शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कान्हळगाववासीयांच्या उपोषणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 21:14 IST

मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे.

ठळक मुद्देप्रकरण मुंढरी रेतीघाटातील गैरप्रकाराचे

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे. यामुळे गावाचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीची वा ग्रामसभेतून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. गावाचे हित जोपासण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना सुद्धा रेतीघाट मालक व काही अधिकाºयांच्या संगनमताने गैरप्रकार सुरु आहे. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी दि. ३० नोव्हेंबरपासून माजी जि.प. सदस्य के.बी. चौरागडे यांच्या नेतृत्वात धनराज भोयर, रामभाऊ कुकडे, दादाराम भोयर व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.कान्हळगावातील लोकांना विश्वासात न घेता मुंढरी बुज रेती घाटाचा लिलाव करण्यात आला. परंतु प्रस्तावित मुंढरी रस्त्याचा वापर न करता कान्हळगाव हद्दीतून रेतीचा उपसा व वाहतूक खुलेआम सुरु आहे. यासाठी घाटधारकांनी कान्हळगाव ग्रामपंचायतीची मंजुरी घेतलेली नाही. ग्रामपंचायतही प्रकरणी लक्ष न घालता टाळाटाळ करीत आहे. ग्रामपंचायतचे जबाबदार पदाधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. तसेच ग्रामपदाधिकारी संविधानाच्या २४३ व्या घटना दुरुस्तीनुसार पदाचा दुरुपयोग करीत असल्याने व ग्रामसभेच्या अधिकाराचे हनन करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.कान्हळगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी करारनाम्यानुसार कुकडे यांच्या शेतात विहिर खोदण्यात आलेली आहे. योजनेचा संपूर्ण खर्च करातून केला जातो. मात्र मागील आठवड्यापासून या योजनेचे पाणी रेती घाटमालकाला दिले जात आहे. यासाठी ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. बिलाचा भरणा मात्र, ग्रामपंचायतीला करावा लागतो आहे. पाण्याचा गैरवापर थांबवून कारवाई करण्याची मागणी आहे. रेती ठेकेदारांनी रेती डंपींग करण्यासाठी तसेच वाहने उभी करण्यासाठी कुठलीही परवानगी न घेता सामाजिक वनीकरणाच्या जागेतील झाडांच्या कत्तली केल्या आहेत. त्या जागेचा अनधिकृतरित्या वापर चालविला आहे. यासाठी ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही.पर्यावरणाची हानी केली जात आहे. या प्रकारासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, रेती घाट मालक व काही अधिकारी यांचे संगनमत दिसून येत आहे.