शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

सोलर पंप ९ महिन्यांपासून बंद, शेतकरी अडचणीत; पाण्याअभावी होतेय धानपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:39 IST

Bhandara : ९ महिन्यांपासून सोलर पंप बंद, तक्रारीनंतरही दखल नाही

सिल्ली-आंबाडी : तालुक्यातील बोरगावं बुज. येथील अल्पभूधारक शेतकरी निर्मल चतुराम बावनकुळे यांनी शेती सिंचनासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेतून सोलर पंप लावले. मात्र सोलर पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील नऊ महिन्यापासून सोलर बंद आहे. कंपनीला वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे.

शेती ही पाण्याशिवाय होऊ शकत नाही. आधुनिक पद्धतीने शेतपिके घेण्यासाठी सबसीडीवर कुसुम सोलर योजना सुरू केली. निर्मल बावनकुळे यांनी ४ वर्षांपूर्वी शेतावर जे. के. कंपनीचे पाच वर्ष वॉरंटी असलेले सोलर पंप लावले. पाण्याच्या भरोशावर विविध पिकाची लागवड केली. आता शेतात नगदी भाजीपाला लावला आहे.

दाद मागावी तरी कुठे ?मागील नऊ महिन्यापासून सोलर पंप बंद असून कंपनीला वारंवार निवेदन दिले. मात्र अद्याप कंपनीचा एकही प्रतिनिधी सोलर दुरुस्तीसाठी आला नसून केवळ याला फोन करा, त्याला फोन करा असा चालढकलपणा सुरू आहे. सोलर घेण्यापूर्वी कंपनीचे एजंट चकरा मारतात. मात्र एखादा विकून झाले की शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दाद कुठे मागावी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.  

"पाण्याअभावी शेतातील हिरवा भाजीपाला करपण्याच्या मार्गावर असून उन्हाळी धानपिकाची रोपेही पिवळी पडली. सोलर कंपनीचे प्रतिनिधी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी काय करावे? सुचत नाही."- निर्मल बावनकुळे, शेतकरी बोरगाव 

टॅग्स :farmingशेतीbhandara-acभंडारा