शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

ताजमेहंदी जन्मोत्सव यात्रा ठरली धार्मिक एकात्मतेचे प्रतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:43 IST

वरठीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड सीतेपार गावात असलेले ताज मेहंदी बाबा दरबार आहे.

ठळक मुद्देबीड-सीतेपार येथे तीन दिवसीय यात्रा : सर्वधर्म समुदायांच्या उपस्थितीत महोत्सव

तथागत मेश्राम ।आॅनलाईन लोकमतवरठी : वरठीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड सीतेपार गावात असलेले ताज मेहंदी बाबा दरबार आहे. दरवर्षी तिळसंक्रांत निमित्त येथे तीन दिवसीय यात्रा भरते. तीन दिवसात ७० ते ८० हजार भाविक या यात्रेत येतात. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापासून ते मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांचा डेरे दाखल होतात.मानव कल्याण व दु:ख निवारण्यासाठी ताज मेहंदी बाबाची शिकवण व सांगितलेल्या मार्गावर चालणाऱ्या शेकडो लोकांनी आपल्या जीवनाची घडी बसविली. शेकडोंनी व्यसन सोडले. ताज मेहंदी बाबांवर असलेल्या श्रद्धेपोटी जमणारी गर्दी ही दरवर्षी वाढत आहे. बीड सीतेपार येथे भरणारी यात्रा हे धार्मिक एकतेचे प्रतीक असून जात धर्म न पाळता येणारे भाविक त्यांची साक्ष देतात.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील प्रभुदास बाळबुधे यांनी १९९४ ला मोहाडी तालुक्यातील बीड सीतेपार येथे तत्कालीन सरपंच स्वर्गीय माणिक बाळबुधे यांच्या सहकार्याने या मंदिराची पायाभरणी केली. सासूच्या आजाराने कंटाळलेल्या बाळबुधे यांनी खापरी येथे ताज मेहंदी बाबांची सेवा घेतली. त्यांच्या सेवेपासून लाभ मिळाल्यामुळे त्यांनी या सेवेचा प्रचार प्रसार केला. त्याचेच फलस्वरूप म्हणजे ताज मेहंदी बाबांच्या मृत्यू नंतरही मंदिर निर्माण करण्याचा संकल्प केला. अल्पावधीत या मंदिराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणात येणारे भाविक व त्यांच्याकडून मिळणाऱ्या देणगीतून मंदिराला मोठे स्वरूप प्राप्त झाले. दरवर्षी भरणारी यात्रा व भाविकांची संख्या दखल शासनाने घेतली. ‘क’ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून घोषित केले. मंदिराकरीता शासनाकडून तीन एकर शेती मंदिर कमिटीला मिळाली आहे. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत भाविकांसाठी निवास, पिण्याच्या पाण्याची सोय व अन्य सुविधा करीत निधी देण्यात आला आहे. भाविकांकरिता निशुल्क निवास व्यवस्था संस्थांनाच्या वतीने करण्यात येते. दर गुरुवारला शेकडो भाविक या मंदिरात येतात. अनेक भाविक महिना महिना या मंदिर परिसरात मुक्कामाने राहतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था संस्थानाच्या वतीने नि:शुल्क केली जाते.ताज मेहंदी बाबा यांचा जन्म तिळसंक्रातीच्या दिवशी झाला व महाशिवरात्रीच्या दिवशी मृत्यू झाला होता. यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. दरवर्षी बीड सीतेपार येथे तिळसंक्रांत पासून तीन दिवसीय यात्रेला सुरुवात होते. या जत्रेत महाराष्ट्रातील कानाकोपºयापासून ते मध्यप्रदेश व छत्तीगड राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांच्या राहण्यासाठी मोठे शामियाना ची व्यवस्था करण्यात येते. कडाक्याच्या थंडीत शामियानात हजारो भाविक श्रद्धेने राहतात. तिळसंक्रांत पासून सुरु होणाºया यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भाविकांची गर्दी लक्षणीय राहत असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रभुदास बाळबुधे यांनी दिली. यावेळी बीडचे सरपंच राजेश फुले, उपाध्यक्ष प्रवीण बावनकुळे, विनायक हटवार, सीताराम चावके, व तानबा दमाहे उपस्थित होते.महाप्रसादयात्रेत विविध ठिकाणाहून भाविक महाप्रसाद वितरीत करतात. यात पंकज शिंदे, बंटी शेळके, नरेश शामकुवर, राजेश तिवारी, मनीष घोटेकर व जगनाथ चतुर्वेर्दी हे महाप्रसाद व ब्लँकेट वाटप करतात. संस्थनच्यावतीने महाप्रसाद देण्यात येतो. परिसरात ७० ते ८० हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.एस टी महामंडळाची बस सुविधामहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी भंडारासह साकोली, लाखनी, पवनी, तुमसर, नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गोंदिया येथून बस सुविधा उपलब्द केल्या जातात. यंत्रे निमित्त दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन बसेस सुविधा पुरवल्या जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात एस टी महामंडळाचे आवक वाढते.पोलिसांचा चोख बंदोबस्तमोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी वरठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात एक पोलीस उपनिरीक्षक यांच्या १५ पोलीस कर्मचारी तीन दिवस तैनात आहे. यात महिला पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे.