शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

वैनगंगा शुद्धिकरणात राज्य शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:05 IST

जिल्ह्याची जीवनदायीनी असलेली वैनगंगा नदी अशुद्ध झालेली आहे. तिच्या शुद्धीकरणासाठी राज्य शासन उदासीन असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमेटीचा आरोप : दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची जीवनदायीनी असलेली वैनगंगा नदी अशुद्ध झालेली आहे. तिच्या शुद्धीकरणासाठी राज्य शासन उदासीन असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला आहे.यासंदर्भात नाग नदीचे सांडपाणी वैनगंगा नदीत थांबविण्याबाबत कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागनदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात विलिन होत आहे. तेच पाणी वैनगंगा काठावरील वसलेल्या गावामध्ये पिण्यासाठी वापरले जात असल्याने मानवी आरोग्यावर गंभीर परिणामी होताना दिसत आहे. सदर विषयावर त्वरीत तोडगा काढावा अन्यथा वैनगंगा नदी बचावकरिता जिल्ह्यातील जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल केली होती. त्याअनुषंगाने न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी आदेश पारित करून पाणी दूषित करणाºया सर्व यंत्रणेला वैनगंगा नदीत येणारे सांडपाणी शुद्ध करून सोडण्याचे आदेश निर्गमित केले होते. परंतु अद्याप यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.नागपूर महानगर पालिकेने सदर प्रदूषित सांडपाणी शुद्ध करण्याकरिता प्रकल्प उभारणार असल्याचे सांगितले होते. तसेच केंद्र शासनाच्या एनआरसीपी अंतर्गत मंजुरी प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार होती. परंतु प्रकल्प मंजुर केव्हा होईल व अंमलबजावणीसाठी किती कालावधी लागेल या प्रश्नांचे उत्तर अनुत्तरीत आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी स्विकारले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, सेवादलचे अध्यक्ष अरविंद कारेमोरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, अजय गडकरी, मुकूंद साखरकर, प्रशांत देशकर, शंकर तेलमासरे, मनोहर उरकुडकर, अमर रगडे, शंकर राऊत, आवेश पटेल, धनराज साठवणे, भूषण टेंभुर्णे आदी उपस्थित होते.