शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रंगबिरंगी होळीसाठी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:39 IST

होळी हा सवार्चा आनंदाचा सण आहे. या सणाची अनेक जण आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येकाने हा आनंदाचा आणि भेटीचा सण साजरा करावा, पण कोणतेही प्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही, याची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करा, असे आवाहन विविध सामाजिक व पर्यावरणवादी संस्थांनी केले आहे.

ठळक मुद्देउलाढाल वाढली : रंगपंचमीसाठी बच्चेकंपनी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : होळी-धुळवडीकरीता बाजारपेठ सजली असून उलाढाल वाढली आहे. रंग, पिचकारी, गाठींच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. येथील मोठा बाजार परिसर, गुजरी चौक, राजीव गांधी चौक परिसर, खात रोड परिसरात होळी-धुळवडीसाठीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत.विक्रीसाठी आलेल्या साहित्यांमध्ये पिचकारी, टँक, फुगे यांचे दर सुमारे १० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. या सर्व पिचकारी, टँकवर सध्या कार्टून आणि मोटू-पतलू, छोा भीम यासह अन्य कॉर्टूनच्या प्रतीमा रेखाटल्या आहेत. छोटा भीम, अर्जून, हनुमान, राम अशा विविध कार्टूनच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. बंदूक पिचकारी पारंपरिक असून त्याचे दर सुमारे १५ ते ५० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. अभिनेत्यांची छायाचित्रे असलेल्या पिचकाऱ्यांसह विविध फळे, बंदुक, मनी बँक, क्रिकेटच्या बॅटची प्रतिकृती असलेल्या पिचकाऱ्या बाजारात दिसून येत आहेत. रंगबिरंगी गुलाल, पाण्याचे रंग, डबीतील रंग, गोल्डन, स्टार्च रंगही विक्रीसाठी आले आहेत. यावर्षी रंगांना चांगली मागणी असल्याचे साहित्यविक्रेते नितीन कुंरजेकर यांनी सांगितले.गाठीचा गोडवा वाढलागाठी सुमारे ८० ते १०० रुपये प्रती किलोने विकल्या जात आहेत. गाठीचे हार ४० ते ६० रुपये आणि त्यापुढे वजनानुसार व नगानुसार गाठी बाजारात उपलब्ध आहेत.प्रदूषणमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहनहोळी हा सवार्चा आनंदाचा सण आहे. या सणाची अनेक जण आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येकाने हा आनंदाचा आणि भेटीचा सण साजरा करावा, पण कोणतेही प्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही, याची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करा, असे आवाहन विविध सामाजिक व पर्यावरणवादी संस्थांनी केले आहे. यासंदर्भात ग्रीन हेरीटेजचे संस्थापक मो.सईद शेख म्हणाले, होलिकोत्सव साजरा करताना आपल्या भागातील कचरा, वाईट प्रवृत्तीचा नाश करा, होळीसाठी झाडाची कत्तल करणे योग्य नाही. कोणतेही प्रदूषण आणि कुणास त्रास, इजा होणार नाही, याची दक्षताही नागरिकांनी घ्यावी. रासायनिक द्रव्ये मिसळलेले रंग वापरू नका असे आवाहनही त्यांनी केले.रंगांचे विविध पॅकेटआईस कूल, नैसर्गिक रंग, रासायनिक रंग अशा तीन पद्धतीतील रंग बाजारात उपलब्ध आहेत. आईस कूल रंग सुमारे २५ ते ५० रुपये, नैसर्गिक रंग सुमारे ५० ग्रॅमपासून पॅकेटमध्ये उपलब्ध असून त्याचे दर २० ते ५० रुपयांपर्यंत आहेत. रासायनिक रंगाच्या पुड्याही बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

टॅग्स :Holiहोळी