शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणावी

By admin | Updated: January 12, 2016 00:43 IST

आपल्या देशात रोज ४००-५०० लोकांचा मृत्यू हा रस्ता अपघाताने होतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटनभंडारा : आपल्या देशात रोज ४००-५०० लोकांचा मृत्यू हा रस्ता अपघाताने होतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे. याचे मुख्य कारण मानवी चूक हेच आहे. देशात स्वयंशिस्तीचा अभाव आहे. युवकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणावी तर आपण रस्त्यावर होणारे अपघात कमी करू शकतो. रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा देशासाठी रक्त सांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.२७ वा रस्ता सुरक्षा सप्ताह १० ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, सर्वात उत्तम ब्रेक हा मनाचा आहे. पालकांच्या वागण्यातूनच मुलांवर संस्कार होत असतात. मात्र आपल्यावर पिढ्यानपिढ्यांपासून केवळ बेशिस्तीचा संस्कार होत आहे. जोपर्यंत आपण स्वत:ला शिस्त लावणार नाही तोपर्यंत आपण महासत्ता होवू शकणार नाही. शाळेत, महाविद्यालयात आणि घरी मस्ती करा, मात्र रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.पोलीस अधीक्षक विनिता साहू म्हणाल्या, मुलांच्या शालेय बसेस आणि आॅटोरिक्षा सुरक्षा नियमांचे पालन करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी पालकांची सुद्धा आहे. आॅटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसविले तर अपघाताची शक्यता जास्त असते. त्यामुळे रस्ता सुरक्षा नियम सर्वांनीच पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.दीप प्रज्वलनाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी अपघात कसे होतात याबद्दल चित्रफिती दाखविण्यात आल्यात. रस्ता सुरक्षेसंदर्भात मोटार वाहन निरीक्षक चिंचोळकर यांनी तयार केलेल्या काऊंट डाऊन या चित्रफितीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले. संचालन आरती देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंदुलकर यांनी केले.या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर अडे, उपशिक्षणाधिकारी आयलवार, पोलीस अधिाकरी, वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)