शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

कान्हळगाववासीयांच्या उपोषणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 21:14 IST

मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे.

ठळक मुद्देप्रकरण मुंढरी रेतीघाटातील गैरप्रकाराचे

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे. यामुळे गावाचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीची वा ग्रामसभेतून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. गावाचे हित जोपासण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना सुद्धा रेतीघाट मालक व काही अधिकाºयांच्या संगनमताने गैरप्रकार सुरु आहे. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी दि. ३० नोव्हेंबरपासून माजी जि.प. सदस्य के.बी. चौरागडे यांच्या नेतृत्वात धनराज भोयर, रामभाऊ कुकडे, दादाराम भोयर व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.कान्हळगावातील लोकांना विश्वासात न घेता मुंढरी बुज रेती घाटाचा लिलाव करण्यात आला. परंतु प्रस्तावित मुंढरी रस्त्याचा वापर न करता कान्हळगाव हद्दीतून रेतीचा उपसा व वाहतूक खुलेआम सुरु आहे. यासाठी घाटधारकांनी कान्हळगाव ग्रामपंचायतीची मंजुरी घेतलेली नाही. ग्रामपंचायतही प्रकरणी लक्ष न घालता टाळाटाळ करीत आहे. ग्रामपंचायतचे जबाबदार पदाधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. तसेच ग्रामपदाधिकारी संविधानाच्या २४३ व्या घटना दुरुस्तीनुसार पदाचा दुरुपयोग करीत असल्याने व ग्रामसभेच्या अधिकाराचे हनन करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.कान्हळगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी करारनाम्यानुसार कुकडे यांच्या शेतात विहिर खोदण्यात आलेली आहे. योजनेचा संपूर्ण खर्च करातून केला जातो. मात्र मागील आठवड्यापासून या योजनेचे पाणी रेती घाटमालकाला दिले जात आहे. यासाठी ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. बिलाचा भरणा मात्र, ग्रामपंचायतीला करावा लागतो आहे. पाण्याचा गैरवापर थांबवून कारवाई करण्याची मागणी आहे. रेती ठेकेदारांनी रेती डंपींग करण्यासाठी तसेच वाहने उभी करण्यासाठी कुठलीही परवानगी न घेता सामाजिक वनीकरणाच्या जागेतील झाडांच्या कत्तली केल्या आहेत. त्या जागेचा अनधिकृतरित्या वापर चालविला आहे. यासाठी ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही.पर्यावरणाची हानी केली जात आहे. या प्रकारासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, रेती घाट मालक व काही अधिकारी यांचे संगनमत दिसून येत आहे.