शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचा उदय अनुभवणारी पाथरीची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

‘यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी’ या म्हणीला सार्थ करीत शेकडो विद्यार्थी या शाळेतून ज्ञान घेवून बाहेर पडले. अनेक विद्यार्थी आजघडीला शासकीय सेवेतही कार्यरत आहेत. पवनीचे गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, केंद्रप्रमुख बी. आर. मेश्राम यांच्या मार्गदर्शनामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.

ठळक मुद्देघडविले १८३२ विद्यार्थ्यांचे भवितव्य : वैनगंगा नदीच्या कुशीत वसलेले गाव, विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वातंत्र्याचा उदय अनुभवणारी शाळा म्हणून पवनी तालुक्यातील पाथरी स्थित जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेचे नाव घेतले जाते. गत सात दशकात १८३२ विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या शाळेने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासावरही लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचा अनन्यसाधारण वाटा आहे.जीवनदायीनी वैनगंगा नदीच्या कुशीत वसलेले तथा १०९६ इतकी लोकसंख्या असलेले पाथरी (पुन.) गाव येथे २१ एप्रिल १९४९ रोजी जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेचे स्थापना करण्यात आली. ज्ञार्नाजनासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास तसेच अनेक मुल्य रुजवून सक्षम नागरीक बनविण्यावर शिक्षक तथा पालक प्रयत्नरत आहेत.‘यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी’ या म्हणीला सार्थ करीत शेकडो विद्यार्थी या शाळेतून ज्ञान घेवून बाहेर पडले. अनेक विद्यार्थी आजघडीला शासकीय सेवेतही कार्यरत आहेत. पवनीचे गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, केंद्रप्रमुख बी. आर. मेश्राम यांच्या मार्गदर्शनामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. महापुरुषांचे विचार रुजविण्यासोबतच वैयक्तिक स्वच्छता, दिनांकाचा पाढा, सामान्य ज्ञान, म्हणींचा अर्थ विद्यार्थ्यांचे वाढदिवस, शालेय परिसरात परसबाग, बाल आनंद मेळावा, कला प्रदर्शनी, विज्ञान प्रदर्शन, क्षेत्र भेट, स्नेहसंमेलन आदी उपक्रम राबविले जात आहे.विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठसत्र २०१९-२० या वर्षात शाळेची पटसंख्या ९३ असून पाच शिक्षक कार्यरत आहेत. यावर्षी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता शाळेतून चार विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. तसेच सात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. नियोजनबध्द विविध उपक्रमासह शाळा राबवित असल्याने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना संधी मिळत आहे. परिणामी त्यांच्यातील सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी स्वतंत्र असे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यासाठी सर्वांचेच सहकार्य लाभत आहे.इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे पेव फुटले असले तरी त्या शाळांमधून गावचे विद्यार्थी परत आले आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर आमचा भर आहे.- दिनकर काटेखाये, मुख्याध्यापकशिस्त व विविध उपक्रम शिक्षकगण राबवित असून ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभत आहे.- जयश्री रोडगे, सरपंच पाथरीशिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमामुळे व कार्यशैलीने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले आहे.- नंदलाल भुरे, अध्यक्ष शाळासमिती

टॅग्स :Schoolशाळा