शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:27 AM

गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचायतला दिले.

ठळक मुद्देतारांकित प्रश्नानंतरही तिढा कायम : प्रकरण ठाणा पेट्रोलपंप येथील दीड कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचायतला दिले. मासिक व ग्रामसभेत चर्चा न करता अर्जाकडे दुर्लक्ष केले. परिणामी तहकुब ग्रामसभेत महिलांनी मागणी रेटून धरली. अखेर सचिवाला विशेष ग्रामसभेचे आयोजन ११ फेब्रुवारीला करण्याचे भाग पाडले.जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले विकसीत खेडेगाव म्हणजे ठाणा पेट्रोलपंप. येथे १५ अधिक सरपंच असे एकंदरीत १६ सदस्य ग्रामपंचायतमध्ये विराजमान आहे. येथील भौगोलीक परिस्थितीचा विचार करता ९० टक्के घरे व अंतर्गत रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे आहेत. १२ वर्षापुर्वी टंचाईकृती आराखड्याअंतर्गत खरबी-ठाणा संयुक्त नळयोजना कार्यान्वित होती. १३ सार्वजनिक नळ स्टॅडपोस्टद्वारे जमीनीवर दोन फुट उंचावर उच्चदाबयुक्त पाणी दिवसाला दोन वेळा गावकऱ्यांना मिळत होते. दरम्यान गावाला जलशुध्दीकरणाव्दारे पाणी मिळावे, याकरिता तत्कालीन राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, सामाजिक कार्यकर्ते दिनदयाल देशभ्रतार, माजी सरपंच राजेश गिरी, उपसरपंच रामचंद्र किंदर्ले, पाणीपुरवठा समिती सदस्य अनिल पाटील, ऋषीराज मेळे, प्रल्हाद हुमणे, किसन मानकर यांच्याद्वारे ३० जुन २००५ मध्ये महाजल स्वजलधारा अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे स्वतंत्र नविन नळ योजना मंजुरीचा ठराव पारीत करुन मुंबई-दिल्ली कार्यालयाद्वारे एक कोटी ४६ लक्ष किंमतीची महत्वाकांक्षी नळ योजना आणली. रितसर नळयोजनेचे भूमीपूजन जून २००९ ला करण्यात आले.नियोजनानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. लगेच ग्रामपचांयत निवडणुका लागल्या नविन सदस्य ग्रामपचांयत व पाणीपुरवठा समितीमध्ये आले. कालांतराने राज्यातही रस्ता परिवर्तन झाले. एकाच कामाला तीन कंत्राटदाराकरवी गावातील पाणीपुरवठा कामे करण्यात आली. काम कसे सुरु आहे यावर कुणाचेही लक्ष नव्हते. ९० टक्के रक्कम खर्च झाले. मात्र गावाला एक थेंब पाण्याचे मिळाले नाही. तरुण, ज्येष्ठ महिला पुरुषांनी पाणी प्रश्नाबाबत ग्रामपंचायत पाणीपुरवठा समिती व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर मिळत होते. गावातील नवीन वाढीव पाईप लाईनची मागणी मंजुर करुन ‘क’ चे मिशन करीत होते. दिड कोटी खर्च झाले, मात्र गावाला एक थेंब पाणी देऊ शकले नाही. आमदार रामचंद्र अवसरे यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केले होते. येथे ही ‘क’ चे मिशन करणारा खाऊदास पोहचला आणि प्रकरण थंडावला. पालकमंत्र्यांकडेही ठाणा येथील पाणी प्रश्न रेटले यातही यश पदरी पडले नाही. अमित देशभ्रतार यांनी माहितीचा अधिकार वापर केला. यावरही ‘क’ चे मिशनधारक येऊन ठेपले. हतबल झालेले ग्रामस्थ आता शेवटचा उपाय म्हणून ४ जानेवारीला दिडसे नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंपला दिला. मात्र ग्रामपंचायतच्या मासिक सभेत २६ जानेवारीच्या तहकुब ग्रामसभेत विषय चर्चेला घेतला नाही व निर्णय घेतला नाही. गावातील महिलांनी २ फेब्रुवारीच्या तहकुब ग्रामसभेत गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागण्यासाठी विशेष ग्रामसभा ११ फेब्रुवारीला आयोजित केली होती.

टॅग्स :water transportजलवाहतूक