शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या आवासून उभ्या असतांनाही प्रशासनातर्फे समस्या सोडविण्यात येत नाही. त्यामुळे बहूजन रिपब्लिकन विद्यार्थीमोर्चा जिल्हा शाखेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट ऑफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकजुटीच्या माध्यमातून एकत्रीत येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.हल्लाबोल महामोर्च्यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह बेरोजगारांनी सहभाग घेतला. मागण्यांमध्ये जिल्ह्यामध्ये ओबीसी वसतीगृह स्थापन करण्यात यावे, पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या जागेत वाढ करावी अन्यथा पोलीस भरती रद्द करण्यात यावी. इतर शासकीय वसतीगृहात ओबीसी प्रवर्गाच्या जागा वाढविण्यात याव्या, त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळावा, शिष्यवृत्तीत वाढ करावी, देशात होणारे खासगीकरण थांबविण्यात यावे, रोजगार निर्मितीसाठी विदर्भ राज्याची स्थापना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.मोर्च्यात बेरोजगारांचीही उपस्थितीविद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या हल्लाबोल महामोर्च्यात विद्यार्थ्यांसह बेरोजगारांनी उपस्थिती लावली होती. या मोर्च्यात बीआरव्हीएमचे योगेश शेंडे, शुभम रामटेके, पंकज पडोळे, निशांत बडोले, शामिल गजघाटे, शशांक रंगारी, पलास चुटे, वासंती भुरे, अंजली भाजीपाले, पंकज पतरे, शुभम रहांगडाले, पुजा सारवे, निशा पारधी, भावना शहारे, प्रतिक गजभिये, सुशांत नागदेवे, पितांबर गौपाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शासनाचे दुर्लक्षजिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी ९ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही मागण्यांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यानंतर पुन्हा २१ आॅगस्टला निवेदन देण्यात आले. त्यावेळी शासनाला अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही समस्या सुटली नसल्याने अखेर मोर्च्याचा मार्ग पत्करला.

टॅग्स :Studentविद्यार्थीMorchaमोर्चा