शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

ग्रामीण भागातील विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाहुणगावची गुणवंत विद्यार्थिनी, समाजकार्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ग्रामीण प्रतिभेला योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले तर काय होऊ शकते याचे जीवंत उदाहरण लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे बघावयास मिळते. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थिनीने गोंडवाना विद्यापीठातून समाजकार्य पदव्युत्तर पदवी गुणवत्तेसह प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींपुढे तिने आदर्श निर्माण केला.मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले. खरे पाहता मुन्नीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेतले. शाळेत जाताना ती दररोज सायकलने जायची.शालेय शिक्षणापासूनच तिला समाजसेवेची आवड होती. याच क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला. त्यामुळे तिने बारावीनंतर बीएसडब्लू अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. गडचिरोली येथे जाऊन तिने बीएसडब्लू पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तीने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकत्याच लागलेल्या निकालात मुन्नी कावळे गोंडवाणा विद्यापीठातून प्रथम मेरिट आली. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवत मुन्नीने तालुक्याच्या शिरात मानाचा तुरा खोवला. तिचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.ग्रामीण प्रतीभामुन्नी कावळे या विद्यार्थिनीने ग्रामीण प्रतीभा सिद्ध करून दाखविली. विविध अडचणींचा सामना करीत तिने उच्च शिक्षण घेतले. प्रत्येक परीक्षेत ती गुणवत्ता यादीत चमकत गेली. समाजकार्य विषयाची पदव्युत्तर पदवी तिने विद्यापिठातून प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. आता तिला ग्रामीण भागातील समस्यांवर अभ्यास करावयाचा आहे. तिने जे ग्रामीण भागात अनुभवले त्या समस्या तिला उजागर करून सोडविण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. ग्रामीण महिलांच्या समस्यांवरही तिला काम करावयाचे आहे. ग्रामीण भागातून आलेली ही विद्यार्थिनी समाजकार्य विषयातून आता आपल्या गावालाच नव्हे तर परिसराला विकसित करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थी