शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

सोमलवाडा-किन्ही रस्ता ठरतोय शेतकऱ्यांचा कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2022 05:00 IST

पंधरा वर्षांपूर्वी सदर रस्ता डांबरीकरणासाठी एका ठेकेदाराने साहित्य टाकले. तसेच डांबरीकरण न करताच साहित्य उचलून नेले. मात्र डांबरीकरण झाल्याची व सदर कामाची रक्कम दिल्याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी डागडुजी (पॅच वर्क) झाल्याचीही नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात एकही काम झाले नाही व मुदतीत बसत नसल्याने त्याचे काम पुन्हा करता येत नाही, असे सांगितले जाते.

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : नजीकच्या सोमलवाडा - किन्ही गावाला जोडणारा २ किमी अंतराचा रस्ता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरलेला आहे. सोमलवाडा येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन किन्ही व सोनेखारीच्या भौगोलिक क्षेत्रात येते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना रोज बैलगाडी व ट्रॅक्टरने रहदारी करावी लागत आहे.पंधरा वर्षांपूर्वी सदर रस्ता डांबरीकरणासाठी एका ठेकेदाराने साहित्य टाकले. तसेच डांबरीकरण न करताच साहित्य उचलून नेले. मात्र डांबरीकरण झाल्याची व सदर कामाची रक्कम दिल्याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी डागडुजी (पॅच वर्क) झाल्याचीही नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात एकही काम झाले नाही व मुदतीत बसत नसल्याने त्याचे काम पुन्हा करता येत नाही, असे सांगितले जाते. सात वर्षांपूर्वी किन्नी येथील वंदना पंधरे या  जि.प. सदस्या झाल्या. त्यांनी जिल्हा परिषदेतून सदर रोडचे काम मंजूर करवून घेतले. परंतु अडीच वर्षांनी जिल्हा परिषदेची सत्ताबदल झाल्याने सदर काम रद्द झाले, असे सांगण्यात येते. राजकारणाच्या कचाट्यात शेतकरी मात्र यातना भोगत आहे. या मार्गावर दोन नाल्यावर पूल आहेत. एका पुलाची स्थिती गंभीर आहे. पावसाळ्यात केव्हाही तुटून वाहून जाऊ शकतो.  जीवित हानीही होऊ शकते. पावसाळ्यात पायी सुद्धा चालता येत नाही. खडीवाहून गेल्यामुळे चिकन मातीवरून ट्रॅक्टर व बैलसुद्धा घसरतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशीच अवस्था सोमलवाडा-सोनेखारी रस्त्याची आहे. याकडे नवनियुक्त  लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी सुरेश टिचकुले व शेतकऱ्यांनी केली आहे.

ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था- जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यांना बिकट अवस्था प्राप्त होत असते. चिखलामुळे अनेक अपघातही घडले आहेत. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग