शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

धान केंद्र तत्काळ सुरू करा

By admin | Updated: November 13, 2015 00:54 IST

धानाचे उत्पादन कीड व रोगांमुळे ५० ते ६० टक्के घटले आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून पडत्या भावात खरेदी सुरु असून फसवणूक व लुबाडबूक होत आहे.

आंदोलनाचा इशारा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणीकरडी (पालोरा) : धानाचे उत्पादन कीड व रोगांमुळे ५० ते ६० टक्के घटले आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून पडत्या भावात खरेदी सुरु असून फसवणूक व लुबाडबूक होत आहे. त्वरीत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस मोहाडी तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.जिल्ह्यात १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतले जात असून मोहाडी तालुक्याचे क्षेत्र ३२ हजार हेक्टरच्या घरात आहे. तालुक्यात हलके धान मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याचबरोबर सिंचनाची सोय असलेले शेतकरी भारी धानाची फसल घेतात. यावर्षी या दोन्ही पिकांवर रोगराईचे सावट निर्माण झाले. उभ्या धानाचे पीक लोंबीविना वाळून तण झाले. तुडतुडा, सावरदेवी, गादमाशी, लष्करी अळी व विविध रोगांनी हाती आलेले पीक हिसकावून घेतले. शेतात कीड व रोगांमुळे धानाला उग्र वास येत आहे. जनावरेही वाळून तण झालेली तणस खायला तयार नाहीत. अशी वाईट अवस्था आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणीलाही पडवत नसल्याने धान शेतात उभेच ठेवले आहे. तर काहींनी उभ्या धानाला आग लावली आहे. नागरटी, बियाणे, खते, औषधी, पेरणी व रोवणीचा खर्च, मजुरी, कापणी व मळणीचा खर्च लक्षात घेता, त्याचबरोबर दोन ते तिनदा पंपाने पाणी देण्याचा खर्च एकरी २० ते २२ हजारांचे वर गेले आहे. परंतु उत्पन्न मात्र अत्यल्प आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना तर एकही उत्पादन हाती मिळाले नाहीत. ५० ते ६० टक्के उत्पादनात घट असल्याचे मळणीवरून दिसून येत आहे. करडी परिसरात सुद्धा अत्यंत वाईट स्थिती आहे. धानाचे भाव पडले असताना अजूनही धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाहीत. आ.चरण वाघमारे या विषयावर मौन धारण करून आहेत. खोटे आश्वासन व जुमलेबाजीने फसवणूक करीत निवडून आलेले सरकार व त्यांचे आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या जखमांवर मिठ चोळीत उद्घाटनात व्यस्त आहेत.निदान काळा धानाचा पैसा प्रती शेतकरी १५ लाख रुपये देऊन शासनाने आश्वासनाची पूर्ती करावी, महागाई आटोक्यात आणावी, धानाला भाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे मोहाडी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, पं.स. सदस्य महादेव पचघरे, सरपंच किशोर माटे, लिलाधर कांबळे, उपासराव गाढवे, वामन राऊत, भगवान आगाशे, महादेव फुसे, अमरकंठ लांडगे, सुरेश बिसने, कवळू मुंगमोडे, सरपंच भूपेंद्र पवनकर, सुंदरबाई मुंगमोडे, राजधर शेंडे, वामन चकोले, भगवान तिजारे, संजय भोयर, नरेश ईश्वरकर, कार्तिक ईश्वरकर, हरिभाऊ शेंडे यांनी केली आहे. धान खरेदी केंद्र त्वरीत सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे. आमदार व खासदार महोदयांनी त्वरीत निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. (वार्ताहर)