शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:08 IST

शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीकरिता कर्ज काढावे की मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा असताना सरकारने विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्तीचे वाटप केले

ठळक मुद्देपवनीत आंदोलन : जिल्हाधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीकरिता कर्ज काढावे की मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा असताना सरकारने विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्तीचे वाटप केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शिक्षण सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा पवनी तालुका तर्फे शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा पवनी तहसील कार्यालयावर बुधवारी धडकला.मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता चुटे रंगमंदिर येथून झाली. मोर्चात सहभागी होण्याकरिता विद्यार्थी शाळेच्या गणवेशात सकाळपासूनच सुरुवात झाली. १० पर्यंत शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी जमा झाल्यानंतर मोर्चास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी घोषणा देवून पवनी शहर दणाणून सोडले. मोर्चा मार्गक्रमण करीत डॉ.आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गाने तहसील कार्यालयाजवळ पोहचताच पोलिसांनी अडविल्यामुळे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेला आयोजकांनी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करून तहसीलदारांनी आंदोलनस्थळी येण्याची मागणी करण्यात आली.दुपारी १.३० वाजता पवनीचे तहसीलदार गजानन कोकुडे यांनी आंदोलनकरी विद्यार्थ्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारून ते सरकारपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिलयानंतर आंदोलन संपविले. निवेदनात दोन वर्षापासून थकीत असलेली शिष्यवृत्ती द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कपात न करता द्यावी व क्रिमिलीअरची अट रद्द करावी, ओबीसी जनगणना प्रकाशित करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व बीआरव्हीएमचे विदर्भ संयोजक इंजि. संजय मगर, राजू झोडे, योगेश शेंडे, स्वप्नील मेश्राम, देवेश शेंडे, ऐश्वर्या दहिवले, श्रीकांत शहारे यांनी केले. मोर्चात अश्विन मेश्राम, श्रीकांत देशमुख, चंद्रकांत देशपांडे, मनू पचारे, हरीश उकरे, वासंती भुरे, पवन शेंडे, त्रिरत्न रामटेके, कार्तीक अन्नपुर्णे, प्रज्ञा मेश्राम, आशिष भुरे, अक्षय लकडस्वार, शुभम माथूरकर, पंकज पडोळे आदी उपस्थित होते.