शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘त्या’ प्रकरणात ठाणेदाराला निलंबित करा

By admin | Updated: May 1, 2016 00:22 IST

कान्हळगाव /सिरसोली येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर तरुणीला मारहाण झाली.

आरोपीला अटक करा : आंदोलनाचा इशारा, पत्रकार परिषदेत ग्रामस्थांची मागणीमोहाडी : कान्हळगाव /सिरसोली येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर तरुणीला मारहाण झाली. त्या प्रकरणात आंधळगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने निष्काळजीपणा दाखवून आरोपीला सोडण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ठाणेदाराला निलंबित करण्यात यावे व आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी केली. दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.कान्हळगाव / सिरसोली येथे रोजगार हमी योजनेच्या पांदण रस्त्यावर तरुणीला मारहाण झाली. तरुणी बेशुद्ध झाली. सर्वासमक्ष तरुणीची चर्चा चव्हाट्यावर मांडण्यात आली. तरी आंधळगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून आरोपी चामट व त्याचा भाऊ याला मोकाट सोडून देण्यात आले. एवढेच नाही तर आरोपीने घटनेच्या दिवशी फिर्यादीच्या घरावर हल्ला चढविला. मारण्याची धमकी दिली. असे घडले असताना पोलिसांनी दखल घेतली नाही. एवढेच नाही तर घटनास्थळावरचा पंचनामा केला नाही. उपस्थित मजुरांचे बयाण घेतले नाही. पोलिसांच्या निष्काळजीमुळे कान्हळगावात पोलिसांविरुद्ध संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आरोपीचा भाऊ गावात बेबंदशाहीने वागून माझे कुणी बिघडवू शकत नाही असे बोलत आहे. गुन्हेगारीला लगाम देण्याचे काम करण्याऐवजी आरोपींना पाठबळ देण्याचे काम पोलीस करीत असल्याची भावना निर्माण गावकऱ्यांमध्ये झाली आहे. या घटनेची कैफियत मांडण्यासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला सरपंच मेघा उटाणे, माजी सरपंच अनुप उटाने, ग्रा.पं. सदस्य चंद्रशेखर कस्तुरे, रक्षा बागडे, प्रा.डॉ.सुनील चवळे, सिनेट सदस्य नीतेश फुलेकर, मुलीचे वडील यशवंत चवळे, नर्बद कस्तुरे, गीता उटाणे, मोहन वहिले, विशाखा मेश्राम, छत्रपती चवळे, सुखचंद सुखदेवे, नंदा मेश्राम, अनिता निमकर, सतीश इटनकर आदी बरेच महिला, पुरुष उपस्थित होते. गावात तरुणीचा अब्रू लुटणाऱ्या तरुणाला धडा शिकविलाच पाहिजे ही मागणी महिलांनी केली. या प्रकरणात आंधळगाव पोलिसांनी फुकटचा सल्ला देण्यापेक्षा आपले नीटपणे कर्तव्य बजावले पाहिजे होते असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. या घटनेसंबंधी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डी.आय.जी. नागपूर, पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय अधिकारी पवनीत कौर, तहसीलदार मोहाडी यांना निवेदन सादर केले होते. तसेच त्यानंतर २७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्याशी पीडित मुलगी, तिचे वडील, सरपंच मेघा उटाणे व काही ग्रामस्थ भेटायला गेले होते. यावेळी पोलीस अधीक्षकांनी केवळ पीडित मुलगी व सरपंच यांनाच चर्चेसाठी आत बोलावले. पीडित मुलीकडून घटनेची हकीकत जाणून घेतली. कारवाईचे आश्वासन दिले. मात्र चार दिवस लोटूनही कोणतीच कारवाई पोलिसांनी केली नाही. त्यामुळे गावात पत्रकार परिषद घेवून गावकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले तसेच पत्रकार परिषदेत दिनांक ४ मे पर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली नाही तर ५ मे रोजी तहसील कार्यालय मोहाडी पोलीस स्टेशन आंधळगाव यांच्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोर्चा व मागण्यांचे निवेदन पुन्हा पोलीस अधीक्षक भंडारा, पोलीस स्टेशन आंधळगाव, उपविभागीय अधिकारी पवनीत कौर, तहसीलदार मोहाडी यांना देण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)