शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

आश्चर्य! पालांदूर परिसरात कृषिपंपांना चोवीस तास वीजपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढीचा शॉक दिला जातो. संकट उभे झाले की शासनाकडे बोट दाखविला जातो. मात्र, स्वतःच्या उत्पन्नावर नियोजन अजून तरी ‘महावितरण’ने केलेले दिसत नाही.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : अख्ख्या महाराष्ट्रात विजेच्या भारनियमनाने भाजून निघत आहे.  शेतीला अधिकृत आठ तास वीज देणे महावितरणला अडचणीचे होत आहे; परंतु गावठाणाला जोडलेल्या कृषीपंपांमुळे पालांदूर परिसरातील कृषीपंपांना २४ तास वीजपुरवठा होत आहे. गत तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून २४ तास वीजपुरवठ्याने घरगुती विहिरींनी तळ गाठून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढीचा शॉक दिला जातो. संकट उभे झाले की शासनाकडे बोट दाखविला जातो. मात्र, स्वतःच्या उत्पन्नावर नियोजन अजून तरी ‘महावितरण’ने केलेले दिसत नाही. पालांदूर येथील सुमारे ४० कृषीपंप गाव फिडरवर आजही जोडलेले आहेत.  गावठाणाला जोडलेल्या कृषिपंपांना २४ तास थ्री फेस वीज पुरविली जात आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याच्या नियोजनाने अधिकची शेती उत्पन्नाखाली आणत आहे. एक पंप चार एकरापर्यंत शेतीचे सिंचन करतो आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा सर्वाधिक होऊन गावातील घरगुती विहिरींनी तळ गाठलेला आहे. नळ योजना असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. मात्र, इतर कामांसाठी स्वतंत्र विहिरीतील पाणी उन्हाळ्याच्या दिवसात मिळत नाही. कित्येक कुटुंब २४ तास विजेच्या पुरवठ्यामुळे विहिरी कोरड्या करून बसले आहेत.

वीज वितरणच्या नियोजनातील त्रुटी

- एकीकडे भारनियमनामुळे कृषीपंपांना वीज मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना २४ तास कृषीपंपाला वीज मिळत आहे. ही समाधानाची बाब असली तरी अतिरिक्त पाणी उपसामुळे गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. वीज वितरण कंपनीने केलेले नियोजन येथे अपयशी ठरल्याने गावात मात्र पाणी टंचाई निर्माण झाली.

गावठाण फिडरवरून कृषी फिडर मोकळे करण्यासाठी पाठविलेले नियोजन मंजूर झालेले आहे. त्या  वर्कऑर्डरसुद्धा झालेली आहे. किमान महिनाभरात  कृषी फिडर गाव फिडर वरून वेगळे करण्यात येईल. -मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूर.

गावठाण फिडरवरून कृषी फिडर मोकळे करण्यासाठी पाठविलेले नियोजन मंजूर झालेले आहे. त्या  वर्कऑर्डरसुद्धा झालेली आहे. किमान महिनाभरात  कृषी फिडर गाव फिडर वरून वेगळे करण्यात येईल. -मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूर.

 

टॅग्स :electricityवीजIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प