शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

धान केंद्र तत्काळ सुरू करा

By admin | Updated: November 13, 2015 00:54 IST

धानाचे उत्पादन कीड व रोगांमुळे ५० ते ६० टक्के घटले आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून पडत्या भावात खरेदी सुरु असून फसवणूक व लुबाडबूक होत आहे.

आंदोलनाचा इशारा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणीकरडी (पालोरा) : धानाचे उत्पादन कीड व रोगांमुळे ५० ते ६० टक्के घटले आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून पडत्या भावात खरेदी सुरु असून फसवणूक व लुबाडबूक होत आहे. त्वरीत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस मोहाडी तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.जिल्ह्यात १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतले जात असून मोहाडी तालुक्याचे क्षेत्र ३२ हजार हेक्टरच्या घरात आहे. तालुक्यात हलके धान मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याचबरोबर सिंचनाची सोय असलेले शेतकरी भारी धानाची फसल घेतात. यावर्षी या दोन्ही पिकांवर रोगराईचे सावट निर्माण झाले. उभ्या धानाचे पीक लोंबीविना वाळून तण झाले. तुडतुडा, सावरदेवी, गादमाशी, लष्करी अळी व विविध रोगांनी हाती आलेले पीक हिसकावून घेतले. शेतात कीड व रोगांमुळे धानाला उग्र वास येत आहे. जनावरेही वाळून तण झालेली तणस खायला तयार नाहीत. अशी वाईट अवस्था आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणीलाही पडवत नसल्याने धान शेतात उभेच ठेवले आहे. तर काहींनी उभ्या धानाला आग लावली आहे. नागरटी, बियाणे, खते, औषधी, पेरणी व रोवणीचा खर्च, मजुरी, कापणी व मळणीचा खर्च लक्षात घेता, त्याचबरोबर दोन ते तिनदा पंपाने पाणी देण्याचा खर्च एकरी २० ते २२ हजारांचे वर गेले आहे. परंतु उत्पन्न मात्र अत्यल्प आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना तर एकही उत्पादन हाती मिळाले नाहीत. ५० ते ६० टक्के उत्पादनात घट असल्याचे मळणीवरून दिसून येत आहे. करडी परिसरात सुद्धा अत्यंत वाईट स्थिती आहे. धानाचे भाव पडले असताना अजूनही धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाहीत. आ.चरण वाघमारे या विषयावर मौन धारण करून आहेत. खोटे आश्वासन व जुमलेबाजीने फसवणूक करीत निवडून आलेले सरकार व त्यांचे आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या जखमांवर मिठ चोळीत उद्घाटनात व्यस्त आहेत.निदान काळा धानाचा पैसा प्रती शेतकरी १५ लाख रुपये देऊन शासनाने आश्वासनाची पूर्ती करावी, महागाई आटोक्यात आणावी, धानाला भाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे मोहाडी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, पं.स. सदस्य महादेव पचघरे, सरपंच किशोर माटे, लिलाधर कांबळे, उपासराव गाढवे, वामन राऊत, भगवान आगाशे, महादेव फुसे, अमरकंठ लांडगे, सुरेश बिसने, कवळू मुंगमोडे, सरपंच भूपेंद्र पवनकर, सुंदरबाई मुंगमोडे, राजधर शेंडे, वामन चकोले, भगवान तिजारे, संजय भोयर, नरेश ईश्वरकर, कार्तिक ईश्वरकर, हरिभाऊ शेंडे यांनी केली आहे. धान खरेदी केंद्र त्वरीत सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे. आमदार व खासदार महोदयांनी त्वरीत निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. (वार्ताहर)