शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

स्वातंत्र्याचा उदय अनुभवणारी पाथरीची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

‘यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी’ या म्हणीला सार्थ करीत शेकडो विद्यार्थी या शाळेतून ज्ञान घेवून बाहेर पडले. अनेक विद्यार्थी आजघडीला शासकीय सेवेतही कार्यरत आहेत. पवनीचे गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, केंद्रप्रमुख बी. आर. मेश्राम यांच्या मार्गदर्शनामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.

ठळक मुद्देघडविले १८३२ विद्यार्थ्यांचे भवितव्य : वैनगंगा नदीच्या कुशीत वसलेले गाव, विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वातंत्र्याचा उदय अनुभवणारी शाळा म्हणून पवनी तालुक्यातील पाथरी स्थित जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेचे नाव घेतले जाते. गत सात दशकात १८३२ विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या शाळेने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासावरही लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचा अनन्यसाधारण वाटा आहे.जीवनदायीनी वैनगंगा नदीच्या कुशीत वसलेले तथा १०९६ इतकी लोकसंख्या असलेले पाथरी (पुन.) गाव येथे २१ एप्रिल १९४९ रोजी जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेचे स्थापना करण्यात आली. ज्ञार्नाजनासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास तसेच अनेक मुल्य रुजवून सक्षम नागरीक बनविण्यावर शिक्षक तथा पालक प्रयत्नरत आहेत.‘यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी’ या म्हणीला सार्थ करीत शेकडो विद्यार्थी या शाळेतून ज्ञान घेवून बाहेर पडले. अनेक विद्यार्थी आजघडीला शासकीय सेवेतही कार्यरत आहेत. पवनीचे गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, केंद्रप्रमुख बी. आर. मेश्राम यांच्या मार्गदर्शनामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. महापुरुषांचे विचार रुजविण्यासोबतच वैयक्तिक स्वच्छता, दिनांकाचा पाढा, सामान्य ज्ञान, म्हणींचा अर्थ विद्यार्थ्यांचे वाढदिवस, शालेय परिसरात परसबाग, बाल आनंद मेळावा, कला प्रदर्शनी, विज्ञान प्रदर्शन, क्षेत्र भेट, स्नेहसंमेलन आदी उपक्रम राबविले जात आहे.विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठसत्र २०१९-२० या वर्षात शाळेची पटसंख्या ९३ असून पाच शिक्षक कार्यरत आहेत. यावर्षी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता शाळेतून चार विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. तसेच सात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. नियोजनबध्द विविध उपक्रमासह शाळा राबवित असल्याने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना संधी मिळत आहे. परिणामी त्यांच्यातील सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी स्वतंत्र असे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यासाठी सर्वांचेच सहकार्य लाभत आहे.इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे पेव फुटले असले तरी त्या शाळांमधून गावचे विद्यार्थी परत आले आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर आमचा भर आहे.- दिनकर काटेखाये, मुख्याध्यापकशिस्त व विविध उपक्रम शिक्षकगण राबवित असून ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभत आहे.- जयश्री रोडगे, सरपंच पाथरीशिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमामुळे व कार्यशैलीने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले आहे.- नंदलाल भुरे, अध्यक्ष शाळासमिती

टॅग्स :Schoolशाळा