शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

रखरखत्या उन्हात रोजगार हमी कामांना सुरूवात

By admin | Updated: April 20, 2017 00:41 IST

वितभर पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती होते. यामुळे कुटुंबापासून कधी दूर जावे लागते.

शेतीच्या कामाला मिळेना मजूर : पालांदुरात ५८६ मजुरांची कामावर उपस्थितीमुखरु बागडे पालांदूरवितभर पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती होते. यामुळे कुटुंबापासून कधी दूर जावे लागते. अशात राज्य शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांना आता गावात सुरूवात झाली आहे. उन्हाच्या प्रखरेतेत अंगाची काहिली होत असली तरी, पोटासाठी शेकडो मजुरांनी हातात फावडे, घमेले घेऊन रोहयोच्या कामावर हजेरी लावली.रोहयोत वर्षभरात १०० दिवस मजुरांना काम देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. रविवारपासून पालांदूरात रोजगार हमी सुरू झाली असून पहिल्या दिवशी ५८६ तर दुसऱ्या दिवशी ५८४ मजुरांच्या उपस्थितीची नोंद हजेरी सहायकांनी नोंदविली.रब्बी हंगामानंतर मजुरांना शेतीची कामे अपूरी असतात. पर्यायाने अल्प मजुरांना काम शेतकरी स्वत:च्या शेतात देतो. या व्यवस्थेचा ग्रामीण भागात संधीचा अभाव असल्याने मजूर रिकामे राहतात. रोजगार हमीमुळे निदान १०० दिवस तरी मजुरांना काम मिळते. १०० दिवसाचा सदुपयोग योग्य दिशेने होताना दिसत नसल्याचे वास्तव ग्रामीण भागात पहायला मिळते. नाला सरळीकरण, पांदणरस्ते, तलाव खोलीकरण सारखे कामे घेत मजुरांच्या हाताला काम पुरविले जाते. मात्र दरवर्षी तेच तेच काम होत असल्याने कामाचे फलित योग्य दिशेने होत नाही. नाली सरळीकरण खडक किंवा रेतीमाती काठावर फेकणे व एक पाऊस आला की तिच रेतीमाती पुन्हा त्याच नाल्यात पडणे, ही नित्याची बाब सगळ्यांच्या लक्षात येते. पंरतू कामाचे नियोजन होत नसल्याने व नविन कामे रोजगार हमीत समाविष्ठ नसल्याने निरूपायाने तेच कामे करावी लागतात. पालांदुरात रोजगार हमी अंतर्गत ग्रामीण रूग्णालयापासून पोलीस ठाण्याच्या पुढील रस्त्याच्याकडेला काम सुरू आहे. मातीकाम असल्याने पाट तर दोन्ही बाजुला माती फेकल्या जात आहे. त्या मातीला योग्य न्याय मिळत नसल्याची चर्चा होत आहे. पावसाळ्यात हा पाट पुन्हा जैसे थे च होईल व नाहक काम व पैसा वाया जाईल असा सूर जनसामान्यातून निघत आहे. काम करतेवेळी जबाबदार पदाधिकारी हजर राहत नाही. यामुळे कामाला योग्य न्याय मिळत नाही. ४.२३ लक्षाचे खर्चाचे नियोजन असून किती दिवस काम पुरविल्या जाईल. याकडे मजुरांचे लक्ष लागले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांचा आरंभ होताच शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली असून शेतीकामाला मजुर मिळत नाही. शेतीची संपूर्ण कामे रोजगार हमीतून केली गेली तर मजुर व शेतकरी दोघानाही शासनाच्या योजनेचा लाभ होईल व दोघांच्याही डोक्यावरील ताण कमी होईल तेव्हा मजूर टंचाई आ वासून उभी असेल. मागील वर्षाला जिल्ह्यात १२ हजार ३९३ मजुरांच्या हाताला रोहयोचे कामे मिळाली होती, हे विशेष.