शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणावी

By admin | Updated: January 12, 2016 00:43 IST

आपल्या देशात रोज ४००-५०० लोकांचा मृत्यू हा रस्ता अपघाताने होतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटनभंडारा : आपल्या देशात रोज ४००-५०० लोकांचा मृत्यू हा रस्ता अपघाताने होतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे. याचे मुख्य कारण मानवी चूक हेच आहे. देशात स्वयंशिस्तीचा अभाव आहे. युवकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणावी तर आपण रस्त्यावर होणारे अपघात कमी करू शकतो. रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा देशासाठी रक्त सांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.२७ वा रस्ता सुरक्षा सप्ताह १० ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, सर्वात उत्तम ब्रेक हा मनाचा आहे. पालकांच्या वागण्यातूनच मुलांवर संस्कार होत असतात. मात्र आपल्यावर पिढ्यानपिढ्यांपासून केवळ बेशिस्तीचा संस्कार होत आहे. जोपर्यंत आपण स्वत:ला शिस्त लावणार नाही तोपर्यंत आपण महासत्ता होवू शकणार नाही. शाळेत, महाविद्यालयात आणि घरी मस्ती करा, मात्र रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.पोलीस अधीक्षक विनिता साहू म्हणाल्या, मुलांच्या शालेय बसेस आणि आॅटोरिक्षा सुरक्षा नियमांचे पालन करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी पालकांची सुद्धा आहे. आॅटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसविले तर अपघाताची शक्यता जास्त असते. त्यामुळे रस्ता सुरक्षा नियम सर्वांनीच पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.दीप प्रज्वलनाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी अपघात कसे होतात याबद्दल चित्रफिती दाखविण्यात आल्यात. रस्ता सुरक्षेसंदर्भात मोटार वाहन निरीक्षक चिंचोळकर यांनी तयार केलेल्या काऊंट डाऊन या चित्रफितीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले. संचालन आरती देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंदुलकर यांनी केले.या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर अडे, उपशिक्षणाधिकारी आयलवार, पोलीस अधिाकरी, वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)