शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळात ऊस शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली.

ठळक मुद्देदुहेरी फायदा : तुळशीविवाहाच्या पर्वात ऊसाची मोठी विक्री

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने धान पीक उध्वस्त झाल्याने हतबल असलेल्या अनेक शेतकऱ्यांना उसाने मोठा आधार दिला. तुळशी विवाहाच्या पर्वात मोठ्या प्रमाणात उसाची विक्री होऊन त्यातून रोख शेतकऱ्यांच्या हाती आले. धानासोबत उसाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली. गत आठवड्याभरात शहरात मोठ्या प्रमाणात ऊस विकून शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेवर मात केली.भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली. पुर्वी साखर कारखाना सुरु असल्याने ऊसाला मागणी होती. कारखाना बंद पडल्यानंतर पुन्हा शेतकºयांना धान पिकाशिवाय पर्याय राहिला नाही. परंतु अनेक शेतकºयांनी धानपिकासोबत ऊसाची लागवड केली. यंदा परतीचा पावसाने धान पीक उध्वस्त झाले. शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ज्यांनी थोडा थोडगा का असेना ऊस लावला होता, त्यांना तुळशीविवाहाने मोठा हातभार लावला. अनेक शेतकऱ्यांनी भंडारा शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाची विक्री केली. तुळशीविवाहासाठी उसाची खोपडी आवश्यक असते. शहरातील प्रमुख मार्गावर बैलगाडीने ऊस आणून विक्री केली. ८० ते १०० रुपये पाच ऊसाची विक्री केली. रोख पैसे अनेकांच्या हातात आले. यासोबतच जिल्ह्यात तुमसर, साकोली तालुक्यात गुऱ्हाड आहे. या गुऱ्हाडातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळत आहे. अनेक शेतकरी आता धानासोबतच ऊस लागवडीकडे वळत आहे.कृषी विभागाकडून पुढाकाराची गरजजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान शेती होते. परंतु ही शेती शेतकºयांच्या फायद्याची नाही. त्यामुळे शेतकºयांनी पर्यायी पिकाचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती