शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विद्यार्थ्यांनी उद्दिष्टांकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:34 IST

शहरीभागात शैक्षणिक, नोकरीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था उदयास आल्या.

ठळक मुद्देउपसेन बोरकर यांचे प्रतिपादन : पवनीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमतपवनी : शहरीभागात शैक्षणिक, नोकरीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था उदयास आल्या. परंतु गावपातळीवरील शिकणारा वर्ग यापासून दूर राहिला असला तरी विद्यार्थ्याने आपले शैक्षणिक उद्दिष्ट ठरवून त्या उद्दिष्टाकडे सतत चालत राहा, असे प्रतिपादन उपायुक्त उपसेन बोरकर यांनी केले.बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा तालुका पवनीच्या वतीने गांधीभवन येथे आयोजित विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरातून प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मार्गदर्शक पीएसआय, बावनकर यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी तसेच युपीएससी परीक्षेसंबंधी कोणता अभ्यास कसा व किती करावा यासंबंधी बोलताना स्पर्धा परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम याची पुरेपुर जाणीव करून त्यात वारंवार येणाºया प्रश्नांचा सराव करावा व त्यांची तयारी करावी.उपसेन बोरकर म्हणाले, शिक्षणाचे खासगीकरण तसेच उद्योग व्यवसायांचे खासगीकरण त्यामुळे आजपर्यंत मिळत असलेल्या शासकीय नोकºया मिळणे कठीण झाले. यश प्राप्त करताना अनेक अडचणी आल्या, मानहानी सोसावी लागली तरी पुढे चालत राहा, लोक काय म्हणतील याची तमा न बाळगू नका असेही बोरकर म्हणाले.तसेच कधीकधी येणारे प्रश्नही निट समजावून सांगावे. पदवी पर्यंत शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी प्रयत्न करून स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. यात खूप टक्केवारी किंवा सर्व विषयांचा सखोल ज्ञानाची गरज नसून जवळपास चौथी ते १२ वी पर्यंतच्या विषयांचे सामान्य ज्ञान तसेच मुळ संकल्पना स्पष्ट करून, सामान्य ज्ञान तसेच दररोजच्या घडणाºया देश विदेश पातळीवरच्या घटना, वर्तमानपत्र, टीव्ही वरून नोंद केल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळू शकते. असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांत निर्माण केला.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी जागरूक नसल्याची खंत व्यक्त करून त्यांच्यात शैक्षणिक रोजगार तसेच वर्तन समस्या, वरिष्ठांच्या आज्ञान पाळणे या समस्यामुळे मोठा असून, स्पर्धा परीक्षेसाठी जागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.उपस्थित विजयकुमार, वैशाली, अशोक पारधी यांनीही विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेतल्याशिवाय नोकरी मिळणारच नाही या संबंधी आस्वस्थ केले.कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी व युवा यांची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक वास्तविक अवस्था यावर प्रमुख मार्गदर्शक प्रा.संजय मगर यांनी देशातील बहुजन समाजाला एकाकी पाडून, त्यांना शिक्षण, नोकऱ्या व्यवसाय यात कोंडमारा करून हलाकीची परिस्थिती निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु असून बहुजन समाजाच्या नोकºया आरक्षण पळविल्या व लाचारी, गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न सुरु असल्यामुळे वेळीच बहुजन विद्यार्थ्यांनी क्रांतीसाठी उठून तयार असावे. विद्यार्थ्यांनो तुमचे भविष्याचे तुम्हीच शिल्पकार आहात.कार्यक्रमाचे आयोजन, व्यवस्थापन संदीप मोटघरे, शुभम राहांगडाले, बी.आर.व्ही.एम. चे जिल्हा व पवनी तालुका पदाधिकारी श्रीकांत देशमुख, अश्विन मेश्राम, हरिश उकरे, मोनू पचारे, ऐश्वर्या दहिवले, प्रणय शेंडे, पंकज पडोळे, वासंती भुरे, कार्तिक अन्नपुर्णे, संदीप शेरकुरे, शुभम माथूरकर, आशिष भुरे, अंजनी भाजीपाले, स्नेहल हुमणे, प्रज्ञा मेश्राम, चेतन जनबंधू, पूनम शेंडे, मोनू पचारे, अक्षय लकडस्वार, रोशन मेंढे, प्रगती रामटेके, पुष्पा कावळे, पंकज पत्रे, शुभम राहांगडाले, शशांक नागदेवे, प्रतिक गजभिये यांनी व्यवस्थापनात सहकार्य केले.