शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
4
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
8
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
9
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
10
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
11
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
12
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
13
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
14
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
15
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
17
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
18
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
19
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

उन्हाळी धानाची खरेदी रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:34 IST

करडी (पालोरा) : यावर्षी निसर्गाने अनेकदा दगा दिला. दोनदा महापूर व कीड आणि रोगराईने धानाचा एकरी उतारा ५० टक्क्यांपेक्षा ...

करडी (पालोरा) : यावर्षी निसर्गाने अनेकदा दगा दिला. दोनदा महापूर व कीड आणि रोगराईने धानाचा एकरी उतारा ५० टक्क्यांपेक्षा कमी बसला. अशा बिकट परिस्थितीत शासकीय केंद्रावर धानाची खरेदी झाली. परंतु भरडाईत ६५ टक्के पेक्षा कमी उतारा येऊन नुकसान होत असल्याने राईस मिलर्सनी धानाची उचल करण्यास नकार दिल्याने समस्येत आणखी भर पडली. परिणामी केंद्रांनी धान खरेदी मार्चच्या सुरुवातीला खरेदी बंद केली. उचल अभावी केंद्रावर लाखों क्विंटल धान उघड्यावर पडून आहेत. त्यामुळे उन्हाळी धानाची खरेदी होणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन गत दोन वर्षांपासून सतत दिले जात आहेत. निवडणुकांच्या काळात तर शेतकरी प्रत्येक पक्षाच्या केद्रस्थानी असतो. परंतु आजपर्यंत ना शेतकऱ्यांचे भले झाले ना शेतीचे. आश्वासन देणाऱ्यांचे उत्पन्न मात्र १०० पटीने वाढल्याचे दिसून आले. आजही शेतकऱ्यांची मुख्य समस्या सिंचनाबरोबर उत्पादित धान्य साठवून ठेवण्याची आहे. शासनाने धान खरेदी केंद्र वाढविले. परंतु धान्य साठवून ठेवण्यासाठी पर्याप्त गोडावून बांधकामाकडे कमालीचे दुर्लक्ष केले. साठवणुकीच्या असुविधेमुळे आजही शेतकरी कवडीमोल भावात धान्य विकण्यास मजबूर आहे. करडी परिसरात तर गोडावूनची स्थिती अतिशय वाईट आहे. बोटावर मोजण्या इतके गोडावून वगळता कुठेही गोदाम नाहीत. वारंवार मागणी करूनही या सुविधांकडे शासन प्रशासनाची डोळेझाक होत आहे. आज राईस मिलर्स धान भरडाईचा दर वाढविण्यासाठी तसेच धान खरेदी केंद्रांकडून मिळालेल्या धानाचा उतारा ६० टक्के पेक्षा कमी असल्याने नाराज आहेत. भरडाई दर वाढविण्याची व उतारा रेसो कमी करण्याची मागणी करीत आहेत. तर दुसरीकडे शासकीय आधारभूत किमतीवर खरेदी झालेला धान उचल थांबल्याने उघड्यावर पडून आहे. राईस मिलर्स व शासन - प्रशासनात तडजोड वेळीच न झाल्यास गंभीर पेच निर्माण होण्याची स्थिती आहे. खरिपातील धान पडून असताना व केंद्रांनी खरेदी बंद केलेली असताना उन्हाळी धानाची फसल परिपक्व होण्याच्या मार्गात आहे. मे महिन्याच्या प्रारंभी मळणी होऊन शासकीय केंद्रावर आवक होण्याची शक्यता आहे. परंतु गोडावूनचा अभाव व उघड्यावर असलेल्या धानामुळे धान खरेदी केंद्रांकडून खरेदीस नकार येण्याचा धोका वाढला आहे. या सर्व बाबींमुळे उन्हाळी धानाची खरेदी रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्यापाऱ्‍यांकडून कवडीमोल भावात लूट होण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दारावर उभा ठाकला आहे. यावर वेळीच निर्णय होण्याची आवश्यकता आहे.

कोट

उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न निर्माण होणार यात शंका नाही. त्यामुळे लवकरच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कालच जातीने मंत्री महोदयांकडे प्रश्न लावून धरला आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नी राजकारण बाजूला सारून चर्चा करण्याची अपेक्षा आहे.

-राजू कारेमोरे , आमदार तुमसर.