करतात. वास्तविक पाहता अनेक शासनाच्या योजना सुरु असून त्याचा लाभ जनतेनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केले. ते गोसे (बु.) उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले, या कालव्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून शेतकºयांना आता १२ महिने पिक घेता येईल. लिफ्ट एरिकेशन ही एक शासनाची चांगली योजना असून त्याचा फायदा शेतकºयांनी घ्यावा. भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्य अतिथी आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, डॉ.उल्हास फडके, पवनी भाजपा शहर अध्यक्ष हरिश तलमले, जिल्हा भाजपा सचिव धनराज जिभकाटे, जिल्हा भाजपा डॉक्टर सेलचे अध्यक्ष संदीप खंगार, डावा कालव्याचे कार्याकरी अभियंता झोड, मुख्य अधीक्षक नार्वेकर, माजी जि.प. सदस्य डॉ.हरडे, पाटील, प्रकाश बिलवणे आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते भूमिपूजन फलकाचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक डावा कालव्याचे शाखा अभियंता कमाने यांनी केले. कार्यकारी अभियंता झोड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डाव्या कालव्यावर ११ उपसा सिंचन योजना त्वरीत कार्यान्वित करण्यात येत आहेत. पाईप लाईन टाकून त्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पिके घेता येणार आहेत. याचा लाभ कित्येक शेतकºयांना होईल अशा प्रकारचा नवीन उपक्रम डाव्या कालव्यावर प्रथमच करण्यात येत आहे. या डाव्या कालव्यातून ११ कि.मी. पर्यंतची गावे सिंचनखाली येणार असून यात गोसे, पात्री, वासेळा, कुर्झा, इटगाव, रुयाळ, सिंदपुरी या गावांचा समावेश आहे. जवळ जवळ ७००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून ११ लिफ्ट ऐरिकेशन बसविण्यात येणार असून याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. डॉ.उल्हास फडके म्हणाले की, गोसे धरणाची कामे मागे पडलीत. ३७२ कोटींचा प्रकल्प आज हजारो कोटी मध्ये गेलेला आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था निर्माण करून पिकाचे नियोजन करावे. सर्वांनी समान पिके घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पाण्याचे नियोजन करता येईल. याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, पाणी पुरवठा व्यवस्थापन समितीचे कार्य महत्वाचे आहे. कित्येक पाणी पुरवठा संस्था विजेचे बिल भरत नाही. त्या तोट्यात जातात. त्यामुळे चांगले सदस्य या समितीवर नियुक्त करावेत. जेणेकरून उपसा सिंचन योजना तोट्यात जाणार नाही. कार्यक्रमाचे संचालन शाखा अभियंता यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर कावळे, किशोर ब्राम्हणकर, सुरेश आयतुलवार, दिगांबर दावळे, शैलेश मरगडे, शेखर भगत, खेमराज देशमुख, द्रोपद धारगावे, प्रकाश बिलवणे, डॉ.विनायक फुंडे, डॉ.उल्हास हरडे, अनुराधा बुराडे, राजेश चोपकर, दिलीप भेंडारकर, अतुल मुलकलवार, तिलक वैद्य, मच्छींद्र हटवार आदी उपस्थित होते.