शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

प्रदूषणामुळे चिमण्यांना धोका

By admin | Updated: May 5, 2016 00:58 IST

धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.

भंडारा : धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.पूर्वी पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत सतत चालणारा चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाला. शहरातील सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचे निवारेसुध्दा लोप पावले. परंतु चिमण्यापाखरांसोबत नातीगोती जपणाऱ्यांनी मात्र चिमण्यांचा सहवास मिळावा म्हणून पक्षीप्रेमी नागरिक घरांच्या गच्चीवर कृत्रिम घरटे लावण्याचा उपक्रम राबवतात. पशुपक्षी घरट्यातून बाहेर येत एकच कलह होत होता. तेव्हा पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे महिला मंडळी पहाटे सडा सारवण करीत होत्या. परंतु आता सूर्यवशंचा जमाना आला. कुणालाही सडा सारवण करण्याची गरज वाटत नाही. जुन्या काळची भूपाळीसुध्दा काळाच्या पडद्याआड गेली आहे. विज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती करून मानवाला ऐहिक सुखाच्या विळख्यात टाकले आहे. परंतु तेवढेच दुष्परिणामसुध्दा वाढले आहेत. मानवी जीवन आजाराने वेढले गेले. विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर ठरत आहे. यामुळे मानवाला अनेक आजारांनी ग्रासले आहे. निसर्गातील पशुपक्षीसुध्दा काळाच्या पडद्याआड जात आहे. जंगलात पिकावर होत असलेल्या अतिविषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे खाद्य अळ्यासुध्दा नाहिशा झाल्याने पशुपक्ष्यावर उपासमारी येऊ लागली आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या चिमण्या तर केवळ बोटावर मोजण्याइतक्या दिसून येतात. 'कावळ्यांचे घर शेणाचे आणि चिमणीचे घर मेणाचे' ही म्हणसुध्दा कालबाह्य झाली आहे. शहरी भागात सिमेंट रस्ते आणि मोठमोठ्या इमारतीमुळे शहरातील चिमण्यांचा चिवचिवाट नाहिसा झाला. पहाट कधी होते हे कळायला मार्ग नाही. कालांतराने येणाऱ्या पिढीला केवळ पुस्तकात चिमण्यांचे चित्र पाहून समाधान मानावे लागेल. पर्यावरणवाद्यांनी यावर चिंतन करण्याची वेळ आली तर शासनाने याकरिता विशेष कायदा करणे गरजेचे झाले. भ्रमणध्वनीसुध्दा याला कारणीभूत ठरत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे. शहरातून तर चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाल्याने निसर्गवाद्यांना सतत चिंता भेडसावू लागली आहे. याकरिता काही पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी घराच्या आजूबाजूला कृत्रिम घरटे आणि पाण्याची व्यवस्था करून चिमण्या पाखरांना निवारा देण्याचा प्रयत्न करीत असतात. चिमण्या-पाखरांवर परमाणू लहरीचा परिणाम होऊन चिमण्यांनी आता आपला मोर्चा निसर्गाच्या सान्निध्यात वळविला असल्याने शहरात चिमण्या नामशेष झाल्या आहे. ( नगर प्रतिनिधी)