शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पर्यावरण संवर्धनासाठी सापांचे जीवदान महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या पुढाकाराची गरज : आज नागपंचमी, आजही ग्रामीण भागात सापांचा नाहक जातोय बळी

सिराज शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : साप किंवा नाग म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो. दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे अनन्यसाधारण महत्व आहे.आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने साप हा मित्र आहे. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासह महत्वाची भूमिका निभावणाऱ्या या सापाला अनेकदा मारले जाते. मात्र आज खऱ्या अर्थाने वनसंपदा असलेल्या आपल्या जिल्ह्यात सर्पमित्रांकडून साप संवर्धनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. साप निघाल्यानंतर तात्काळ सर्पमित्राला फोन करून बोलाविल्या जाते. मात्र आजही काही ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. मात्र निसर्गसाखळी सापाचे असणारे महत्व लक्षात घेता आज जिल्हा प्रशासनासह सर्पमित्रांनी व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे. आजही अनेक ठिकाणी गारूडी हा स्वत:चे पोट भरण्यासाठी सापांचे खेळ करतात. मात्र खºया अर्थाने सर्पमित्र हे विनामूल्य सापांचा जीव वाचवतात. यासाठी प्रशासनाकडून विस्तृत मोहिम राबविण्याची गरज आहे.वनविभागाकडून सर्पमित्रांसाठी विविध प्रशिक्षणे राबविण्याची गरज आहे. मात्र वनविभागाच्या अनास्थेमुळे आज कुठेही सर्पमित्रांचे प्रशिक्षण अथवा जनजागृती होताना दिसून येत नाही.आजही सर्वसामान्यांमध्ये सापांबद्दल असणारी भीती कमी करून सापांना जीवदान देण्याची गरज आहे. सापांच्या असलेल्या विविध प्रकारच्या जाती तसेच त्यातील विषारी कोणत्या, बिनविषारी कोणत्या तसेच सापाचे निसर्गातील असलेले महत्व सर्पदंशानंतर करण्याचे येणारे प्राथमिक उपचार यासाठी वनविभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.शासनाकडून सर्पमित्र दूर्लक्षितग्रामीण भागासह अनेक ठिकाणी सर्पमित्र फोन येताच तात्काळ हजर होतात. अनेक ठिकाणी सापांना पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. सापांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभवणारे सर्पमित्र आज शासनाकडून दुर्लक्षित झाले आहे. शासनाने सर्पमित्रांना अल्प मानधन सुरू करून विविध योजनेचा फायदा देण्याची गरज आहे.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमीsnakeसाप