शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या आवासून उभ्या असतांनाही प्रशासनातर्फे समस्या सोडविण्यात येत नाही. त्यामुळे बहूजन रिपब्लिकन विद्यार्थीमोर्चा जिल्हा शाखेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट ऑफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकजुटीच्या माध्यमातून एकत्रीत येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.हल्लाबोल महामोर्च्यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह बेरोजगारांनी सहभाग घेतला. मागण्यांमध्ये जिल्ह्यामध्ये ओबीसी वसतीगृह स्थापन करण्यात यावे, पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या जागेत वाढ करावी अन्यथा पोलीस भरती रद्द करण्यात यावी. इतर शासकीय वसतीगृहात ओबीसी प्रवर्गाच्या जागा वाढविण्यात याव्या, त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळावा, शिष्यवृत्तीत वाढ करावी, देशात होणारे खासगीकरण थांबविण्यात यावे, रोजगार निर्मितीसाठी विदर्भ राज्याची स्थापना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.मोर्च्यात बेरोजगारांचीही उपस्थितीविद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या हल्लाबोल महामोर्च्यात विद्यार्थ्यांसह बेरोजगारांनी उपस्थिती लावली होती. या मोर्च्यात बीआरव्हीएमचे योगेश शेंडे, शुभम रामटेके, पंकज पडोळे, निशांत बडोले, शामिल गजघाटे, शशांक रंगारी, पलास चुटे, वासंती भुरे, अंजली भाजीपाले, पंकज पतरे, शुभम रहांगडाले, पुजा सारवे, निशा पारधी, भावना शहारे, प्रतिक गजभिये, सुशांत नागदेवे, पितांबर गौपाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शासनाचे दुर्लक्षजिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी ९ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही मागण्यांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यानंतर पुन्हा २१ आॅगस्टला निवेदन देण्यात आले. त्यावेळी शासनाला अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही समस्या सुटली नसल्याने अखेर मोर्च्याचा मार्ग पत्करला.

टॅग्स :Studentविद्यार्थीMorchaमोर्चा