शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साकोली तालुक्यात २० हजार हेक्टरमध्ये पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:45 IST

तालुक्यात खरीप हंगामाला जोमात प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे पुर्णत्वाकडे आहे. सध्या दमदार पावसामुळे चिखलणीच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३७ टक्के कमीच पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देचिखलणीच्या कामाला प्रारंभ : पाऊस सरासरीपेक्षा कमीच

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात खरीप हंगामाला जोमात प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे पुर्णत्वाकडे आहे. सध्या दमदार पावसामुळे चिखलणीच्या कामाला वेग आला आहे.यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३७ टक्के कमीच पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. तर तालुक्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात बरसलेल्या पावसाच्या सरीनंतर खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध होती, अश्या शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली होती. मात्र पºहे चार इंचीचे झाल्यावरही या शेतकºयांना पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा होती. अखेर आद्रा नक्षत्राच्या सहाव्या दिवशी पाऊस बरसताच चिखलणीची कामाला सुरुवात होऊन अन्य शेतकºयांनी पेरणीची कामे हातात घेतली. गत चार ते पाच दिवसात पाऊस आल्याने शेतकरी ही खरीप हंगामात व्यस्त दिसून येत आहे. साकोली तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त भागात धानाची लागवड केली जाते. चिखलणीची कामे झाल्यानंतर बळीराजा खत फवारणीच्या कामाला लागणार आहे.यंदा मान्सून केरळ किनारपट्टीवर उशिराने दाखल झाला आहे. तसेच मान्सून सुरू व्हायच्या वेळेस भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर 'वायू चक्रीवादळ' आले होते. त्यामुळे मान्सुन दक्षिण कर्नाटकमध्येच जास्त दिवस बरसला आहे. या सर्व कारणांमुळे जून महिन्यात कमी पाऊस पडला आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात १ जून ते ४ जुलै या कालावधीत सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २३१.७ मिलिमीटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र, तुलनेने उशिरा सुरू झालेला पाऊस केवळ २०१.५ मिलिमीटर पडला आहे. या अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपातील पेरण्याची लगबग सुरू केल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील पेरणीचे काम अंतिम टप्यात आहे.चौरास भागात भात पीक रोवणीला प्रारंभआसगाव चौ. : ज्याच्याकडे ओलीताची सोय आहे. विहिरीला पाणी आहे. त्या शेतकऱ्यांनी रोहणी नक्षत्रातच भात पिकांच्या पऱ्हे नर्सरी तयार करुन भरली. त्यांनी पंपाच्या सहाय्याने सिंचन करुन मेहनतीने पऱ्हे जगविले. त्यांच्या पऱ्हे नर्सरी रोवण्या योग्य झाल्यामुळे व आद्रा नक्षत्राचा पाऊस समाधानकारक झाल्यामुळे चौरास परिसरातील १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रोवणीसाठी २० ते २५ दिवासचा कालावधी लागणार आहे. कारण पावसाची सुरुवात उशीरा सुरु झाल्यामुळे पऱ्हे तयार होण्यासाठी बराच अवधी लागणार आहे व पावसाची सुध्दा प्रतीक्षा करावी लागेल.

टॅग्स :agricultureशेती