शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

विद्यार्थ्यांनी राबविला पाणी पुनर्वापर उपक्रम

By admin | Updated: October 9, 2014 22:58 IST

पाणी त्याची बाणी अशी म्हण सर्वांना ऐकिवात आहे. पाणी असेल तर सर्व काही सोपस्कार होते पण पाणी नसेल तर मानव प्राण्याला दाही दिशा भटकावे लागते.

मासळ : पाणी त्याची बाणी अशी म्हण सर्वांना ऐकिवात आहे. पाणी असेल तर सर्व काही सोपस्कार होते पण पाणी नसेल तर मानव प्राण्याला दाही दिशा भटकावे लागते. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी व इतर नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. निसर्ग आपणास सर्व काही देते पण नियोजनाच्या अभावामुळे आपण बऱ्याच समस्यांना सामोरे जातो. असाच एक उपक्रम प्राचार्य जी.एन. टिचकुले यांच्या नियोजनातून पुढे आलेला आहे.सुबोध विद्यालयात सुमारे ९०० विद्यार्थी विद्यार्जन करतात व माध्यान्ह भोजन व पिण्याचे पाणी यांचा उपयोग घेतात. परंतु बहुतांश पाणी वाया जात होते. दररोज दिड ते दोन हजार लिटर पाणी सांडपाणी वाया जात असताना त्याचा उपयोग करता येईल काय, यावर विचार सुरू होता. त्या पाण्याचा उपयोग शालेय परिसरातील फुलझाडे व इतर झाडांना होण्याच्या दृष्टीने तो पाणी एका १० बाय ५ फुटांच्या टाकीत साठवून विद्यार्थ्यांच्या मदतीने झाडांना दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्वसुद्धा कळू लागले. दररोज शाळा सुटण्यापूर्वी दिवसभराचा सांडपाणी टाकीत जमा करून नंतर त्याचा वापर झाडांना करतात. यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी कायम राखण्यास मदत झाली आहे व पाणी समस्येवर मात सुद्धा करता आली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाण्याचा पुर्नवापर कसा करावा व स्वत:च्या घरी सुद्धा याचा वापर कशाप्रकारे योग्यरित्या करता येईल याबाबत प्राचार्य टिचकुले नेहमीच मार्गदर्शन करतात. (वार्ताहर)