शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:52 IST

राबराब राबूनही हक्काचे किमान वेतन मिळत नाही. प्राथमिक सुविधाही मिळत नाही. हक्काची मागणी केल्यास दमदाटी करून कामावरून कमी करणे या प्रकाराला सनफ्लॅगचे कर्मचारी कंटाळले होते. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारपासून कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कंपनीतील ३०० च्या वर कामगार सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसनफ्लॅग कंपनीतील कामगार आक्रमक : मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही

तथागत मेश्रामवरठी : राबराब राबूनही हक्काचे किमान वेतन मिळत नाही. प्राथमिक सुविधाही मिळत नाही. हक्काची मागणी केल्यास दमदाटी करून कामावरून कमी करणे या प्रकाराला सनफ्लॅगचे कर्मचारी कंटाळले होते. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारपासून कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कंपनीतील ३०० च्या वर कामगार सहभागी झाले होते.मागण्यांबाबत व्यवस्थापनाशी चर्चा झाली; परंतु ठोस निर्णय न झाल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला होता. त्यानंतर कामगारांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी केली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा अनेकांनी पाढा वाचला. सायंकाळी काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले हे ठिय्या आंदोलनात सहभागी होऊन ते कामगारांसह कंपनीच्या गेटसमोर बसून होते. दरम्यान पोलीस प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली.यावेळी माजी आमदार मधुकर कुकडे, अ‍ॅड.आंनदराव वंजारी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कारेमोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, वरठीच्या सरपंच श्वेता येळणे, झिया पटेल, अ‍ॅड.शशिर वंजारी, डॉ.पंकज कारेमोरे, प्रमोद तितीरमारे,माजी उपसरपंच मनोज सुखानी, प्रसन्न चकोले, अतुल भोवते, राजकपूर राऊत, चेतन ठाकूर, चेतक डोंगरे, पुष्पा भुरे, ग्रामपंचायत सदस्य संघरत्न उके, योगेश हटवार, विशाल शेंडे, अरविंद येळणे उपस्थित होते.सायंकाळी ७.३० वाजता मध्यस्थी म्हणून व्यवस्थापन व आंदोलनकर्ते यांच्यात कंपनीच्या विश्रामगृहात चर्चा झाली. यावेळी कामगारांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. चर्चेअंती व्यवस्थापन व आंदोलनकर्ते ठोस निर्णयापर्यंत आले नाही. व्यवस्थापनाने वेळ मारून नेली. मागण्याबाबत पाहतो, तपासून घेतो आणि कळवतो, या व्यतिरिक्त तोडगा निघाला नाही. यावेळी सनफ्लॅग कंपनीचे एस. के. गुप्ता, एचआर विभागाचे उपमहाव्यव्यस्थापक सतीश श्रीवास्तव, संचालक दळवी, स्थायी कामगार संघटनेचे मिलिंद वासनिक, रवी बोरकर, किशोर मारवाडे, विकास बांते, महेश बर्वेकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, तहसीलदार सूर्यकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड हे उपस्थित होते. कामगारांचे हे आंदोलन रात्री १० वाजतापर्यंत सुरू होते.या चर्चेत १० मागण्यांपैकी एकाही मागणीवर ठोस निर्णय झाला नाही. व्यवस्थापनाने मागण्यांबाबत निर्णय घेण्यास वेळ मागितला आहे. तूर्तास निर्णय न झाल्यामुळे कामगारांमध्ये रोष होता. सनफ्लॅग कंपनीला ३० वर्षे झाली. सुरूवातीचे आंदोलन सोडले तर ३० वर्षांपासून सुरळीत असून कालच्या आंदोलनाने भूतकाळातील घटनांची पुनरावृत्ती होण्याचे संकेत दिले आहे.