शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

आरोग्य विभागात संपूर्ण राज्यभरात २० हजारांपेक्षाही जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून भंडारा जिल्ह्यात ५०० च्या वर कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. मात्र शासन कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याने राज्यभरात कर्मचारी महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष, शासनसेवेत कायम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत गत १५ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय बेमुदत आंदोलनाला सोमवारपासून सुरूवात केली असून शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघ भंडारा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निषेध करण्यात आला.आरोग्य विभागात संपूर्ण राज्यभरात २० हजारांपेक्षाही जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून भंडारा जिल्ह्यात ५०० च्या वर कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. मात्र शासन कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याने राज्यभरात कर्मचारी महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू आहे.तीन टप्यात आंदोलनाला सुरूवात झाली असून शासनाने वेळीच आंदोलनाची दखल न घेतल्यास आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास कर्मचारी जबाबदारी राहणार नाहित असा इशारा संघटनेने दिला आहे.शासन आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची महाभरती करणार असून या भरतीत कंत्राटी पदावर १० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही परीक्षा न घेता कायमस्वरूपी शासनसेवेत सामावून घेवून मानधनात वाढ करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनाला आरोग्यसेवक समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली राऊत, उपाध्यक्ष सुष्मा बांगडकर, नफिसा सैय्यद, भारती भांडारकर, स्मिता फुले, वैशाली राऊत, पल्लवी बावनकर, सुप्रिया मोटघरे, वर्षा बांते, कविता बारसागडे, सीमा वासनिक, संगिता आकरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.यासंदर्भात संघटनेतर्फे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्याधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेवून न्याय देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.गत १५ वर्षांपासून रुग्णांना सेवा देत आहोत. मात्र शासनाकडून दुजाभाव होत असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी संघटनेतर्फे आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनाची शासनाने योग्य वेळीच दखल घ्यावी.-वर्षा रामटेके, जिल्हाध्यक्ष कर्मचारी महासंघ, भंडारा.शासनाकडून नवनियुक्त कर्मचाऱ्यांना तसेच स्थायी कर्मचाऱ्यांना अधिक वेतन दिले जाते. मात्र तेच काम कंत्राटी कर्मचारी अल्प मानधनावर करीत आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करुन न्याय द्यावा.-वैशाली राऊत, महिला कर्मचारी, भंडारा.

टॅग्स :Healthआरोग्यStrikeसंप