शहरं
Join us  
Trending Stories
1
'हायवेच्या प्रत्येक किमीत पैसा खात आहेत, टोलमधून मिळालेला पैसा थेट गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला'; अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
5
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
6
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
7
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
9
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
10
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
11
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
12
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
13
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
14
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
15
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
16
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
17
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
18
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
19
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
20
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...

९० हजार हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 00:14 IST

यावर्षी आजपर्यत ८५ टक्के पाऊस पडल्याची नोंद शासन दरबारी असली तरी भंडारा जिल्ह्यातील ९० हजार ६०४ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे.

निसर्गाची अवकृपा : खरीपाची पेरणी ५७ टक्के, पावसाची टक्केवारीही घसरलीदेवानंद नंदेश्वर भंडारायावर्षी आजपर्यत ८५ टक्के पाऊस पडल्याची नोंद शासन दरबारी असली तरी भंडारा जिल्ह्यातील ९० हजार ६०४ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीप हंगामासाठी सध्यस्थितीत १ लाख १८ हजार ९२३ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी करण्यात आली आहे़ जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असून, आतापर्यंत ५६.७६ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे.भंडारा जिल्ह्यात १८ हजार २७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ हजार ९१.४२ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ९३.९२ एवढी आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात २,६४२ हेक्टर, पवनी २,४९२ हेक्टर, मोहाडी २,८९५ हेक्टर, तुमसर २,९४०, साकोली १,६९४, लाखांदूर २,४०८ तर लाखनी तालुक्यात २,०२०हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ८ हजार २८४ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केली. यामध्ये सर्वाधिक लागवड लाखांदूर तालुक्यात असून २,००८ हेक्टर आहे. भंडारा ३८ हेक्टर, पवनी १,७७५, मोहाडी ५०, तुमसर ९०, साकोली १,५५१ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली. यासह जिल्ह्यात तुर १,०४२.५० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. त्याची टक्केवारी ११०.९२ आहे. यासह मुंग ३.५० हेक्टर, तीळ १८१.२०, सोयाबिन १,००५, हळद ३७६, कापूस ६९०.२०, तर भाजिपाल्याची ९४५ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली़रोवणी केवळ ५२ टक्के, पेरणीही अपुरीजिल्ह्यात एक लाख ८२ हजार ७६२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ९६ हजार ३०४.२८ हेक्टर क्षेत्रात रोवणी लागवड केलेली आहे. यात भंडारा तालुक्यात १२ हजार ९२ हेक्टर, मोहाडी ९,४०९, तुमसर १४,४७७, पवनी १९,१९४, साकोली १३,१२०, लाखनी १०,७४५, लाखांदूर १७,२६७ हेक्टरचा समावेश आहे. रोवणी करणाऱ्या मजुरांची मजुरी कडाडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ बियाने खते किटकनाशकांच्या दरात वाढ झाली आहे़ सरासरी पाऊस कमीयावर्षीच्या पावसाळ्यात १ जून ते ६ आॅगस्टपर्यंत ६१३.३ मि.मी. पाऊस बरसला. प्रत्येक्षात या कालावधीत सरासरी ७१८.६ मि.मी. पाऊस पाहिजे होता. मागीलवर्षी याच कालावधीत ५८८ मि.मी. सरासरी पाऊस बरसला होता. ६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ३३.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यात भंडारा ३३.४ मि.मी., मोहाडी ६४, तुमसर ४५.४, पवनी ३.६, साकोली ४८.४, लाखांदूर १५.२ तर लाखनी तालुक्यात २६.२ मि.मी. पावसाचा समावेश आहे.कमी अधिक पावसामुळे रोवणी खोळंबलीभंडारा जिल्ह्यात ८५ टक्के पाऊस कोसळल्याची नोंद शासन दरबारी असली तरी अनेक ठिकाणी पाऊस कमी अधिक बरसला आहे. परिणामी धानपिकाला रोवणीसाठी उपयुक्त पाणी झाले नाही. मोटरपंप तसेच इंजिनच्या माध्यमातून पाणी विकत घेवून रोवणी आटोपण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहे. वरथेंबी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचे पऱ्हे रिमझिम पावसामुळे जगत असले तरी रोवणीसाठी मात्र त्यांच्याकडे मुबलक पाणी साठा नाही. मराठवाडा, कोकण, मुंबई या ठिकाणी दमदार पावसाची हजेरी आहे. पावसामुळे नासधुस होत आहे. मुंबई येथे पाऊस आल्यानंतर विदर्भात त्याची हजेरी लागत असते, असा समज शेतकऱ्यांचा आहे. मात्र मुंबईला जोरदार पाऊस होत असला तरी अद्यापही भंडारा जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पावसाने अजुनही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खरीपाची पेरणी अद्यापही रखडली आहे. १५ आॅगस्टपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर भंडारा जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.