शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात रोजगार हमी कामांना सुरूवात

By admin | Updated: April 20, 2017 00:41 IST

वितभर पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती होते. यामुळे कुटुंबापासून कधी दूर जावे लागते.

शेतीच्या कामाला मिळेना मजूर : पालांदुरात ५८६ मजुरांची कामावर उपस्थितीमुखरु बागडे पालांदूरवितभर पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती होते. यामुळे कुटुंबापासून कधी दूर जावे लागते. अशात राज्य शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांना आता गावात सुरूवात झाली आहे. उन्हाच्या प्रखरेतेत अंगाची काहिली होत असली तरी, पोटासाठी शेकडो मजुरांनी हातात फावडे, घमेले घेऊन रोहयोच्या कामावर हजेरी लावली.रोहयोत वर्षभरात १०० दिवस मजुरांना काम देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. रविवारपासून पालांदूरात रोजगार हमी सुरू झाली असून पहिल्या दिवशी ५८६ तर दुसऱ्या दिवशी ५८४ मजुरांच्या उपस्थितीची नोंद हजेरी सहायकांनी नोंदविली.रब्बी हंगामानंतर मजुरांना शेतीची कामे अपूरी असतात. पर्यायाने अल्प मजुरांना काम शेतकरी स्वत:च्या शेतात देतो. या व्यवस्थेचा ग्रामीण भागात संधीचा अभाव असल्याने मजूर रिकामे राहतात. रोजगार हमीमुळे निदान १०० दिवस तरी मजुरांना काम मिळते. १०० दिवसाचा सदुपयोग योग्य दिशेने होताना दिसत नसल्याचे वास्तव ग्रामीण भागात पहायला मिळते. नाला सरळीकरण, पांदणरस्ते, तलाव खोलीकरण सारखे कामे घेत मजुरांच्या हाताला काम पुरविले जाते. मात्र दरवर्षी तेच तेच काम होत असल्याने कामाचे फलित योग्य दिशेने होत नाही. नाली सरळीकरण खडक किंवा रेतीमाती काठावर फेकणे व एक पाऊस आला की तिच रेतीमाती पुन्हा त्याच नाल्यात पडणे, ही नित्याची बाब सगळ्यांच्या लक्षात येते. पंरतू कामाचे नियोजन होत नसल्याने व नविन कामे रोजगार हमीत समाविष्ठ नसल्याने निरूपायाने तेच कामे करावी लागतात. पालांदुरात रोजगार हमी अंतर्गत ग्रामीण रूग्णालयापासून पोलीस ठाण्याच्या पुढील रस्त्याच्याकडेला काम सुरू आहे. मातीकाम असल्याने पाट तर दोन्ही बाजुला माती फेकल्या जात आहे. त्या मातीला योग्य न्याय मिळत नसल्याची चर्चा होत आहे. पावसाळ्यात हा पाट पुन्हा जैसे थे च होईल व नाहक काम व पैसा वाया जाईल असा सूर जनसामान्यातून निघत आहे. काम करतेवेळी जबाबदार पदाधिकारी हजर राहत नाही. यामुळे कामाला योग्य न्याय मिळत नाही. ४.२३ लक्षाचे खर्चाचे नियोजन असून किती दिवस काम पुरविल्या जाईल. याकडे मजुरांचे लक्ष लागले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांचा आरंभ होताच शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली असून शेतीकामाला मजुर मिळत नाही. शेतीची संपूर्ण कामे रोजगार हमीतून केली गेली तर मजुर व शेतकरी दोघानाही शासनाच्या योजनेचा लाभ होईल व दोघांच्याही डोक्यावरील ताण कमी होईल तेव्हा मजूर टंचाई आ वासून उभी असेल. मागील वर्षाला जिल्ह्यात १२ हजार ३९३ मजुरांच्या हाताला रोहयोचे कामे मिळाली होती, हे विशेष.