शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कोरोनाला हरविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने भंडारा जिल्ह्यात गावसीमाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:33 IST

भंडारा जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो.

ठळक मुद्देबाहेरून येणाऱ्यांवर लक्षग्राम रक्षादलाचा खडा पहारा

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रीन झोनमध्ये भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनासोबत गावकरीही पुढे सरसावले आहेत. जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला हरवायचेच, असा या गावकऱ्यांनी चंग बांधला आहे.भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुदैवाने एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. प्रशासनाने खबरदारीसाठी कठोर उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्याच्या नऊ सीमा प्रशासनाने सील केल्या आहे. मात्र रेड झोनमधील अनेक जण नजर चुकवून आणि लपूनछपून गावात शिरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाला कोरोनाचा धोका संभवत आहे. प्रशासन उपाययोजना करीत असला तरी ग्राम पातळीवर प्रत्येकाची चौकशी करणे प्रशासनाला अशक्य आहे. त्यासाठी भंडारा जिल्ह्यातील काही गावांनी आपल्या गावाच्या चक्क सीमा सील केल्या आहेत. गावाच्या चोहबाजूला लाकडी बॅरिकेटस् लावण्यात आले आहे. गावात कुठूनही प्रवेश करता येवू नये, यासाठी अडथळे निर्माण करण्यात आले आहे. अनेक गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनात ग्राम सुरक्षा दलाचे तरूण अहोरात्र खडा पहारा देत आहे. ओळखीचा असो की अनोळखी त्याची कसून चौकशी केली जाते. महानगरातून आलेल्या विशेषत: रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीची माहिती अंगणवाडी सेविकेमार्फत प्रशासनाला दिली जाते.मोहाडी तालुक्यातील हत्तीडोई, हरदोली यासाह लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील गावांमध्ये असे चित्र आता दिसत आहे. अनेक ठिकाणी गावात प्रवेश बंद असे फलकही लावण्यात आले आहे. गावातील व्यक्तीलाही बाहेर सोडताना त्याची खात्री करूनच परवानगी दिली जाते. लॉकडाऊन घोषित होवून आता महिना झाला आहे. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी गावकºयांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. गावातील तरूण आळीपाळीने खडा पहारा याठिकाणी देत आहे. एकंदरीतच ग्रामीण भागातही आता कोरोनाबाबत जनजागृती यशस्वीपणे झाली असून कोरोनाशी दोन हात करण्यासाठी ग्रामीण जनताही सरसावली आहे.नोंदवही आणि सॅनिटायझरगावबंदी असलेल्या गावाच्या प्रवेश द्वारावर नोंदवही ठेवण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्याची प्रत्येकाची नोंद केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला सॅनिटाईज करूनच आत सोडले जाते. हरदोली येथील सरपंच सदाशिव ढेंगे म्हणाले, गावात कोरोना संसशीत शिरू नये यासाठी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला. याला गावकरीही सहकार्य करतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस