शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

भंडारा शहरातील डिपींवर वेलींचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून महावितरणने मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्येंसह दुर्लक्ष केले असल्याचे भंडारा शहरात दिसून येत आहे. वाढत्या वीज बिलाने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले असून लाईटबिलाबाबतच्या तक्रारीत वाढ झाली आहे. गत आठवडाभरापासून अनेकजण महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेताना दिसत आहेत.

ठळक मुद्देबिलांच्या तक्रारीत वाढ : मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील विविध भागात असणारी महावितरणची रोहित्रे उघडीच असून या रोहित्रांवर झुडपी वेलींचा विळखा वाढला असून नागरिकांना धोका वाढला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ऑफीसर क्लबसमोरील असणारे रोहित्र गत काही दिवसांपासून उघडे आहे.वीज वितरण कार्यालयाच्या कारभाराने नागरिक त्रस्त असून अधिकाऱ्यांचे समस्यांकडे दुर्लक्ष कायम आहे.उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून महावितरणने मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्येंसह दुर्लक्ष केले असल्याचे भंडारा शहरात दिसून येत आहे. वाढत्या वीज बिलाने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले असून लाईटबिलाबाबतच्या तक्रारीत वाढ झाली आहे. गत आठवडाभरापासून अनेकजण महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेताना दिसत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना भरमसाठ वीज बील भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे महावितरण वीज बिल भरण्यासाठी तगादा लावत आहे. कार्यालयामध्ये फोन लावूनही माहिती सांगण्यासाठी टाळाटाळ केली जाते. शहरातील विविध भागात असणारे रोहित्र उघडेच असून याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.मात्र याकडे अद्यापही महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात धोकादायक ठरणाºया उघड्या रोहित्रांकडे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार काय, असा सवाल विचारला जात आहे.लॉकडाऊन काळातील तीन महिण्यांची वीज बिले महावितरणकडून पाठविण्यात आली आहेत. भरमसाठ वीज बिले पाहताच अनेकांनी बिल भरण्यासाठी टाळाटाळ केली आहे. वीज बिल अधिक आल्याने अनेकांचे डोळे पांढरे होत आहेत.समस्या सुटता सुटेनाजिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी रोहित्राशेजारी झाडाझुडपांचा, वेलींचा विळखा वाढला असून कीटकांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी डिपीच्या समोरील झाकणे दिसून येत नाही. काही ठिकाणी पावसाळ्याच्या पूर्वीची कामे झालीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सिव्हील लाईन परिसरात काही ठिकाणी लोंबकळणाऱ्या तारा तसेच झाडांच्या फांद्या तारांना स्पर्श करीत असल्याचे दिसून येत असताना समस्या सुटलेली नाही.डीपी जळाल्याने देऊळगावात शेतकरी अडचणीतजांब (लोहारा) : महावितरण कार्यालय जांब अंतर्गत देऊळगाव परिसरात आठ दिवसापासून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत परंतु पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाही.मोहाडी तालुक्यातील शेतकरी सुद्धा धान आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. सध्या रोवणीचा हंगाम असून अनेक शेतकरी रोवणी लावण्यात व्यस्त आहेत. पाऊस नसल्याने अनेक शेतकरी बोरवेलच्या पाण्याने रोवणी करत आहेत. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना वेळेवर विज मिळत नाही. मागील दहा दिवसापासून देऊळगाव येथील विद्युत रोहित्र जळाले असल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. एकीकडे निसर्ग शेतकºयावर कोपला आहे. तर दुसरीकडे महावितरण कंपनीचे अधिकारी शेतकºयांची तक्रार ऐकून घेण्यास तयार नाही अशा परिस्थितीत शेतकºयांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला असून रोवणी खोळंबली आहे.

टॅग्स :electricityवीज