शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

रखरखत्या उन्हात रोजगार हमी कामांना सुरूवात

By admin | Updated: April 20, 2017 00:41 IST

वितभर पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती होते. यामुळे कुटुंबापासून कधी दूर जावे लागते.

शेतीच्या कामाला मिळेना मजूर : पालांदुरात ५८६ मजुरांची कामावर उपस्थितीमुखरु बागडे पालांदूरवितभर पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती होते. यामुळे कुटुंबापासून कधी दूर जावे लागते. अशात राज्य शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांना आता गावात सुरूवात झाली आहे. उन्हाच्या प्रखरेतेत अंगाची काहिली होत असली तरी, पोटासाठी शेकडो मजुरांनी हातात फावडे, घमेले घेऊन रोहयोच्या कामावर हजेरी लावली.रोहयोत वर्षभरात १०० दिवस मजुरांना काम देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. रविवारपासून पालांदूरात रोजगार हमी सुरू झाली असून पहिल्या दिवशी ५८६ तर दुसऱ्या दिवशी ५८४ मजुरांच्या उपस्थितीची नोंद हजेरी सहायकांनी नोंदविली.रब्बी हंगामानंतर मजुरांना शेतीची कामे अपूरी असतात. पर्यायाने अल्प मजुरांना काम शेतकरी स्वत:च्या शेतात देतो. या व्यवस्थेचा ग्रामीण भागात संधीचा अभाव असल्याने मजूर रिकामे राहतात. रोजगार हमीमुळे निदान १०० दिवस तरी मजुरांना काम मिळते. १०० दिवसाचा सदुपयोग योग्य दिशेने होताना दिसत नसल्याचे वास्तव ग्रामीण भागात पहायला मिळते. नाला सरळीकरण, पांदणरस्ते, तलाव खोलीकरण सारखे कामे घेत मजुरांच्या हाताला काम पुरविले जाते. मात्र दरवर्षी तेच तेच काम होत असल्याने कामाचे फलित योग्य दिशेने होत नाही. नाली सरळीकरण खडक किंवा रेतीमाती काठावर फेकणे व एक पाऊस आला की तिच रेतीमाती पुन्हा त्याच नाल्यात पडणे, ही नित्याची बाब सगळ्यांच्या लक्षात येते. पंरतू कामाचे नियोजन होत नसल्याने व नविन कामे रोजगार हमीत समाविष्ठ नसल्याने निरूपायाने तेच कामे करावी लागतात. पालांदुरात रोजगार हमी अंतर्गत ग्रामीण रूग्णालयापासून पोलीस ठाण्याच्या पुढील रस्त्याच्याकडेला काम सुरू आहे. मातीकाम असल्याने पाट तर दोन्ही बाजुला माती फेकल्या जात आहे. त्या मातीला योग्य न्याय मिळत नसल्याची चर्चा होत आहे. पावसाळ्यात हा पाट पुन्हा जैसे थे च होईल व नाहक काम व पैसा वाया जाईल असा सूर जनसामान्यातून निघत आहे. काम करतेवेळी जबाबदार पदाधिकारी हजर राहत नाही. यामुळे कामाला योग्य न्याय मिळत नाही. ४.२३ लक्षाचे खर्चाचे नियोजन असून किती दिवस काम पुरविल्या जाईल. याकडे मजुरांचे लक्ष लागले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांचा आरंभ होताच शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली असून शेतीकामाला मजुर मिळत नाही. शेतीची संपूर्ण कामे रोजगार हमीतून केली गेली तर मजुर व शेतकरी दोघानाही शासनाच्या योजनेचा लाभ होईल व दोघांच्याही डोक्यावरील ताण कमी होईल तेव्हा मजूर टंचाई आ वासून उभी असेल. मागील वर्षाला जिल्ह्यात १२ हजार ३९३ मजुरांच्या हाताला रोहयोचे कामे मिळाली होती, हे विशेष.