शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

ढोलसर गावात वादळाचा कहर

By admin | Updated: June 3, 2015 00:40 IST

१ जूनच्या रात्री १२ च्या सुमारास वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले....

विरली (बु.) : १ जूनच्या रात्री १२ च्या सुमारास वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळच्या ढोलसर या गावाला या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. येथील अनेक घरांचे छत, कवेलू आणि टिनपत्रे उडाल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने उन्हाळी धान आणि ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.रात्री अचानक मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. ढोलसर येथील अनेक घरांवरील छत, कवेलू आणि टिनपत्रे उडाली. गुरांच्या गोठ्यावरील टिनपत्रे पडल्याने जनावरे जखमी झाली. मात्र सदैवाने गावात कुठेही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वादळाच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळून पडली. त्याचप्रमाणे विजेचे खांबही कोसळले. त्यामुळे येथील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वादळी पावसाच्या तडाख्याने उन्हाळी धान आणि ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)नुकसानीच्या पंचनाम्याची फाईल गहाळ?मागील वर्षी १० जून रोजी आलेल्या वादळाने या परिसरातील २०-२५ गावांना तडाखा बसला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्याची भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही. त्यावेळी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची फाईल गहाळ झाल्याची कुजबूज आहे. त्यामुळे महसूल विभाग शेतकऱ्यांच्या नुकसानीविषयी किती जागृत आहे याची कल्पना यावी. मात्र येथील जनप्रतिनिधी याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार की नाही ? याविषयी गावकरी साशंक आहेत.