शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सिंचनाअभावी उन्हाळी धानपीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यात एकूण ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. त्याअंतर्गत जवळपास तीन हजार ...

यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यात एकूण ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. त्याअंतर्गत जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र इटियाडोह बांध सिंचन सुविधेअंतर्गत सिंचित केेले जाणार होते. मात्र तालुक्यातील काही भागांत उन्हाळी धानपिकाची कापणी सुरू करण्यात आली आहे, तर काही भागांत धानपीक कापणीला आणखी काही दिवस असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील काही पाणी वापर संस्थांअंतर्गत काही दिवसांपूर्वीच इटियाडोह बांधअंतर्गत पाण्याचा विसर्ग बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार इटियाडोहअंतर्गत १० मे रोजी कालव्याने येणारे पाणी बंद करण्यात आले. कालव्याचे पाणी बंद करण्यात आल्याने तालुक्यातील बारव्हा परीसरातील बारव्हा, मानेगाव, मुरमाडी, बोरगाव, कोच्छी, दांडेगाव, चिचोली, दहेगाव आदी गावांतील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धानपीक एका पाण्याअभावी संकटात सापडल्याने या भागातील शेतकऱ्यांत चिंता व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कालव्याचे पाणी बंद झाल्याने बारव्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या धानपिकाला पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बॉक्स

तोंडी आलेला घास हिरावण्याची शेतकऱ्यांना भीती

लाखांदूर तालुक्यातील काही भागांतील उन्हाळी धानपीक कापणीला सुरुवात झालेली आहे. तर काही भागांत धानपिकाला एका पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील बारव्हा परिसरातील बारव्हा, मानेगाव, मुरमाडी, बोरगाव, कोच्छी, दांडेगाव, चिचोली, दहेगाव आदी गावांतील धानपिकाला एका पाण्याची आवश्यकता असून, ईटियाडोह सिंचन सुविधेअंतर्गत पाणी बंद करण्यात आल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या धानपिकाला तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.