शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी सापांचे जीवदान महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या पुढाकाराची गरज : आज नागपंचमी, आजही ग्रामीण भागात सापांचा नाहक जातोय बळी

सिराज शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : साप किंवा नाग म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो. दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे अनन्यसाधारण महत्व आहे.आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने साप हा मित्र आहे. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासह महत्वाची भूमिका निभावणाऱ्या या सापाला अनेकदा मारले जाते. मात्र आज खऱ्या अर्थाने वनसंपदा असलेल्या आपल्या जिल्ह्यात सर्पमित्रांकडून साप संवर्धनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. साप निघाल्यानंतर तात्काळ सर्पमित्राला फोन करून बोलाविल्या जाते. मात्र आजही काही ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. मात्र निसर्गसाखळी सापाचे असणारे महत्व लक्षात घेता आज जिल्हा प्रशासनासह सर्पमित्रांनी व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे. आजही अनेक ठिकाणी गारूडी हा स्वत:चे पोट भरण्यासाठी सापांचे खेळ करतात. मात्र खºया अर्थाने सर्पमित्र हे विनामूल्य सापांचा जीव वाचवतात. यासाठी प्रशासनाकडून विस्तृत मोहिम राबविण्याची गरज आहे.वनविभागाकडून सर्पमित्रांसाठी विविध प्रशिक्षणे राबविण्याची गरज आहे. मात्र वनविभागाच्या अनास्थेमुळे आज कुठेही सर्पमित्रांचे प्रशिक्षण अथवा जनजागृती होताना दिसून येत नाही.आजही सर्वसामान्यांमध्ये सापांबद्दल असणारी भीती कमी करून सापांना जीवदान देण्याची गरज आहे. सापांच्या असलेल्या विविध प्रकारच्या जाती तसेच त्यातील विषारी कोणत्या, बिनविषारी कोणत्या तसेच सापाचे निसर्गातील असलेले महत्व सर्पदंशानंतर करण्याचे येणारे प्राथमिक उपचार यासाठी वनविभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.शासनाकडून सर्पमित्र दूर्लक्षितग्रामीण भागासह अनेक ठिकाणी सर्पमित्र फोन येताच तात्काळ हजर होतात. अनेक ठिकाणी सापांना पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. सापांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभवणारे सर्पमित्र आज शासनाकडून दुर्लक्षित झाले आहे. शासनाने सर्पमित्रांना अल्प मानधन सुरू करून विविध योजनेचा फायदा देण्याची गरज आहे.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमीsnakeसाप