शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कान्हळगाववासीयांच्या उपोषणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 21:14 IST

मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे.

ठळक मुद्देप्रकरण मुंढरी रेतीघाटातील गैरप्रकाराचे

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे. यामुळे गावाचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीची वा ग्रामसभेतून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. गावाचे हित जोपासण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना सुद्धा रेतीघाट मालक व काही अधिकाºयांच्या संगनमताने गैरप्रकार सुरु आहे. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी दि. ३० नोव्हेंबरपासून माजी जि.प. सदस्य के.बी. चौरागडे यांच्या नेतृत्वात धनराज भोयर, रामभाऊ कुकडे, दादाराम भोयर व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.कान्हळगावातील लोकांना विश्वासात न घेता मुंढरी बुज रेती घाटाचा लिलाव करण्यात आला. परंतु प्रस्तावित मुंढरी रस्त्याचा वापर न करता कान्हळगाव हद्दीतून रेतीचा उपसा व वाहतूक खुलेआम सुरु आहे. यासाठी घाटधारकांनी कान्हळगाव ग्रामपंचायतीची मंजुरी घेतलेली नाही. ग्रामपंचायतही प्रकरणी लक्ष न घालता टाळाटाळ करीत आहे. ग्रामपंचायतचे जबाबदार पदाधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. तसेच ग्रामपदाधिकारी संविधानाच्या २४३ व्या घटना दुरुस्तीनुसार पदाचा दुरुपयोग करीत असल्याने व ग्रामसभेच्या अधिकाराचे हनन करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.कान्हळगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी करारनाम्यानुसार कुकडे यांच्या शेतात विहिर खोदण्यात आलेली आहे. योजनेचा संपूर्ण खर्च करातून केला जातो. मात्र मागील आठवड्यापासून या योजनेचे पाणी रेती घाटमालकाला दिले जात आहे. यासाठी ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. बिलाचा भरणा मात्र, ग्रामपंचायतीला करावा लागतो आहे. पाण्याचा गैरवापर थांबवून कारवाई करण्याची मागणी आहे. रेती ठेकेदारांनी रेती डंपींग करण्यासाठी तसेच वाहने उभी करण्यासाठी कुठलीही परवानगी न घेता सामाजिक वनीकरणाच्या जागेतील झाडांच्या कत्तली केल्या आहेत. त्या जागेचा अनधिकृतरित्या वापर चालविला आहे. यासाठी ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही.पर्यावरणाची हानी केली जात आहे. या प्रकारासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, रेती घाट मालक व काही अधिकारी यांचे संगनमत दिसून येत आहे.