शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

भंडारा शहरातील डिपींवर वेलींचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून महावितरणने मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्येंसह दुर्लक्ष केले असल्याचे भंडारा शहरात दिसून येत आहे. वाढत्या वीज बिलाने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले असून लाईटबिलाबाबतच्या तक्रारीत वाढ झाली आहे. गत आठवडाभरापासून अनेकजण महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेताना दिसत आहेत.

ठळक मुद्देबिलांच्या तक्रारीत वाढ : मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील विविध भागात असणारी महावितरणची रोहित्रे उघडीच असून या रोहित्रांवर झुडपी वेलींचा विळखा वाढला असून नागरिकांना धोका वाढला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ऑफीसर क्लबसमोरील असणारे रोहित्र गत काही दिवसांपासून उघडे आहे.वीज वितरण कार्यालयाच्या कारभाराने नागरिक त्रस्त असून अधिकाऱ्यांचे समस्यांकडे दुर्लक्ष कायम आहे.उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून महावितरणने मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्येंसह दुर्लक्ष केले असल्याचे भंडारा शहरात दिसून येत आहे. वाढत्या वीज बिलाने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले असून लाईटबिलाबाबतच्या तक्रारीत वाढ झाली आहे. गत आठवडाभरापासून अनेकजण महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेताना दिसत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना भरमसाठ वीज बील भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे महावितरण वीज बिल भरण्यासाठी तगादा लावत आहे. कार्यालयामध्ये फोन लावूनही माहिती सांगण्यासाठी टाळाटाळ केली जाते. शहरातील विविध भागात असणारे रोहित्र उघडेच असून याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.मात्र याकडे अद्यापही महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात धोकादायक ठरणाºया उघड्या रोहित्रांकडे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार काय, असा सवाल विचारला जात आहे.लॉकडाऊन काळातील तीन महिण्यांची वीज बिले महावितरणकडून पाठविण्यात आली आहेत. भरमसाठ वीज बिले पाहताच अनेकांनी बिल भरण्यासाठी टाळाटाळ केली आहे. वीज बिल अधिक आल्याने अनेकांचे डोळे पांढरे होत आहेत.समस्या सुटता सुटेनाजिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी रोहित्राशेजारी झाडाझुडपांचा, वेलींचा विळखा वाढला असून कीटकांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी डिपीच्या समोरील झाकणे दिसून येत नाही. काही ठिकाणी पावसाळ्याच्या पूर्वीची कामे झालीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सिव्हील लाईन परिसरात काही ठिकाणी लोंबकळणाऱ्या तारा तसेच झाडांच्या फांद्या तारांना स्पर्श करीत असल्याचे दिसून येत असताना समस्या सुटलेली नाही.डीपी जळाल्याने देऊळगावात शेतकरी अडचणीतजांब (लोहारा) : महावितरण कार्यालय जांब अंतर्गत देऊळगाव परिसरात आठ दिवसापासून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत परंतु पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाही.मोहाडी तालुक्यातील शेतकरी सुद्धा धान आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. सध्या रोवणीचा हंगाम असून अनेक शेतकरी रोवणी लावण्यात व्यस्त आहेत. पाऊस नसल्याने अनेक शेतकरी बोरवेलच्या पाण्याने रोवणी करत आहेत. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना वेळेवर विज मिळत नाही. मागील दहा दिवसापासून देऊळगाव येथील विद्युत रोहित्र जळाले असल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. एकीकडे निसर्ग शेतकºयावर कोपला आहे. तर दुसरीकडे महावितरण कंपनीचे अधिकारी शेतकºयांची तक्रार ऐकून घेण्यास तयार नाही अशा परिस्थितीत शेतकºयांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला असून रोवणी खोळंबली आहे.

टॅग्स :electricityवीज