शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

वैनगंगा शुद्धिकरणात राज्य शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:05 IST

जिल्ह्याची जीवनदायीनी असलेली वैनगंगा नदी अशुद्ध झालेली आहे. तिच्या शुद्धीकरणासाठी राज्य शासन उदासीन असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमेटीचा आरोप : दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची जीवनदायीनी असलेली वैनगंगा नदी अशुद्ध झालेली आहे. तिच्या शुद्धीकरणासाठी राज्य शासन उदासीन असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला आहे.यासंदर्भात नाग नदीचे सांडपाणी वैनगंगा नदीत थांबविण्याबाबत कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागनदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात विलिन होत आहे. तेच पाणी वैनगंगा काठावरील वसलेल्या गावामध्ये पिण्यासाठी वापरले जात असल्याने मानवी आरोग्यावर गंभीर परिणामी होताना दिसत आहे. सदर विषयावर त्वरीत तोडगा काढावा अन्यथा वैनगंगा नदी बचावकरिता जिल्ह्यातील जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल केली होती. त्याअनुषंगाने न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी आदेश पारित करून पाणी दूषित करणाºया सर्व यंत्रणेला वैनगंगा नदीत येणारे सांडपाणी शुद्ध करून सोडण्याचे आदेश निर्गमित केले होते. परंतु अद्याप यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.नागपूर महानगर पालिकेने सदर प्रदूषित सांडपाणी शुद्ध करण्याकरिता प्रकल्प उभारणार असल्याचे सांगितले होते. तसेच केंद्र शासनाच्या एनआरसीपी अंतर्गत मंजुरी प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार होती. परंतु प्रकल्प मंजुर केव्हा होईल व अंमलबजावणीसाठी किती कालावधी लागेल या प्रश्नांचे उत्तर अनुत्तरीत आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी स्विकारले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, सेवादलचे अध्यक्ष अरविंद कारेमोरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, अजय गडकरी, मुकूंद साखरकर, प्रशांत देशकर, शंकर तेलमासरे, मनोहर उरकुडकर, अमर रगडे, शंकर राऊत, आवेश पटेल, धनराज साठवणे, भूषण टेंभुर्णे आदी उपस्थित होते.