शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

आश्चर्य! पालांदूर परिसरात कृषिपंपांना चोवीस तास वीजपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढीचा शॉक दिला जातो. संकट उभे झाले की शासनाकडे बोट दाखविला जातो. मात्र, स्वतःच्या उत्पन्नावर नियोजन अजून तरी ‘महावितरण’ने केलेले दिसत नाही.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : अख्ख्या महाराष्ट्रात विजेच्या भारनियमनाने भाजून निघत आहे.  शेतीला अधिकृत आठ तास वीज देणे महावितरणला अडचणीचे होत आहे; परंतु गावठाणाला जोडलेल्या कृषीपंपांमुळे पालांदूर परिसरातील कृषीपंपांना २४ तास वीजपुरवठा होत आहे. गत तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून २४ तास वीजपुरवठ्याने घरगुती विहिरींनी तळ गाठून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढीचा शॉक दिला जातो. संकट उभे झाले की शासनाकडे बोट दाखविला जातो. मात्र, स्वतःच्या उत्पन्नावर नियोजन अजून तरी ‘महावितरण’ने केलेले दिसत नाही. पालांदूर येथील सुमारे ४० कृषीपंप गाव फिडरवर आजही जोडलेले आहेत.  गावठाणाला जोडलेल्या कृषिपंपांना २४ तास थ्री फेस वीज पुरविली जात आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याच्या नियोजनाने अधिकची शेती उत्पन्नाखाली आणत आहे. एक पंप चार एकरापर्यंत शेतीचे सिंचन करतो आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा सर्वाधिक होऊन गावातील घरगुती विहिरींनी तळ गाठलेला आहे. नळ योजना असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. मात्र, इतर कामांसाठी स्वतंत्र विहिरीतील पाणी उन्हाळ्याच्या दिवसात मिळत नाही. कित्येक कुटुंब २४ तास विजेच्या पुरवठ्यामुळे विहिरी कोरड्या करून बसले आहेत.

वीज वितरणच्या नियोजनातील त्रुटी

- एकीकडे भारनियमनामुळे कृषीपंपांना वीज मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना २४ तास कृषीपंपाला वीज मिळत आहे. ही समाधानाची बाब असली तरी अतिरिक्त पाणी उपसामुळे गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. वीज वितरण कंपनीने केलेले नियोजन येथे अपयशी ठरल्याने गावात मात्र पाणी टंचाई निर्माण झाली.

गावठाण फिडरवरून कृषी फिडर मोकळे करण्यासाठी पाठविलेले नियोजन मंजूर झालेले आहे. त्या  वर्कऑर्डरसुद्धा झालेली आहे. किमान महिनाभरात  कृषी फिडर गाव फिडर वरून वेगळे करण्यात येईल. -मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूर.

गावठाण फिडरवरून कृषी फिडर मोकळे करण्यासाठी पाठविलेले नियोजन मंजूर झालेले आहे. त्या  वर्कऑर्डरसुद्धा झालेली आहे. किमान महिनाभरात  कृषी फिडर गाव फिडर वरून वेगळे करण्यात येईल. -मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूर.

 

टॅग्स :electricityवीजIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प