लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यमार्ग ३५६ तुमसर नाकाडोंगरी मार्गावर जागो जागी मोठ-मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात या ठिकाणी अपघाताची मालिका सुरु आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने मूग गिळूनची भूमिका घेतली आहे. परिणामी राज्यमार्ग कर्दनकाळ बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे करण्याकरिता शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी केली आहे. नागपूर सिवनी महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक तुमसर बावनथडी कटंगी (राज्य मार्ग क्र.३५६) कडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मार्ग क्रमांक ३५६ वर वाहतुकीचा अतिरिक्त भार आलेला आहे.परिणामी दिवस रात्र विशेष करून टूकांच्या संख्येत खुप मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. परंतु सदर मार्ग हा राज्य मार्ग दर्जाचा असून सदर मार्गावर राष्ट्रीय महामार्ग अतिरिक्त वाहतुकीचा भार आल्यामुळे पुन्हा तुमसर नाकडोंगरी राज्य मार्गावर गोबरवाही पासून सुंदरटोला राजापूर नाकडोंगरी बावनथडी पर्यंत ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत. आता हे खड्डे व चाळण झालेला राज्यमार्ग मृत्यूचा कर्दनकाळ ठरण्याची बांधकाम विभाग प्रतीक्षा करत आहे का असा जवाब शिवसेनेने करून तात्काळ राज्य मार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याच्या इशारा निवेदनाच्या माध्यमातून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व शेखर कोतपल्लीवार यांनी दिला आहे.
राज्यमार्ग बनतोय कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी केली आहे. नागपूर सिवनी महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक तुमसर बावनथडी कटंगी (राज्य मार्ग क्र.३५६) कडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मार्ग क्रमांक ३५६ वर वाहतुकीचा अतिरिक्त भार आलेला आहे.
राज्यमार्ग बनतोय कर्दनकाळ
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : खड्डे बुजविण्याची मागणी, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष