शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

संकटकाळात ऊस शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली.

ठळक मुद्देदुहेरी फायदा : तुळशीविवाहाच्या पर्वात ऊसाची मोठी विक्री

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने धान पीक उध्वस्त झाल्याने हतबल असलेल्या अनेक शेतकऱ्यांना उसाने मोठा आधार दिला. तुळशी विवाहाच्या पर्वात मोठ्या प्रमाणात उसाची विक्री होऊन त्यातून रोख शेतकऱ्यांच्या हाती आले. धानासोबत उसाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली. गत आठवड्याभरात शहरात मोठ्या प्रमाणात ऊस विकून शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेवर मात केली.भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली. पुर्वी साखर कारखाना सुरु असल्याने ऊसाला मागणी होती. कारखाना बंद पडल्यानंतर पुन्हा शेतकºयांना धान पिकाशिवाय पर्याय राहिला नाही. परंतु अनेक शेतकºयांनी धानपिकासोबत ऊसाची लागवड केली. यंदा परतीचा पावसाने धान पीक उध्वस्त झाले. शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ज्यांनी थोडा थोडगा का असेना ऊस लावला होता, त्यांना तुळशीविवाहाने मोठा हातभार लावला. अनेक शेतकऱ्यांनी भंडारा शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाची विक्री केली. तुळशीविवाहासाठी उसाची खोपडी आवश्यक असते. शहरातील प्रमुख मार्गावर बैलगाडीने ऊस आणून विक्री केली. ८० ते १०० रुपये पाच ऊसाची विक्री केली. रोख पैसे अनेकांच्या हातात आले. यासोबतच जिल्ह्यात तुमसर, साकोली तालुक्यात गुऱ्हाड आहे. या गुऱ्हाडातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळत आहे. अनेक शेतकरी आता धानासोबतच ऊस लागवडीकडे वळत आहे.कृषी विभागाकडून पुढाकाराची गरजजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान शेती होते. परंतु ही शेती शेतकºयांच्या फायद्याची नाही. त्यामुळे शेतकºयांनी पर्यायी पिकाचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती