शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

ग्रामीण भागातील विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाहुणगावची गुणवंत विद्यार्थिनी, समाजकार्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ग्रामीण प्रतिभेला योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले तर काय होऊ शकते याचे जीवंत उदाहरण लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे बघावयास मिळते. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थिनीने गोंडवाना विद्यापीठातून समाजकार्य पदव्युत्तर पदवी गुणवत्तेसह प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींपुढे तिने आदर्श निर्माण केला.मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले. खरे पाहता मुन्नीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेतले. शाळेत जाताना ती दररोज सायकलने जायची.शालेय शिक्षणापासूनच तिला समाजसेवेची आवड होती. याच क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला. त्यामुळे तिने बारावीनंतर बीएसडब्लू अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. गडचिरोली येथे जाऊन तिने बीएसडब्लू पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तीने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकत्याच लागलेल्या निकालात मुन्नी कावळे गोंडवाणा विद्यापीठातून प्रथम मेरिट आली. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवत मुन्नीने तालुक्याच्या शिरात मानाचा तुरा खोवला. तिचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.ग्रामीण प्रतीभामुन्नी कावळे या विद्यार्थिनीने ग्रामीण प्रतीभा सिद्ध करून दाखविली. विविध अडचणींचा सामना करीत तिने उच्च शिक्षण घेतले. प्रत्येक परीक्षेत ती गुणवत्ता यादीत चमकत गेली. समाजकार्य विषयाची पदव्युत्तर पदवी तिने विद्यापिठातून प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. आता तिला ग्रामीण भागातील समस्यांवर अभ्यास करावयाचा आहे. तिने जे ग्रामीण भागात अनुभवले त्या समस्या तिला उजागर करून सोडविण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. ग्रामीण महिलांच्या समस्यांवरही तिला काम करावयाचे आहे. ग्रामीण भागातून आलेली ही विद्यार्थिनी समाजकार्य विषयातून आता आपल्या गावालाच नव्हे तर परिसराला विकसित करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थी