शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता स्थापनेपूर्वी अखर्चित निधी खर्च करण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. १९ जानेवारी रोजी निकालही घोषित झाला. परंतु अद्याप सत्तास्थापनेच्या कोणत्याच हालचाली नाहीत. निवडून आलेले सदस्य सत्तास्थापनेकडे डोळे लावून बसले आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेतील अखर्चित निधी कसा खर्च करता येईल, याचे आडाखे बांधले जात आहेत. काही स्थानिक नेते प्रशासकांना हाताशी धरून मनमर्जीने निधी घेत असल्याची सध्या जिल्हा परिषदेत चर्चा आहे.

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निवडणूक निकाल लागून दीड महिना झाला तरी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची कोणतीच हालचाल दिसत नाही. गत दीड वर्षापासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. आता सत्तास्थापन होण्यापूर्वी अखर्चित निधी खर्च करण्यासाठी धडपड सुरू असून, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवर जिल्ह्यातील काही नेत्यांचा डोळा आहे, तर दुसरीकडे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमर्जीने प्रशासकीय काम सुरू आहे.भंडारा जिल्हा परिषदेची मुदत संपली. मात्र कोरोनामुळे निवडणूक होऊ शकली नाही.  त्यामुळे दीड वर्षापूर्वी प्रशासक नियुक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले. आता जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. १९ जानेवारी रोजी निकालही घोषित झाला. परंतु अद्याप सत्तास्थापनेच्या कोणत्याच हालचाली नाहीत. निवडून आलेले सदस्य सत्तास्थापनेकडे डोळे लावून बसले आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेतील अखर्चित निधी कसा खर्च करता येईल, याचे आडाखे बांधले जात आहेत. काही स्थानिक नेते प्रशासकांना हाताशी धरून मनमर्जीने निधी घेत असल्याची सध्या जिल्हा परिषदेत चर्चा आहे.१५ व्या वित्त आयोगाचा ८० टक्के निधी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना १० टक्के निधी ७ पंचायत समितींना तर उर्वरित १० टक्के निधी जिल्हा परिषदेला मिळाला. जिल्हा परिषद हा निधी बांधकाम अंतर्गत खर्च करीत असताना सर्व निधी मर्जीच्या ग्रामपंचायतींना देण्याचा प्रकार सुरू आहे. १० टक्के निधी बांधकाम विभागामार्फत खर्च करणे अपेक्षित असताना सर्व नियम धाब्यावर बसवून ग्रामपंचायतीला का दिला जातो, असा सवाल निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य करीत आहेत.विशेष  म्हणजे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत आमदार-खासदार निधी, जिल्हा बांधकाम विकास निधी व अन्य सर्व विकास निधी खर्च केला जातो. मात्र, आता जिल्हा परिषदेचा स्वनिधी दुसऱ्यामार्फत तोही नियमबाह्य खर्च करण्याचा सपाटा लावला आहे. जिल्हा परिषदेत हा निधी मिळविण्यासाठी अनेक जण तळ ठोकून असून, विविध माध्यमातून प्रशासकांवर दबाव आणत आहेत. विशेष म्हणजे सत्तास्थापन होण्यापूर्वी हा निधी लाटण्याचा प्रयत्न आहे.

निवडून आलेल्या सदस्यांची वाढली चिंता- जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल घोषित होऊन दीड महिना झाला तरी अद्याप सत्तास्थापनेच्या कोणत्याच हालचाली नाहीत. ग्रामविकास मंत्रालयानेही चुप्पी साधली आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांची चिंता वाढली आहे. प्रशासनाच्या दृष्टीने मार्च महिना महत्त्वाचा असतो. जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हटले जाते; परंतु सत्ता स्थापन झाली नसल्याने सर्व अधिकार अधिकाऱ्यांच्याच हातात आहेत.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद