शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१९५ जणांना मिळणार सौर कृषिपंप

By admin | Updated: December 6, 2015 00:28 IST

भारनियमनामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची योजना सुरु केली.

अनिल गेडाम यांची माहिती : शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज राहणार नाही भंडारा : भारनियमनामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची योजना सुरु केली. यामध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून यावर्षी जिल्ह्यातील १९५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नजिकच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांनी दिली.या योजनेचा लाभ ५ एकर पेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, महावितरण कंपनीकडे पैसे भरून प्रलंबित ग्राहकांपैकी ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे नजिकच्या काळात वीज पुरवठा करणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर सौर पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे विहिर किंवा शेततळे असणे आवश्यक आहे.या सौर पंपामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज राहणार नाही. लोडशेडिंग पासून मुक्तता मिळणार असून यामुळे शेतकऱ्यांना दिवसा ८ ते १० तास वीज पुरवठा उपलब्ध राहील. सौर पंपाची निगा व दुरुस्ती पाच वर्ष कंपनीतर्फे करण्यात येईल.महाराष्ट्रामध्ये ही योजना विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये व अतिदुर्गम भागामध्ये राबविली जाणार आहे. यामध्ये केंद्रशासनाचे ३० टक्के वित्तीय अनुदान असून राज्य शासनाचे ५ टक्के हिस्सा राहील. उर्वरीत ६५ टक्के रकमेपैकी लाभार्थीचा हिस्सा कमीत कमी ५ टक्के ठेवण्यात आलेला आहे. उर्वरित रक्कम वित्तीय संस्थेमार्फत कर्जाच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर कर्जाची परतफेड महावितरण कंपनीद्वारे टप्पा टप्प्याने करण्यात येईल. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार लाभार्थी निवड जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येईल. (नगर प्रतिनिधी)